शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

सैनिकांना रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच !

By admin | Updated: August 26, 2015 00:34 IST

वन रँक वन पेन्शन; सैनिकांचा सन्मान ठेवण्यासाठी ही मागणी मान्यच व्हावी.

बुलडाणा : सैनिकांचे काम देशसेवा आहे. जोपर्यंंत तो सैन्यात असतो तोपर्यंंत त्याच्या घरादाराचा विचारही त्याच्या मनात शिवत नाही. आयुष्यातील उमेदीची वर्ष तो सैन्यात घालवितो व ज्यावेळी सैन्यातून नवृत्त होतो त्यावेळी त्याचे मुलेही कमावती झालेली नसतात. अशा वेळी त्याला मिळणारी पेन्शन हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे; मात्र वाढती महागाई व तो देत असलेली सेवा याचा ताळमेळ पेन्शनमध्ये बसत नाही. आधी नवृत्त झालेल्या सैनिकांवर पेन्शनच्या बाबतीत खूप मोठा अन्याय झाला असल्याने वन रँक वन पेन्शन हाच एकमेव मार्ग आहे. जे सैनिक देशासाठी बलिदानास तयार होतात त्याच सैनिकांना पेन्शनसाठी रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली. लोकमत जिल्हा कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत या संदर्भात अतिशय भावनिक मुद्दे उपस्थित करण्यात आले. चर्चेची सुरुवात करताना सुभेदार मेजर के.डी.जाधव यांनी तीन युद्धात सहभाग घेतलेला एक सैनिक सध्या मोळय़ा विकण्याचे काम करतो, ही व्यथा सांगितली. तो सैनिक नवृत्त झाल्यानंतर त्याला मिळणारी पेन्शन व आज नवृत्त झालेल्या त्याच्याच दर्जाच्या सैनिकाला मिळणारी पेन्शन यामध्ये खूप अंतर असल्याने एकाला मोळय़ा विकाव्या लागतात, हे स्पष्ट करून वन रँक वन पेन्शनचा मुद्दा प्रकर्षाने पटवून दिला. कप्टन अशोक राऊत यांनी विविध देशातील सैनिकांच्या पेन्शनचे त्यांना मिळणार्‍या सन्मान व नवृत्तीनंतरच्या सुख-सोयीची उदाहरणे देत वन रँक वन पेन्शनचे महत्त्व स्पष्ट केले. एखादा सैनिक शवपेटीत आला तर त्याच्या सन्मानासाठी सर्व गाव गोळा होते. सर्व अधिकारी, नेते मानवंदना देण्यासाठी येतात; पण तोच सैनिक दररोज जीवनाशी संघर्ष करीत मरणयातना सोसतो त्याच्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे. ते होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली. सेवानवृत्त हवालदार विनायक माधवराव अनाळकर यांनी सुभेदार मोतीराम चिंचोले यांनीही विविध प्रसंग सांगून पेन्शनर सैनिकांच्या व्यथा विषद केल्या. सैनिकीसेवेतून नवृत्त झाल्यानंतर सैनिकांना मिळणार्‍या नोकर्‍या या गार्ड सदृश सेवेच्याच असतात. त्यांचा कोणी सन्मानही ठेवत नाही. शौर्यचक्रही विजेता गार्ड झाल्यावर त्याच्याशी वागणूकही नोकराप्रमाणे असते, अशा सैनिकांचा आत्मसन्मान जपण्यासाठी वन रँक वन पेन्शन मिळाले तर सैनिकांचे जीवनमान व कुटुंबाचे राहणीमान उंचावेल, हालाखीच्या परिस्थितीत त्यांना जगावे लागणार नाही, अशी भावना व्यक्त झाली.