शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

अमडापूर येथे रस्त्यावर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:35 IST

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने व हे संकट दूर करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना सुरू आहेत. शासनाच्या नियमांचे पालन ...

कोरोना संकट दिवसेंदिवस वाढत असल्याने व हे संकट दूर करण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना सुरू आहेत. शासनाच्या नियमांचे पालन व्हावे, यासाठी शासनाने व्यावसायिकांना व व्यापाऱ्यांना वेळ ठरवून दिलेली आहे. त्यानुसार व्यापाऱ्यांनी वेळेनुसार आपले दुकाने बंद करणे आवश्यक आहे. शासनाला सहकार्य केल्यास कोणत्याही कारवाईला सामोरे जाण्याचे काम पडणार नाही, तसेच नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये व विनाकारण बाहेर फिरू नये, जेणेकरून दुसऱ्याला झालेल्या आजारापासून आपण वाचू शकाल. त्यासाठी आपण आपले स्वतःचे रक्षण करून कुटुंबाचे रक्षण करावे, असे आवाहन ग्रामपंचायतकडून करण्यात आले आहे. अमडापूर ग्रामपंचायत व उंद्री ग्रामपंचायत सरपंच व पोलिसांनी संयुक्त कारवाई करून विना मास्क फिरणाऱ्यांकडून तीन हजार रुपये दंड वसूल केला आहे. त्यामुळे आता कोणताही दंड होऊ नये, यासाठी शासनाला सहकार्य करून नियमाचे पालन करावे, असे आवाहन पोलीस, आरोग्य विभाग व अमडापूर ग्रामपंचायत सरपंच वैशालीताई संजय गवई व उंद्री ग्रामपंचायत सरपंच भाई प्रदीप अंभोरे यांनी केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्यांवर व दिलेल्या वेळेनुसार दुकाने बंद न केल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशा सूचना ठाणेदार अमित वानखेडे यांनी दिल्या आहेत.