शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

सैनिकांना रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच !

By admin | Updated: August 26, 2015 00:34 IST

वन रँक वन पेन्शन; सैनिकांचा सन्मान ठेवण्यासाठी ही मागणी मान्यच व्हावी.

बुलडाणा : सैनिकांचे काम देशसेवा आहे. जोपर्यंंत तो सैन्यात असतो तोपर्यंंत त्याच्या घरादाराचा विचारही त्याच्या मनात शिवत नाही. आयुष्यातील उमेदीची वर्ष तो सैन्यात घालवितो व ज्यावेळी सैन्यातून नवृत्त होतो त्यावेळी त्याचे मुलेही कमावती झालेली नसतात. अशा वेळी त्याला मिळणारी पेन्शन हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे; मात्र वाढती महागाई व तो देत असलेली सेवा याचा ताळमेळ पेन्शनमध्ये बसत नाही. आधी नवृत्त झालेल्या सैनिकांवर पेन्शनच्या बाबतीत खूप मोठा अन्याय झाला असल्याने वन रँक वन पेन्शन हाच एकमेव मार्ग आहे. जे सैनिक देशासाठी बलिदानास तयार होतात त्याच सैनिकांना पेन्शनसाठी रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली. लोकमत जिल्हा कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत या संदर्भात अतिशय भावनिक मुद्दे उपस्थित करण्यात आले. चर्चेची सुरुवात करताना सुभेदार मेजर के.डी.जाधव यांनी तीन युद्धात सहभाग घेतलेला एक सैनिक सध्या मोळय़ा विकण्याचे काम करतो, ही व्यथा सांगितली. तो सैनिक नवृत्त झाल्यानंतर त्याला मिळणारी पेन्शन व आज नवृत्त झालेल्या त्याच्याच दर्जाच्या सैनिकाला मिळणारी पेन्शन यामध्ये खूप अंतर असल्याने एकाला मोळय़ा विकाव्या लागतात, हे स्पष्ट करून वन रँक वन पेन्शनचा मुद्दा प्रकर्षाने पटवून दिला. कप्टन अशोक राऊत यांनी विविध देशातील सैनिकांच्या पेन्शनचे त्यांना मिळणार्‍या सन्मान व नवृत्तीनंतरच्या सुख-सोयीची उदाहरणे देत वन रँक वन पेन्शनचे महत्त्व स्पष्ट केले. एखादा सैनिक शवपेटीत आला तर त्याच्या सन्मानासाठी सर्व गाव गोळा होते. सर्व अधिकारी, नेते मानवंदना देण्यासाठी येतात; पण तोच सैनिक दररोज जीवनाशी संघर्ष करीत मरणयातना सोसतो त्याच्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे. ते होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली. सेवानवृत्त हवालदार विनायक माधवराव अनाळकर यांनी सुभेदार मोतीराम चिंचोले यांनीही विविध प्रसंग सांगून पेन्शनर सैनिकांच्या व्यथा विषद केल्या. सैनिकीसेवेतून नवृत्त झाल्यानंतर सैनिकांना मिळणार्‍या नोकर्‍या या गार्ड सदृश सेवेच्याच असतात. त्यांचा कोणी सन्मानही ठेवत नाही. शौर्यचक्रही विजेता गार्ड झाल्यावर त्याच्याशी वागणूकही नोकराप्रमाणे असते, अशा सैनिकांचा आत्मसन्मान जपण्यासाठी वन रँक वन पेन्शन मिळाले तर सैनिकांचे जीवनमान व कुटुंबाचे राहणीमान उंचावेल, हालाखीच्या परिस्थितीत त्यांना जगावे लागणार नाही, अशी भावना व्यक्त झाली.