शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

शिक्षकांच्या समस्या सोडवा!

By admin | Updated: July 17, 2017 02:05 IST

गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: शिक्षण हा राज्याच्या व्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षण पद्धतीवर देशाचे अथवा राज्याचे उज्ज्वल भविष्य अवलंबून असते. या पद्धतीचा शिक्षक हा कणा आहे. त्यामुळे कणा मजबूत असणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या समस्या तातडीने सोडवून त्यांना ज्ञानदानाचे कार्य करणे सहज करावे, असे आदेश गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज अधिकाऱ्यांना दिले.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी शिक्षकांच्या समस्या सोडविताना राज्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष उमा तायडे, मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, शिक्षण उपसंचालक राठोड, माजी आमदार धृपतराव सावळे, सभापती श्वेता महाले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी एन.के. देशमुख, शिवचंद्र तायडे आदी उपस्थित होते. शिक्षकांचे पगार वेळेवर करण्याच्या सूचना करीत राज्यमंत्री पाटील म्हणाले, पगारासाठी शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागू नये. तसेच एमसीव्हीसी कनिष्ठ, माध्यमिक व प्राथमिक शिक्षकांना वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करावी. या वेतनश्रेणीस पात्र असलेल्या शिक्षकांना त्वरित वेतनश्रेणी द्यावी. त्याचप्रमाणे शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक विहित कालावधीत अदा करावे. या देयकांसाठी विहित कालावधीत अंमलबजावणी कार्यक्रम ठरवावा. याप्रसंगी शिक्षकांनी विविध समस्या मांडल्या. त्यामध्ये चटोपाध्याय प्रलंबित प्रकरणे, अंशदायी निवृत्तीवेतन योजना बंद करून जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करणे, अंशदायी निवृत्तीवेतन योजनेत कपात झालेल्या निधीबाबत पावत्या देणे आदी प्रश्नांचा समावेश होता. सर्व प्रश्न त्वरित सोडविण्याचे आश्वासन देत काही प्रश्न जागेवरच ना. पाटील यांनी सोडविले. या सभेचे संचालन अंजली नेटके यांनी केले. सभेला उपशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या विचार सभेला जिल्ह्यातील शिक्षकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. काही शिक्षकांनी निवेदने देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.