शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: पुणे जिल्ह्यात तीन महापालिका होणार; चाकण, हिंजवडी आणि..., अजित पवारांची मोठी घोषणा
2
मी सापाच्या तीन पिल्लांना जन्म दिला; महिलेच्या दाव्याने खळबळ, समजताच गर्दी जमू लागली...
3
सुप्रीम कोर्टाचा १ निर्णय अन् अलाहाबाद हायकोर्टचे १३ न्यायाधीश नाराज; मुख्य न्यायाधीशांना पत्र
4
डोनाल्ड ट्रम्प यांना सुधरेना...! ५० टक्के टॅरिफवर देखील काहीच प्रतिक्रिया नाही, आता चर्चा बंद केल्याची घोषणा...
5
Intel CEO Lip Bu Tan Networth: कोण आहेत लिप-बू टॅन, ज्यांच्या मागे हात धुवून पडलेत डोनाल्ड ट्रम्प, किती संपत्तीचे मालक?
6
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
7
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी घसरण; सेन्सेक्स १४५ आणि निफ्टी ५२ अंकांच्या घसरणीसह उघडले
8
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
9
अत्याचाराच्या प्रकरणातून सोडवण्यासाठी अजितदादांच्या आमदाराला फोन; उपमुख्यमंत्री म्हणाले, 'तुमची जीभ कशी रेटते'
10
Trump Tariff On India: ट्रम्प यांचं टॅरिफ संधी ठरू शकते का? कॉर्पोरेट इंडिया म्हणतोय भारत बनू शकतो नवा 'पॉवरहाऊस'
11
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
12
सिद्धिविनायकाच्या दर्शनाला लॅपटॉप, कॅमेरा साेबत नकाे
13
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
14
डबल जॉली, डबल ट्रबल! सौरभ शुक्लांनी दिलं 'जॉली एलएलबी ३'चं मोठं अपडेट, कधी रिलीज होणार?
15
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
16
नेपाळची सक्ती; किमान ३ मुलांना जन्म द्या!
17
रक्षाबंधन २०२५: राखी बांधताना तुमच्याकडून ‘ही’ चूक तर होत नाही ना? पाहा, योग्य पद्धत-नियम
18
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
19
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
20
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!

अंढेरासह परिसरातील पिके पावसाअभावी सुकू लागली!

By admin | Updated: July 12, 2017 00:52 IST

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट

लोकमत न्यूज नेटवर्कअंढेरा : परिसरात आतापर्यंत सर्वसाधारण पाऊस झाला असून, गेल्या १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने अंढेरा गावासह, सेवानगर, पिंप्री आंधळे, मेंडगाव, बायगाव बु., पाडळी शिंदे, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे या गावासह परिसरात सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर ही पिके पावसाअभावी सुकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. सुरुवातीला परिसरात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी महागडे बी. बियाणे, खते खरेदी करून संपूर्ण पेरणी केली. जून महिन्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील पिकांची वाढ जोमाने झाली. सध्या सगळीकडे पिके बहरून डोलायला लागल्याने शेतकरी वर्ग आनंदात असताना अचानक पावसाने दीर्घ दांडी मारल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत आहे. पंधरा दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके पिवळी पडू लागली असून, पिकांचे पाते झडणे, वाढ खुंटणे यासह पिके सुकू लागली असून, लवकरात लवकर पाऊस न आल्यास शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहणार असून, शेतकऱ्यांच्या समोर आर्थिक प्रश्न उभा असणार आहे. सोयाबीन, मका, उडीद, मूग या पिकांची मुळे जमिनीत खोलवर असल्याने या पिकांना सतत पाण्याची आवश्यकता असते. शेतकऱ्यांनी पिकांना वाचविण्यासाठी आपआपल्या परिने सिंचनाचे पाणी देणे सुरू केले असून, खरिपाचा पेरा मोठा असल्याने दमदार पाऊस न झाल्यास मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या १ ते २ हप्त्यात पावसाने हजेरी न लावल्यास शेतकऱ्यांच्या चिंतेत फार मोठी भर पडणार आहे. वन्य प्राणी बनले शेतकऱ्यांची डोकेदुखी!अंढेरासह परिसरातील सोयाबीन, तूर, मका, उदीद, मूग ही पिके सर्वसाधारण असून, परिसरातील वन्य प्राणी, हरिण, रोही पिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, वन्य प्राण्यांचे मोठे कळप असल्याने शेतकऱ्यांची उभी पिके फस्त करीत आहेत, तरी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अंढेरासह परिसरातील शेतकरी वर्ग करीत आहे.