शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

कृषी संजीवनी योजनेला अत्यल्प प्रतिसाद

By admin | Updated: November 14, 2014 00:17 IST

खामगाव तालुक्यातील ४२ हजार पात्र, मात्र केवळ १४८३ शेतक-यांनीच घेतला लाभ.

खामगाव (बुलडाणा): कृषी वीज पंपाची असलेली मोठय़ा प्रमाणात थकबाकी व निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकर्‍यांची असलेली बिकट आर्थिक परिस्थिती पाह ता वीज वितरण कंपनीने शेतकर्‍यांसाठी कृषी संजीवनी योजना जाहीर केली हो ती. मात्र ३१ ऑक्टोबर या मुदतअखेर सदर योजनेचा लाभ घेणार्‍या शेतकर्‍यांची आकडेवारी कमी असल्याचे दिसून येत आहे. वीज वितरण कंपनीच्या खामगाव उपविभागात ५२ हजाराचे आसपास कृषी जोडणी असून यापैकी तब्बल ४२ हजार ५१२ कृषीपंपधारकांकडे वीज थकबाकी झाली आहे. मात्र या योजने अं तर्गत ३१ ऑक्टोबर या योजनेच्या अखेरपर्यंंत ४२ हजार ५१२ पात्र शेतकर्‍यांपैकी फक्त १४८३ शेतकर्‍यांनी थकबाकीचा भरणा केला. एकूण थकबाकी ७३३९.२३ लाख असताना भरणा फक्त ५७.३६ लाखाचाच झाला आहे. त्यामुळे झालेली वसुली नाहीसारखीच आहे. गतवर्षी सुध्दा परिसरात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे शेतकर्‍यांचे अतोना त नुकसान झाले होते. त्यामुळे कोठे दुष्काळ तर कोठे दुष्काळसदृश परिस्थिती शासनाकडून सर्वेक्षणानंतर जाहीर करण्यात आली. दुष्काळाच्या निकषानुसार शेतकर्‍यांना इतर योजनांसोबतच थकीत कृषी बिल भरता यावे, कृषी संजीवनी योजना जाहीर करण्यात आली. या योजनेअंतर्गत शे तकर्‍यांना थकीत रक्कमेवरील व्याजमाफी तसेच बिलातही काही टक्के सूट देण्यात आली. तसेच थकबाकी भरण्यासाठी जुलै ते ऑक्टोबर दरम्यान तीन हप्तेवारीत पैसे भरण्याची सुविधा देण्यात आली होती. मात्र यावर्षी उशीरा झालेला पाऊस त्यामुळे लवकर येणारी उडिद, मूग, तीळ ही पिके शेतकर्‍यांना घेता आली नाही. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. परंतु ऐन सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत पिक असताना पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे शेंगा परिपक्व होण्याआधीच सोयाबीन वाळल्याने शेतकर्‍यांचा पेरणीचा खर्च सुध्दा निघाला नाही. अशी परिस्थिती असताना शेतकरी कृषी संजीवनी ही चांगली योजना असताना सुध्दा फायदा घेवू शकले नाही. देयक भरण्याबाबत अनास्था होती. त्यामुळे कृषी संजीवनी योजनेचा शेतकर्‍यांना लाभ मिळू शकला नाही.