शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

कोरोना परतू लागताच गाव सोडले, कामासाठी पुन्हा शहर गाठले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाने कठोर निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक कामगार, ...

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाने कठोर निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक कामगार, नोकरदार, छोठेमोठे व्यावसायिक आपापल्या गावी आले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हे गावी आलेले नागरिक पुन्हा कामाच्या ठिकाणी परत जाऊ लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. यामुळे काम सुरू असले तरी काळजी मात्र कायम आहे.

परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी गेले

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून परदेशात शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, फिलिपिन्स आदी देशात महाराष्ट्रातून विद्यार्थी गेले आहेत. जाण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या-त्यांच्या जिल्हा, शहर प्रशासनाच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली आहे.

सर्वाधिक स्थलांतर पुणे, औरंगाबादकडे

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगारासाठी पुन्हा स्थलांतर होऊ लागले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद शहराकडे सर्वात जास्त स्थलांतर होत आहे. त्याखालोखाल मुंबई, नंतर नाशिक आणि नागपूर या शहरांत मोठ्या संख्येने कामगार पुन्हा परतू लागले आहेत.

मुले मोठ्या शहरांमध्ये; चिंता पालकांना

मी मूळचा बोरी अडगाव आहे. माझी नोकरी पुणे येथे आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात कंपनीने वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी गावी आलो आणि तिथूनच जवळपास यंदाच्या मार्च, जूनपर्यंत काम केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कंपनीने कामावर परत येण्यास सांगितले आहे. जूनमध्ये पुणे येथून परतलो, कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी तो गेलेला नाही. त्यामुळे कुटुंब थोडे काळजीत आहे, पण संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत काम सुरू आहे. यामुळेच आतापर्यंत कोरोनापासून दूर राहता आले.

- मोरेश्वर पाटील, नोकरदार

माझा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीतील एका चांगल्या पदावर काम करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाल्याने दिवसागणिक काळजी वाढत होती. यामुळे आम्ही त्याला घरी येण्यास सांगितले. तरी काही दिवस तो तेथेच राहिला, मात्र कंपनीनेच वर्क फ्रॉम होमला मुभा दिली. यानंतर तो घरी आला आणि जूनपर्यंत घरूनच काम सुरू होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने कंपनीचे बाेलावणे आल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात तो पुन्हा मुंबईत गेला आहे. आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असल्याने काळजी वाटत आहे.

- नंदाबाई सुरवाडे, गृहिणी