शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

किनगाव जट्टू परिसरातील पेरण्या खोळंबलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

किनगाव जट्टू परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे ...

किनगाव जट्टू परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे लागलेला खर्च वसूल झाला नसल्याने बळीराजाने गतवर्षीची मरगळ झटकून जुन्या कटू अनुभवांना मूठमाती देऊन नव्या उमेदीने बँकेचे कर्ज काढून सावकाराचे दारे ठोठावून महागडे बी बियाणे, रासायनिक खते आणून पेरणीला सुरुवात केली होती. कपाशी व काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीस सुरुवात केली होती, परंतु पाच दिवसांपासून कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत. गतवर्षी दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर सोयाबीन सोंगणीच्यावेळी

अतिवृष्टी झाल्यामुळे उभे सोयाबीन भिजले. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे दर गगनाला भिडले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवड करून सोयाबीन पेरणी केली ते पावसाअभावी उगवते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

पाच दिवसांपासून पावसाची विश्रांती

परिसरात हलक्या सरी पडल्या तरी आजूबाजूच्या भागात दमदार पाऊस पडत असल्याने आपल्या भागात सुद्धा पाऊस पडेलच या आशेने व हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुरुवात चांगल्या प्रकारे झाली होती, परंतु आता पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता ज्या शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत, ते आता चातक पक्षाप्रमाणे आकाशाकडे नजरा लावून आहेत. ज्यांच्या पेरण्या बाकी आहे, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या लांबवल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नावर फरक पडत असल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे.

दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्र आटोपत आले आहे. तरीसुद्धा अजून परिसरातील नद्या- नाले कोरडे आहेत. गुरांना विहिरीतून शेंदून पाणी पाजावे लागत आहे. येथे आज रोजी सुद्धा पाणीटंचाई असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुद्धा चालू आहे. दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास पेरणी केलेले व उगवलेले पिकाचे नाजूक कोमटे उन्हामुळे जळतील अशी शंका दिवसेंदिवस निर्माण होत आहे.