शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

निर्बंध कडक होताच सर्वत्र शुकशुकाट - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सूचित करूनही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. मात्र, बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व आवश्यक सेवा ...

मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सूचित करूनही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. मात्र, बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यानुसार दुपारी पालिका कर्मचाऱ्यांनी बाजार, बसस्थानक, आदी सार्वजनिक ठिकाणी पाहणी केल्यानंतर संपूर्ण बाजार बंद झाला. जोडीला पोलीस कर्मचारी असल्याने सर्वच दुकाने बंद झाली होती. दुपारनंतर केवळ दवाखाने व मेडिकल सुरू होते. बसस्थानकात बसेस फेऱ्या येत नसल्याने बसस्थानकही शांत होते.

बससेवेच्या शंभर फेऱ्या बंद

सार्वजनिक वाहतूक सुरू असली तरीही प्रवासी संख्या नसल्याने मेहकर, वाशिम, पुसद, रिसोड आगारांतून निघणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या सर्व आगारांतून औरंगाबाद, पुणे, नाशिक, जालनाकडे जाणाऱ्या शंभरपेक्षा जास्त बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. सध्या सिंदखेडराजा बसस्थानकातून जालनापर्यंत जाता येते. त्यासाठी केवळ पाच ते सहा बसेस सुरू आहेत. या व्यतिरिक्त कोणतीच बस नसल्याने लोकही बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.

तहसील परिसर शांत

खरेदी-विक्री व्यवहार तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून होणारी मोजणी, अभिलेखातून देण्यात येणाऱ्या नकला हे सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सर्वाधिक वर्दळ असलेल्या तहसील परिसरात शांतता दिसून येत आहे.

बुधवारपासून वेळेत बदल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक सेवा सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.