शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

किनगाव जट्टू परिसरातील पेरण्या खोळंबलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:23 IST

किनगाव जट्टू परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे ...

किनगाव जट्टू परिसरात मृग नक्षत्राच्या पहिल्या चरणात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. गतवर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे लागलेला खर्च वसूल झाला नसल्याने बळीराजाने गतवर्षीची मरगळ झटकून जुन्या कटू अनुभवांना मूठमाती देऊन नव्या उमेदीने बँकेचे कर्ज काढून सावकाराचे दारे ठोठावून महागडे बी बियाणे, रासायनिक खते आणून पेरणीला सुरुवात केली होती. कपाशी व काही शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या पेरणीस सुरुवात केली होती, परंतु पाच दिवसांपासून कडकडीत ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवल्या आहेत. गतवर्षी दुबार, तिबार पेरणी करावी लागली होती. त्यानंतर सोयाबीन सोंगणीच्यावेळी

अतिवृष्टी झाल्यामुळे उभे सोयाबीन भिजले. त्यामुळे यावर्षी सोयाबीनचे दर गगनाला भिडले आहे. ज्या शेतकऱ्यांनी कपाशी लागवड करून सोयाबीन पेरणी केली ते पावसाअभावी उगवते की नाही अशी शंका निर्माण झाली आहे.

पाच दिवसांपासून पावसाची विश्रांती

परिसरात हलक्या सरी पडल्या तरी आजूबाजूच्या भागात दमदार पाऊस पडत असल्याने आपल्या भागात सुद्धा पाऊस पडेलच या आशेने व हवामान खात्याच्या अंदाजानुसार सुरुवात चांगल्या प्रकारे झाली होती, परंतु आता पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे आता ज्या शेतकऱ्याच्या पेरण्या झाल्या आहेत, ते आता चातक पक्षाप्रमाणे आकाशाकडे नजरा लावून आहेत. ज्यांच्या पेरण्या बाकी आहे, त्या शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या लांबवल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नावर फरक पडत असल्याचे शेतकऱ्याकडून बोलले जात आहे.

दुबार पेरणीचे संकट

मृग नक्षत्र आटोपत आले आहे. तरीसुद्धा अजून परिसरातील नद्या- नाले कोरडे आहेत. गुरांना विहिरीतून शेंदून पाणी पाजावे लागत आहे. येथे आज रोजी सुद्धा पाणीटंचाई असल्यामुळे टँकरद्वारे पाणीपुरवठा सुद्धा चालू आहे. दोन-तीन दिवसात पाऊस न पडल्यास पेरणी केलेले व उगवलेले पिकाचे नाजूक कोमटे उन्हामुळे जळतील अशी शंका दिवसेंदिवस निर्माण होत आहे.