शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

निर्बंध कडक होताच सर्वत्र शुकशुकाट - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सूचित करूनही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. मात्र, बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व आवश्यक सेवा ...

मुख्यमंत्र्यांनी अनेकवेळा सूचित करूनही बाजारातील गर्दी कमी होत नव्हती. मात्र, बुधवारपासून सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सर्व आवश्यक सेवा सुरू राहणार आहेत. त्यानुसार दुपारी पालिका कर्मचाऱ्यांनी बाजार, बसस्थानक, आदी सार्वजनिक ठिकाणी पाहणी केल्यानंतर संपूर्ण बाजार बंद झाला. जोडीला पोलीस कर्मचारी असल्याने सर्वच दुकाने बंद झाली होती. दुपारनंतर केवळ दवाखाने व मेडिकल सुरू होते. बसस्थानकात बसेस फेऱ्या येत नसल्याने बसस्थानकही शांत होते.

बससेवेच्या शंभर फेऱ्या बंद

सार्वजनिक वाहतूक सुरू असली तरीही प्रवासी संख्या नसल्याने मेहकर, वाशिम, पुसद, रिसोड आगारांतून निघणाऱ्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. या सर्व आगारांतून औरंगाबाद, पुणे, नाशिक, जालनाकडे जाणाऱ्या शंभरपेक्षा जास्त बसफेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. सध्या सिंदखेडराजा बसस्थानकातून जालनापर्यंत जाता येते. त्यासाठी केवळ पाच ते सहा बसेस सुरू आहेत. या व्यतिरिक्त कोणतीच बस नसल्याने लोकही बाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.

तहसील परिसर शांत

खरेदी-विक्री व्यवहार तसेच भूमी अभिलेख कार्यालयाकडून होणारी मोजणी, अभिलेखातून देण्यात येणाऱ्या नकला हे सर्व व्यवहार बंद आहेत. त्यामुळे सर्वाधिक वर्दळ असलेल्या तहसील परिसरात शांतता दिसून येत आहे.

बुधवारपासून वेळेत बदल

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आवश्यक सेवा सकाळी सात ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा दिली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.