शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

राहेरीच्या नव्या पुलासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

दरम्यान, मुख्य पुलासह राहेरी गावाजवळून जाणारा जुना नागपूर डाक लाईन हा वळण रस्ता व वळण रस्त्यावरील नदीवरील पुलाचे काम ...

दरम्यान, मुख्य पुलासह राहेरी गावाजवळून जाणारा जुना नागपूर डाक लाईन हा वळण रस्ता व वळण रस्त्यावरील नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. तीन महिन्यांत हे काम संपवून मुख्य पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या भागातील नागरिकांची भावना लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जुन्या पुलाचे नूतनीकरण व नवीन वळण रस्ता, पुलासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

जालना ते वर्धा पुढे नागपूर जाणारा हा रस्ता २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे तेव्हापासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती राष्ट्रीय प्राधिकरणाकडून करण्यात येते. दरम्यान, राहेरी पुलासाठी निधी मजूर झाल्यानंतर राष्ट्रीय प्राधिकरणाने पुन्हा हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहे. निविदा प्रक्रिया सार्वजनिक विभागाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

मुख्य पुलाच्या कामासाठी ४.२४ कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. वळण रस्ता व त्यातील पूल या कामांसाठी ३ कोटी ९४ लाख रुपये तर अन्य नळकांडी पूल व इतर कामांसाठी १२ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

--नागरिकांनी सहकार्य करावे--

जुना नागपूर डाक लाईन रस्ता गेल्या अनेक वर्षांत दुर्लक्षित आहे. नवीन वळण रस्ता याचमार्गे केला जात आहे. या रस्त्यावर अनेकांच्या जमिनी आहेत; परंतु जुना रस्ता मोकळा करून घेण्यासाठी बांधकाम विभाग मोजणी प्रक्रिया राबविणार असल्याने या कामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी. यु. शेळके यांनी केले आहे.

--जुने पिलर नवीन ढाच्या--

राहेरी येथील मुख्य पूल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हा पूल जड वाहतुकीसाठी अयोग्य असल्याने आतापर्यंत तीनवेळा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सध्या देखील हा पूल जड वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे सांगण्यात येते; परंतु या ऑडिटमध्ये नेमके काय दडलेले आहे याचा उलगडा कधीच झाला नाही. त्यामुळे या ऑडिटबद्दल शंका उपस्थित केली जाते. अर्थात जीवितहानी होऊ नये हाच या मागचा उद्देश आहे, असे असले तरीही आता पुलाचे काम ज्या पद्धतीने होणार आहे त्याची उत्तरे मिळणे अपेक्षित आहेत.

राहेरीचा मुख्य पूल जर नादुरूस्त आहे? तर जुने पिलर कायम ठेवून फक्त वरचा ढाचा का बदलला जात आहे?

पुलाची सध्याची उंची ही नदीला येणाऱ्या पुरामुळे वाढवलेली आहे. आता उशाशी धरण असताना या पुलाची उंची कमी करण्यात का येत नाही? जे जुने पिलर कायम ठेवले जाणार आहे ते मजबूत आहेत आणि नवीन ढाचा पेलू शकतील इतके सक्षम आहेत का?

जालना-नागपूर या रस्त्याची कामे सध्या सुरू आहे. रस्ता काही मीटर वाढविला जात आहे तर मग पुलाची रूंदी वाढविण्याचे प्रावधान का नाही? असे प्रश्नही जनसामान्यांना पडले आहेत.