शहरं
Join us  
Trending Stories
1
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
2
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
3
“सरसकट भरपाई हाच योग्य मार्ग, एकरी ₹५० हजार इतकी थेट मदत तातडीने मिळाली पाहिजे”: जयंत पाटील
4
पैसे देता म्हणजे उपकार करता का? अजित पवारांच्या विधानावरुन उद्धव ठाकरे संतापले
5
"मतचोरीवरून मीसुद्धा सर्जिकल स्ट्राईक करणार’’, आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा 
6
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
7
एक नंबर! केसांसाठी ग्रीन टी 'वरदान'; गळणं थांबेल अन् चमत्कार दिसेल, फक्त 'असा' करा वापर
8
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
9
IND vs WI: टेस्टच्या नव्या पर्वात 'ओल्ड इज गोल्ड फॉर्म्युला'! जड्डू टीम इंडियाचा 'पार्ट टाइम डेप्युटी'
10
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
11
खऱ्या आयुष्यातला राया..! सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांबद्दल विचारताच लाजली पूजा बिरारी
12
शेअरचा धमाका...! या ₹3.90 च्या स्टॉकनं दिला छप्परफाड परतावा, ₹1 लाखाचे केले ₹2.09 कोटी; तुमच्याकडे आहे का?
13
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
14
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
15
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
16
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
17
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
18
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
19
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
20
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल

शिवसेना व युवासेनेचे मोबाइल टॉवरवर शोले स्टाइल आंदोलन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:23 IST

चिखली : गत काही दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांना मोबाइल रेंजच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराने ऑनलाइन शिक्षण, आरोग्य, ...

चिखली : गत काही दिवसांपासून तालुक्यातील नागरिकांना मोबाइल रेंजच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. या प्रकाराने ऑनलाइन शिक्षण, आरोग्य, शेती आदी सर्वच बाबींच्या सुविधा प्रभावित झाल्या आहेत. तथापि, कॉलड्रॉप होणे व नेटवर्क गायब होणे, या बाबी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. याची दखल घेत शिवसेना व युवासेनेच्या वतीने १० जुलै रोजी आंदोलन करण्यात आले, तर युवासेना तालुका प्रमुख नंदू कऱ्हाडे यांनी मोबाइल टॉवरवर चढून याकडे लक्ष वेधले.

चिखली शहराला लागूनच असलेल्या खोर, माळशेंबा, अंत्री, वाघापूर, चांधई, गोद्री, पळसखेड दौलत, भोकर या गावांमध्ये मोबाइल रेंजची मोठी समस्या आहे. यामुळे ऑनलाइन शिक्षणात अडथळे येत असून, विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. सोबतच आजारपणात तत्काळ सेवा उपलब्ध करून देणाऱ्या १०८ नंबरवरदेखील सामान्य नागरिकांना फोन करता येत नाही. शेतीसह इतर सर्वच क्षेत्रांशी निगडित योजना या ऑनलाइन असल्याने त्यांचा लाभ घेण्यासही नागरिकांना त्रास होत आहे. या समस्यांचा पाढा नागरिकांनी शिवसेना संपर्क कार्यालयात मांडल्यानंतर नंदू कऱ्हाडे यांच्यासह प्रीतम गैची, पप्पू परिहार, आनंद गैची, प्रवीण सरदड, पंकज हाके, प्रदीप माळोदे यांनी पुढाकार घेत खोर येथील टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले. दरम्यान, शिवसेना पदाधिकाऱ्यांनीदेखील यामध्ये सहभाग घेत प्रशासनाचे लक्ष वेधले. यावेळी शिवसेना नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा सहसंपर्क प्रमुख भास्करराव मोरे, उपजिल्हाप्रमुख शिवाजीराव देशमुख, तालुकाप्रमुख कपिल खेडेकर, शहरप्रमुख श्रीराम झोरे, युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर, विलास घोलप, समाधान जाधव, दत्ता देशमुख, मंगेश ठेंग, शेख बबलू, बंटी कपूर, साजीद, सरपंच दीपक पाटील, ज्ञानेश्वर वाघ, पो.पा. सुरेश पाटील, रमेश पाटील, अशोक मोहिते, अंकुश डहाके, राजू लोखंडे, दत्ता मैद, सोमनाथ तायडे, बंटी पांडे, वसंता साखरे, राजू बोरे, राजू कारले, जना पाटील, मदन कारले, बाळू कऱ्हाडे, प्रल्हाद कऱ्हाडे, प्रदीप माळोदे, योगेश डुकरे, गजानन पारवे, दीपक पांडे, प्रदीप वाघ, समाधान मोरे, अमोल मोरे, गोपाल डुकरे, पल्हाद राणा, संजय पवार यांच्यासह बहुसंख्य शेतकरी व विद्यार्थी उपस्थित होते.

आठ दिवसांत समस्या साेडविण्याचे आश्वासन

तहसीलदार येळे यांच्या मध्यस्तीने मोबाइल कंपनीचे प्रतिनिधी पांडे यांना धारेवर धरले असता आठ दिवसांच्या आत मोबाइल टाॅवरची फ्रिक्वेंसी वाढविण्यासह समस्यांचे निराकरण करण्यात येईल, असे आश्वासन संबंधितांनी दिले आहे.