शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

दुकाने बंद, रस्त्यावर गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:35 IST

काेरोना विषाणू (कोविड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, लागू करण्यात आलेला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी ...

काेरोना विषाणू (कोविड १९) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, लागू करण्यात आलेला आहे. कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात कोविड-१९ चे अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये ३० एप्रिल २०२१ पर्यंत विशेष निर्बंध लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ५ एप्रिल रोजी दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५ एप्रिल ते ३० एप्रिल, २०२१ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत हा सुधारित आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशानुसार जिल्ह्यामध्ये सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत कलम १४४ अन्वये जमावबंदी लागू आहे. या कालावधीत ५ पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, अनावश्यकरीत्या कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय शहरात व गावात फिरू नये,. या व्यतिरिक्त असलेल्या वेळेत म्हणजेच सोमवार ते शुक्रवार रात्री ८ ते सकाळी ७ पर्यंत व शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत संचारबंदी लागू राहील. या कालावधीत कोणत्याही नागरिकांनी कारणाशिवाय, विहित परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी, बाहेर, शहरात व गावात फिरू नये, आठवडा अखेर शुक्रवार रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ पर्यंत पूर्ण संचारबंदी लागू राहील. संचारबंदी कालावधीमध्ये वैद्यकीय सेवेसह अत्यावश्यक सेवांनाच परवानगी देण्यात आली आहे. या आदेशानंतर जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी व्यापाऱ्यांनी आपले दुकाने बंद ठेवली. परंतु पेट्रोल पंप, अत्यावश्यक सेवा व इतर काही ठिकाणी नागरिकांची गर्दी दिसून आली. पहिल्याच दिवशी नियमाचे उल्लंघन झाल्याचे पाहावयास मिळाले.

आदेशाबाबत संभ्रम

नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये या नवीन आदेशाबाबत संभ्रम दिसून येत आहे. स्थानिक प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही, याबाबत दक्षता घेणे व गर्दी टाळण्याच्या अनुषंगाने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. परंतु नागरिक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करताना दिसून आले.

धार्मिक स्थळे बंद

सर्व प्रकारची धार्मिक स्थळे ६ एप्रिल रोजी बंद दिसून आले. धार्मिक स्थळी कार्यरत असणाऱ्या सर्व प्रकारच्या कर्मचारी, व्यक्ती यांना त्यांची नियमित कामे करण्यास अनुमती आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीस अशा धार्मिक स्थळी येण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत.