शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांना रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच !

By admin | Updated: August 26, 2015 00:34 IST

वन रँक वन पेन्शन; सैनिकांचा सन्मान ठेवण्यासाठी ही मागणी मान्यच व्हावी.

बुलडाणा : सैनिकांचे काम देशसेवा आहे. जोपर्यंंत तो सैन्यात असतो तोपर्यंंत त्याच्या घरादाराचा विचारही त्याच्या मनात शिवत नाही. आयुष्यातील उमेदीची वर्ष तो सैन्यात घालवितो व ज्यावेळी सैन्यातून नवृत्त होतो त्यावेळी त्याचे मुलेही कमावती झालेली नसतात. अशा वेळी त्याला मिळणारी पेन्शन हेच त्याच्या उपजीविकेचे साधन आहे; मात्र वाढती महागाई व तो देत असलेली सेवा याचा ताळमेळ पेन्शनमध्ये बसत नाही. आधी नवृत्त झालेल्या सैनिकांवर पेन्शनच्या बाबतीत खूप मोठा अन्याय झाला असल्याने वन रँक वन पेन्शन हाच एकमेव मार्ग आहे. जे सैनिक देशासाठी बलिदानास तयार होतात त्याच सैनिकांना पेन्शनसाठी रस्त्यावर यावे लागणे हे दुर्दैवच असल्याची भावना माजी सैनिकांनी व्यक्त केली. लोकमत जिल्हा कार्यालयात मंगळवारी आयोजित परिचर्चेत या संदर्भात अतिशय भावनिक मुद्दे उपस्थित करण्यात आले. चर्चेची सुरुवात करताना सुभेदार मेजर के.डी.जाधव यांनी तीन युद्धात सहभाग घेतलेला एक सैनिक सध्या मोळय़ा विकण्याचे काम करतो, ही व्यथा सांगितली. तो सैनिक नवृत्त झाल्यानंतर त्याला मिळणारी पेन्शन व आज नवृत्त झालेल्या त्याच्याच दर्जाच्या सैनिकाला मिळणारी पेन्शन यामध्ये खूप अंतर असल्याने एकाला मोळय़ा विकाव्या लागतात, हे स्पष्ट करून वन रँक वन पेन्शनचा मुद्दा प्रकर्षाने पटवून दिला. कप्टन अशोक राऊत यांनी विविध देशातील सैनिकांच्या पेन्शनचे त्यांना मिळणार्‍या सन्मान व नवृत्तीनंतरच्या सुख-सोयीची उदाहरणे देत वन रँक वन पेन्शनचे महत्त्व स्पष्ट केले. एखादा सैनिक शवपेटीत आला तर त्याच्या सन्मानासाठी सर्व गाव गोळा होते. सर्व अधिकारी, नेते मानवंदना देण्यासाठी येतात; पण तोच सैनिक दररोज जीवनाशी संघर्ष करीत मरणयातना सोसतो त्याच्यासाठी समाजाने एकत्र आले पाहिजे. ते होताना दिसत नाही, अशी खंत व्यक्त केली. सेवानवृत्त हवालदार विनायक माधवराव अनाळकर यांनी सुभेदार मोतीराम चिंचोले यांनीही विविध प्रसंग सांगून पेन्शनर सैनिकांच्या व्यथा विषद केल्या. सैनिकीसेवेतून नवृत्त झाल्यानंतर सैनिकांना मिळणार्‍या नोकर्‍या या गार्ड सदृश सेवेच्याच असतात. त्यांचा कोणी सन्मानही ठेवत नाही. शौर्यचक्रही विजेता गार्ड झाल्यावर त्याच्याशी वागणूकही नोकराप्रमाणे असते, अशा सैनिकांचा आत्मसन्मान जपण्यासाठी वन रँक वन पेन्शन मिळाले तर सैनिकांचे जीवनमान व कुटुंबाचे राहणीमान उंचावेल, हालाखीच्या परिस्थितीत त्यांना जगावे लागणार नाही, अशी भावना व्यक्त झाली.