शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निवारा योजना रखडली

By admin | Updated: June 21, 2014 00:01 IST

शासनाची उदासीनता: घरकुलाचे स्वप्न ठरतेय मृगजळ

नाना हिवराळे / खामगावग्रामीण भागातील कुटूंबासाठी निवारा म्हणून शासन विविध योजना राबवून त्यांना हक्काचे घर देत आहे. दारिद्र रेषेखालील कुटूंबाबरोबरच दारिद्र रेषेवरील कुटूंबांनाही घरकुलाचा लाभ मिळावा करिता शासनाने बँकेच्या सहकार्याने कर्ज स्वरुपात परंतु बिनव्याजी कर्ज देवून राजीव गांधी निवारा योजना-२ सुरु केली होती. मात्र प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या उदासिन धोरणामुळे तसेच बँकेच्या असहकार्याने या योजनेतील घरकुलाचे स्वप्न मृगजळ ठरले आहे.राज्यातील ग्रामीण भागातील दारिद्र्य रेषेखालील कुटूंबासाठी घरकूल उपलब्ध करुन देण्यासाठी शासन विविध योजना राबवून घरकूल देत आहे. इंदिरा आवास योजना, पंतप्रधान ग्रामोदय योजना, रमाई घरकूल योजना या योजनामार्फत्र हजारो कुटूंबांना स्वताचे घर मिळाले आहे. रहायला स्वताची जागा असो अथवा नसो अशाही कुटूंबाचे शासकीय जागेवर घरकुल उभे आहे. परंतु अल्प उत्पादनामुळे स्वताचे पक्के घर बांधता येत नाही, जे दारिद्र्य रेषेखालील आहेत अशा अनेक कुटूंबाना या योजनाचा लाभ घेता येत नाही. त्याकरिता महाराष्ट्र शासनाने ऑगस्ट २00८ मध्ये सुधारीत राजीव गांधी निवारा योजना-२ सुरु केली. या योजनेत बीपीएल अंत्योदयची अट नसल्यामुळे या योजनेचा लाभ सर्व सामान्य जनतेला देण्यात येत होता. शासनाने योजनाचा लाभ देण्यासाठी बँकाचे सहकार्य घेतले होते. लाभार्थ्यांला बँकेकडून १ लाख रुपये कर्जाऊ स्वरुपात देवून त्याची टप्प्याटप्प्याने परतफेड करायची होती. या कर्जाचे व्याज मात्र लाभार्थ्यांना माफ होते. खामगाव पंचायत समिती अंतर्गत सन २0१0-११ मध्ये २१९ लाभार्थी घरकुलाचे प्रस्ताव विविध बँकाकडे पाठविण्यात आले होते. यामधील १४४ घरकूल प्रस्ताव मंजुर करण्यात आले. तर ७५ घरकुलाचे नामंजुर केले. बँकेने परत पाठविलेल्या प्रस्तावात जमीनीचा अकृषक दाखला, सातबारावर जमीन अकृषक असल्याची नोंद, अकृषक प्रमाणपत्र, लाभार्थ्यांना सातबारावर एकापेक्षा अधिक लोकांची नावे, जागेचा नकाशा, चतरु:सिमा दर्शविणार्‍या दस्ताऐवजाचा अभाव, भुखंडाचे पट्टे, नसल्याचे प्रस्ताव नामंजुर करण्यात आले. परिणामी गरजू कुटूबांना या योजनेतील घरकुलापासून वंचीत रहोवे लागले. प्रशासनामध्ये समन्वय नसल्यामुळेच सदर योजना पांढरा हत्ती ठरली आहे.