शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

निवारा योजना रखडली

By admin | Updated: June 21, 2014 00:01 IST

शासनाची उदासीनता: घरकुलाचे स्वप्न ठरतेय मृगजळ

नाना हिवराळे / खामगावग्रामीण भागातील कुटूंबासाठी निवारा म्हणून शासन विविध योजना राबवून त्यांना हक्काचे घर देत आहे. दारिद्र रेषेखालील कुटूंबाबरोबरच दारिद्र रेषेवरील कुटूंबांनाही घरकुलाचा लाभ मिळावा करिता शासनाने बँकेच्या सहकार्याने कर्ज स्वरुपात परंतु बिनव्याजी कर्ज देवून राजीव गांधी निवारा योजना-२ सुरु केली होती. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या उदासिन धोरणामुळे तसेच बँकेच्या असहकार्याने या योजनेतील घरकुलाचे स्वप्न मृगजळ ठरले आहे.राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटूंबासाठी घरकूल उपलब्ध करुन देण्यासाठी शासन विविध योजना राबवून घरकूल देत आहे. इंदिरा आवास योजना, पंतप्रधान ग्रामोदय योजना, रमाई घरकूल योजना या योजनामार्फत्र हजारो कुटूंबांना स्वताचे घर मिळाले आहे. रहायला स्वताची जागा असो अथवा नसो अशाही कुटूंबाचे शासकीय जागेवर घरकुल उभे आहे. परंतु अल्प उत्पादनामुळे स्वताचे पक्के घर बांधता येत नाही, जे दारिद्र्य रेषेखालील आहेत अशा अनेक कुटूंबाना या योजनाचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट २00८ मध्ये सुधारीत राजीव गांधी निवारा योजना-२ सुरु केली. या योजनेत बीपीएल अंत्योदयची अट नसल्यामुळे या योजनेचा लाभ सर्व सामान्य जनतेला देण्यात येत होता. शासनाने योजनाचा लाभ देण्यासाठी बँकाचे सहकार्य घेतले होते. लाभार्थ्यांला बँकेकडून १ लाख रुपये कर्जाऊ स्वरुपात देवून त्याची टप्प्याटप्प्याने परतफेड करायची होती. या कर्जाचे व्याज मात्र लाभार्थ्यांना माफ होते. खामगाव पंचायत समिती अंतर्गत सन २0१0-११ मध्ये २१९ लाभार्थी घरकुलाचे प्रस्ताव विविध बँकाकडे पाठविण्यात आले होते. यामधील १४४ घरकूल प्रस्ताव मंजुर करण्यात आले. तर ७५ घरकुलाचे नामंजुर केले. बँकेने परत पाठविलेल्या प्रस्तावात जमीनीचा अकृषक दाखला, सातबारावर जमीन अकृषक असल्याची नोंद, अकृषक प्रमाणपत्र, लाभार्थ्यांना सातबारावर एकापेक्षा अधिक लोकांची नावे, जागेचा नकाशा, चतरु:सिमा दर्शविणार्‍या दस्ताऐवजाचा अभाव, भुखंडाचे पट्टे, नसल्याचे प्रस्ताव नामंजुर करण्यात आले. परिणामी गरजू कुटूबांना या योजनेतील घरकुलापासून वंचीत रहोवे लागले. प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळेच सदर योजना पांढरा हत्ती ठरली आहे.