शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्यूच्या तापामुळे मृत्यू! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:45 IST

बुलडाणा : शहरापासून अगदी जवळ असलेल्या कोलवड येथे  एका सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्युच्या आजारामुळे मृत्यू झाला  आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  पसरले आहे. बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर  कारवाई करून गावात साफसफाई अभियान राबविण्यात यावे,  अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

ठळक मुद्देगावात साफसफाई करण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शहरापासून अगदी जवळ असलेल्या कोलवड येथे  एका सहा महिन्याच्या बाळाचा डेंग्युच्या आजारामुळे मृत्यू झाला  आहे. या घटनेमुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण  पसरले आहे. बालकाच्या मृत्यूस जबाबदार असणार्‍यांवर  कारवाई करून गावात साफसफाई अभियान राबविण्यात यावे,  अशी मागणी ग्रामस्थांनी मंगळवारी एका निवेदनाद्वारे जिल्हा  परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. कोलवड येथील अर्णव सागर जाधव या सहा महिन्याच्या  बालकास ताप येत असल्याने त्याला २३ सप्टेंबर रोजी येथील  डॉ.जाधव यांच्या सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ भरती  करण्यात आले होते; परंतु त्याचा ताप उतरत नसल्याने  डॉ.जाधव यांनी चेकअप करून त्याला डेंग्यूचा ताप असल्याची  शक्यता वर्तविली. त्यामुळे २६ सप्टेंबर रोजी अर्णवला तातडीने  औरंगाबाद येथील अमृत बाल रुग्णालयात दाखल करण्यात  आले. तेथील डॉक्टरांनी त्याच्या विविध तपासण्या करून त्याला  डेंग्यू असल्याचे सांगितले. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात  आले; परंतु २९ सप्टेंबर रोजी त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू  झाला. मागील काही दिवसांपासून गावात मोठय़ा प्रमाणावर  डासांचे प्रमाण वाढले आहे. आरोग्य कर्मचार्‍यांचे गावाकडे लक्ष  नाही. पावसाळ्यात साचलेल्या गटारामध्ये गप्पी मासे सोडण्यात  आले नाही. आरोग्य कर्मचारी एका तासासाठी गावात येऊन  पसार होतात. त्यामुळे एका सहा महिन्याच्या बालकाला जीव  गमवावा लागला आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करून गावात साफसफाई करण्यात  यावी, अशी मागणी शंकर जाधव, प्रकाश जाधव, संजय  जाधव, विनोद जाधव, नाजुकराव जाधव, भुजंगराव जाधव,  गुलाबराव जाधव, ओंकार जाधव, शेषराव हिवाळे, राजू  जाधव, प्रकाश जाधव, सागर जाधव, भानुराव जाधव, गजानन  जाधव, संदीप जाधव, बाबूराव जाधव, प्रभाकर वैद्य, योगेश  जाधव, नितीन सपकाळ, अनंता वैद्य या ग्रामस्थांनी केली आहे.