शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

राहेरीच्या नव्या पुलासाठी सहा महिन्यांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

दरम्यान, मुख्य पुलासह राहेरी गावाजवळून जाणारा जुना नागपूर डाक लाईन हा वळण रस्ता व वळण रस्त्यावरील नदीवरील पुलाचे काम ...

दरम्यान, मुख्य पुलासह राहेरी गावाजवळून जाणारा जुना नागपूर डाक लाईन हा वळण रस्ता व वळण रस्त्यावरील नदीवरील पुलाचे काम सध्या सुरू आहे. तीन महिन्यांत हे काम संपवून मुख्य पुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या भागातील नागरिकांची भावना लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून जुन्या पुलाचे नूतनीकरण व नवीन वळण रस्ता, पुलासाठी ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.

जालना ते वर्धा पुढे नागपूर जाणारा हा रस्ता २०१८ मध्ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला आहे तेव्हापासून या रस्त्याची देखभाल दुरुस्ती राष्ट्रीय प्राधिकरणाकडून करण्यात येते. दरम्यान, राहेरी पुलासाठी निधी मजूर झाल्यानंतर राष्ट्रीय प्राधिकरणाने पुन्हा हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केले आहे. निविदा प्रक्रिया सार्वजनिक विभागाने पूर्ण करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.

मुख्य पुलाच्या कामासाठी ४.२४ कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. वळण रस्ता व त्यातील पूल या कामांसाठी ३ कोटी ९४ लाख रुपये तर अन्य नळकांडी पूल व इतर कामांसाठी १२ लाख रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला आहे.

--नागरिकांनी सहकार्य करावे--

जुना नागपूर डाक लाईन रस्ता गेल्या अनेक वर्षांत दुर्लक्षित आहे. नवीन वळण रस्ता याचमार्गे केला जात आहे. या रस्त्यावर अनेकांच्या जमिनी आहेत; परंतु जुना रस्ता मोकळा करून घेण्यासाठी बांधकाम विभाग मोजणी प्रक्रिया राबविणार असल्याने या कामात नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन बांधकाम विभागाचे शाखा अभियंता डी. यु. शेळके यांनी केले आहे.

--जुने पिलर नवीन ढाच्या--

राहेरी येथील मुख्य पूल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. हा पूल जड वाहतुकीसाठी अयोग्य असल्याने आतापर्यंत तीनवेळा हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. सध्या देखील हा पूल जड वाहतुकीसाठी बंद आहे. पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्याचे सांगण्यात येते; परंतु या ऑडिटमध्ये नेमके काय दडलेले आहे याचा उलगडा कधीच झाला नाही. त्यामुळे या ऑडिटबद्दल शंका उपस्थित केली जाते. अर्थात जीवितहानी होऊ नये हाच या मागचा उद्देश आहे, असे असले तरीही आता पुलाचे काम ज्या पद्धतीने होणार आहे त्याची उत्तरे मिळणे अपेक्षित आहेत.

राहेरीचा मुख्य पूल जर नादुरूस्त आहे? तर जुने पिलर कायम ठेवून फक्त वरचा ढाचा का बदलला जात आहे?

पुलाची सध्याची उंची ही नदीला येणाऱ्या पुरामुळे वाढवलेली आहे. आता उशाशी धरण असताना या पुलाची उंची कमी करण्यात का येत नाही? जे जुने पिलर कायम ठेवले जाणार आहे ते मजबूत आहेत आणि नवीन ढाचा पेलू शकतील इतके सक्षम आहेत का?

जालना-नागपूर या रस्त्याची कामे सध्या सुरू आहे. रस्ता काही मीटर वाढविला जात आहे तर मग पुलाची रूंदी वाढविण्याचे प्रावधान का नाही? असे प्रश्नही जनसामान्यांना पडले आहेत.