शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

कोरोना परतू लागताच गाव सोडले, कामासाठी पुन्हा शहर गाठले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाने कठोर निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक कामगार, ...

राज्यात मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आल्याने शासनाने कठोर निर्बंध लागू केले होते. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील अनेक कामगार, नोकरदार, छोठेमोठे व्यावसायिक आपापल्या गावी आले होते. कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने हे गावी आलेले नागरिक पुन्हा कामाच्या ठिकाणी परत जाऊ लागले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेले नाही. यामुळे काम सुरू असले तरी काळजी मात्र कायम आहे.

परदेशात शिक्षणासाठी विद्यार्थी गेले

महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून परदेशात शेकडो विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी गेले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, कॅनडा, फिलिपिन्स आदी देशात महाराष्ट्रातून विद्यार्थी गेले आहेत. जाण्यापूर्वी या सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या-त्यांच्या जिल्हा, शहर प्रशासनाच्या वतीने लसीकरण करण्यात आले आहे. त्यानंतरच त्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्याची परवानगी दिली आहे.

सर्वाधिक स्थलांतर पुणे, औरंगाबादकडे

जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांचे रोजगारासाठी पुन्हा स्थलांतर होऊ लागले आहे. विशेषत: महाराष्ट्रातील पुणे, औरंगाबाद शहराकडे सर्वात जास्त स्थलांतर होत आहे. त्याखालोखाल मुंबई, नंतर नाशिक आणि नागपूर या शहरांत मोठ्या संख्येने कामगार पुन्हा परतू लागले आहेत.

मुले मोठ्या शहरांमध्ये; चिंता पालकांना

मी मूळचा बोरी अडगाव आहे. माझी नोकरी पुणे येथे आहे. गतवर्षी लॉकडाऊनच्या काळात कंपनीने वर्क फ्रॉम होम करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी गावी आलो आणि तिथूनच जवळपास यंदाच्या मार्च, जूनपर्यंत काम केले. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कंपनीने कामावर परत येण्यास सांगितले आहे. जूनमध्ये पुणे येथून परतलो, कोरोनाचा प्रभाव कमी झालेला असला तरी तो गेलेला नाही. त्यामुळे कुटुंब थोडे काळजीत आहे, पण संसर्ग टाळण्यासाठी आवश्यक ती काळजी घेत काम सुरू आहे. यामुळेच आतापर्यंत कोरोनापासून दूर राहता आले.

- मोरेश्वर पाटील, नोकरदार

माझा मुलगा गेल्या तीन वर्षांपासून दिल्लीतील एका चांगल्या पदावर काम करीत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाल्याने दिवसागणिक काळजी वाढत होती. यामुळे आम्ही त्याला घरी येण्यास सांगितले. तरी काही दिवस तो तेथेच राहिला, मात्र कंपनीनेच वर्क फ्रॉम होमला मुभा दिली. यानंतर तो घरी आला आणि जूनपर्यंत घरूनच काम सुरू होते. आता कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने कंपनीचे बाेलावणे आल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात तो पुन्हा मुंबईत गेला आहे. आता तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त होत असल्याने काळजी वाटत आहे.

- नंदाबाई सुरवाडे, गृहिणी