शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कृषी संजीवनी योजनेला अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: November 14, 2014 00:17 IST

खामगाव तालुक्यातील ४२ हजार पात्र, मात्र केवळ १४८३ शेतक-यांनीच घेतला लाभ.

खामगाव (बुलडाणा): कृषी वीज पंपाची असलेली मोठय़ा प्रमाणात थकबाकी व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांची असलेली बिकट आर्थिक परिस्थिती पाह ता वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली हो ती. मात्र ३१ ऑक्टोबर या मुदतअखेर सदर योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांची आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. वीज वितरण कंपनीच्या खामगाव उपविभागात ५२ हजाराचे आसपास कृषी जोडणी असून यापैकी तब्बल ४२ हजार ५१२ कृषीपंपधारकांकडे वीज थकबाकी झाली आहे. मात्र या योजने अं तर्गत ३१ ऑक्टोबर या योजनेच्या अखेरपर्यंंत ४२ हजार ५१२ पात्र शेतकर्‍यांपैकी फक्त १४८३ शेतकर्‍यांनी थकबाकीचा भरणा केला. एकूण थकबाकी ७३३९.२३ लाख असताना भरणा फक्त ५७.३६ लाखाचाच झाला आहे. त्यामुळे झालेली वसुली नाहीसारखीच आहे. गतवर्षी सुध्दा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकर्‍यांचे अतोना त नुकसान झाले होते. त्यामुळे कोठे दुष्काळ तर कोठे दुष्काळसदृश परिस्थिती शासनाकडून सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आली. दुष्काळाच्या निकषानुसार शेतकर्‍यांना इतर योजनांसोबतच थकीत कृषी बिल भरता यावे, कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत शे तकर्‍यांना थकीत रक्कमेवरील व्याजमाफी तसेच बिलातही काही टक्के सूट देण्यात आली. तसेच थकबाकी भरण्यासाठी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान तीन हप्तेवारीत पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र यावर्षी उशीरा झालेला पाऊस त्यामुळे लवकर येणारी उडिद, मूग, तीळ ही पिके शेतकर्‍यांना घेता आली नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. परंतु ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिक असताना पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेंगा परिपक्व होण्याआधीच सोयाबीन वाळल्याने शेतकर्‍यांचा पेरणीचा खर्च सुध्दा निघाला नाही. अशी परिस्थिती असताना शेतकरी कृषी संजीवनी ही चांगली योजना असताना सुध्दा फायदा घेवू शकले नाही. देयक भरण्याबाबत अनास्था होती. त्यामुळे कृषी संजीवनी योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळू शकला नाही.