शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

किनगाव जट्टू परिसरातील पेरण्या खोळंबलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

किनगाव जट्टू परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे ...

किनगाव जट्टू परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे लागलेला खर्च वसूल झाला नसल्याने बळीराजाने गतवर्षीची मरगळ झटकून जुन्या कटू अनुभवांना मूठमाती देऊन नव्या उमेदीने बँकेचे कर्ज काढून सावकाराचे दारे ठोठावून महागडे बी बियाणे, रासायनिक खते आणून पेरणीला सुरुवात केली होती. कपाशी व काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीस सुरुवात केली होती, परंतु पाच दिवसांपासून कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत. गतवर्षी दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर सोयाबीन सोंगणीच्यावेळी

अतिवृष्टी झाल्यामुळे उभे सोयाबीन भिजले. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे दर गगनाला भिडले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवड करून सोयाबीन पेरणी केली ते पावसाअभावी उगवते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

पाच दिवसांपासून पावसाची विश्रांती

परिसरात हलक्या सरी पडल्या तरी आजूबाजूच्या भागात दमदार पाऊस पडत असल्याने आपल्या भागात सुद्धा पाऊस पडेलच या आशेने व हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुरुवात चांगल्या प्रकारे झाली होती, परंतु आता पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता ज्या शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत, ते आता चातक पक्षाप्रमाणे आकाशाकडे नजरा लावून आहेत. ज्यांच्या पेरण्या बाकी आहे, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या लांबवल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नावर फरक पडत असल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे.

दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्र आटोपत आले आहे. तरीसुद्धा अजून परिसरातील नद्या- नाले कोरडे आहेत. गुरांना विहिरीतून शेंदून पाणी पाजावे लागत आहे. येथे आज रोजी सुद्धा पाणीटंचाई असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुद्धा चालू आहे. दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास पेरणी केलेले व उगवलेले पिकाचे नाजूक कोमटे उन्हामुळे जळतील अशी शंका दिवसेंदिवस निर्माण होत आहे.