शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

राहेरीच्या नव्या पुलासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

दरम्यान, मुख्य पुलासह राहेरी गावाजवळून जाणारा जुना नागपूर डाक लाईन हा वळण रस्ता व वळण रस्त्यावरील नदीवरील पुलाचे काम ...

दरम्यान, मुख्य पुलासह राहेरी गावाजवळून जाणारा जुना नागपूर डाक लाईन हा वळण रस्ता व वळण रस्त्यावरील नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. तीन महिन्यांत हे काम संपवून मुख्य पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या भागातील नागरिकांची भावना लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जुन्या पुलाचे नूतनीकरण व नवीन वळण रस्ता, पुलासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

जालना ते वर्धा पुढे नागपूर जाणारा हा रस्ता २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे तेव्हापासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती राष्ट्रीय प्राधिकरणाकडून करण्यात येते. दरम्यान, राहेरी पुलासाठी निधी मजूर झाल्यानंतर राष्ट्रीय प्राधिकरणाने पुन्हा हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहे. निविदा प्रक्रिया सार्वजनिक विभागाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

मुख्य पुलाच्या कामासाठी ४.२४ कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. वळण रस्ता व त्यातील पूल या कामांसाठी ३ कोटी ९४ लाख रुपये तर अन्य नळकांडी पूल व इतर कामांसाठी १२ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

--नागरिकांनी सहकार्य करावे--

जुना नागपूर डाक लाईन रस्ता गेल्या अनेक वर्षांत दुर्लक्षित आहे. नवीन वळण रस्ता याचमार्गे केला जात आहे. या रस्त्यावर अनेकांच्या जमिनी आहेत; परंतु जुना रस्ता मोकळा करून घेण्यासाठी बांधकाम विभाग मोजणी प्रक्रिया राबविणार असल्याने या कामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी. यु. शेळके यांनी केले आहे.

--जुने पिलर नवीन ढाच्या--

राहेरी येथील मुख्य पूल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हा पूल जड वाहतुकीसाठी अयोग्य असल्याने आतापर्यंत तीनवेळा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सध्या देखील हा पूल जड वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे सांगण्यात येते; परंतु या ऑडिटमध्ये नेमके काय दडलेले आहे याचा उलगडा कधीच झाला नाही. त्यामुळे या ऑडिटबद्दल शंका उपस्थित केली जाते. अर्थात जीवितहानी होऊ नये हाच या मागचा उद्देश आहे, असे असले तरीही आता पुलाचे काम ज्या पद्धतीने होणार आहे त्याची उत्तरे मिळणे अपेक्षित आहेत.

राहेरीचा मुख्य पूल जर नादुरूस्त आहे? तर जुने पिलर कायम ठेवून फक्त वरचा ढाचा का बदलला जात आहे?

पुलाची सध्याची उंची ही नदीला येणाऱ्या पुरामुळे वाढवलेली आहे. आता उशाशी धरण असताना या पुलाची उंची कमी करण्यात का येत नाही? जे जुने पिलर कायम ठेवले जाणार आहे ते मजबूत आहेत आणि नवीन ढाचा पेलू शकतील इतके सक्षम आहेत का?

जालना-नागपूर या रस्त्याची कामे सध्या सुरू आहे. रस्ता काही मीटर वाढविला जात आहे तर मग पुलाची रूंदी वाढविण्याचे प्रावधान का नाही? असे प्रश्नही जनसामान्यांना पडले आहेत.