शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

सिंदखेडराजात सिमेंट बंधा-याचे काम अर्धवट!

By admin | Updated: March 22, 2017 01:50 IST

कारवाई करण्याची जलसंधारण मंत्रालयाकडे मागणी.

सिंदखेडराजा, दि. २१- तालुक्यातील वडाळी शिवारात सिमेंट बांधाचे काम अर्धवट करुन देयके काढण्यात आल्याचा आरोप करीत संबंधितांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी रामदास कहाळे यांनी जलसंधारण मंत्रालय, मुंबई येथे दिलेल्या निवेदनातून केली आहे.आडगावराजा येथील रामदास मानसिंग कहाळे यांनी यासंदर्भात २0 मार्चला मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह, जलसंधारण मंत्री तसेच सचिव यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील वडाळी शिवारात ग्रामविकास व जलसंधारण लघुसिंचन विभागामार्फत सन २0१५ मध्ये तीन सिमेंट बांध मंजूर करण्यात आले होते. त्यानुसार जल व भूमी संधारण होऊन शेतकर्‍यांना उपयोगी बंधारे बांधकाम होण्याची अपेक्षा होती; मात्र ठेकेदार व संबंधित अधिकारी यांनी संगनमत करीत काम इस्टीमेट प्रमाणे केले नाही. तसेच माळरानाचा दगड वापरत तीनही सिमेंट बांधाची कामे थातुरमातूर करीत निकृष्ट दर्जाची केलेली आहेत. सदर कामामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करुन, या सिमेंट बांधांचे अंकेक्षण करीत सक्षम अधिकार्‍यांकडून चौकशी करावी. तसेच निकृष्ट बांधकामे करुन शेतकर्‍यांची क्रूर चेष्टा करणार्‍या संबंधित अभियंत्यास तत्काळ निलंबित करावे, तसेच कंत्राटदाराकडून रक्कम वसुली करण्यात येऊन, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच कंत्राटदाराचा परवाना रद्द करण्यात यावा, अशी मागणी रामदास मानसिंग कहाळे यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनामुळे तालुक्यातील जलयुक्त शिवार कामातील फोलपणा चव्हाट्यावर आला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.