शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

अंगणवाडीत मिळणार शेवई, शिरा, उपमा!

By admin | Updated: July 11, 2017 00:43 IST

महिला व बाल कल्याण विभागाचा अभिनव उपक्रम : सुदृढ आरोग्यासाठी आहारात बदल

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ग्रामीण भागातील लहान मुले, किशोरवयीन मुली तसेच गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात येतो. त्यात वरणभात, खिचडी, उसळ, सुगडीचा समावेश होता. मात्र, आता मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहारात बदल करण्यात आला असून, या सत्रापासून शेवई, शिरा, उपमा देण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील मुले, महिला यांचे आरोग्य चांगले व सुदृढ राहण्यासाठी दरवर्षी अंगणवाडीच्या माध्यमातून प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. शाळेत येणारी मुले उपाशी किंवा कुपोषित राहू नये म्हणून शासनाने खबरदारी घेतली आहे. मुलांचा प्राथमिक स्तर गुणवत्तापूर्वक व निरोगी व्हावा, हा उद्देश ठेवून अंगणवाडीत मुलांना शक्य त्या सर्व सोयी, सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. त्यात उत्तम आहार, दर्जेदार शिक्षणाबरोबर गुणवत्ता वाढीसाठीही विशेष उपक्रम राबविले जातात. पहिलीच्या शाळेत जाण्यापूर्वी म्हणजे ६ वर्षांपर्यंतची मुले अंगणवाडीत शिक्षण घेत असतात. या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वरणभात, लापशी, खिचडी, उसळ तसेच सुखडी देण्यात येते. याशिवाय अंगणवाडीत न जाणारी ६ महिने ते ३ वर्षांखालील मुले, ११ ते १८ वर्षांखालील किशोरवयीन मुली तसेच गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून खायला चवदार व पोषक असलेले सुखडीचे २ पॅकबंद पाकिटे देण्यात येतात. मात्र आता पोषण आहारात बदल करण्यात आला असून, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले व जे खराब होणार नाहीत, शिवाय उत्तम आहार आणि दर्जा असलेले पदार्थ देण्यात येणार आहेत. यात शेवई, शिरा, उपमा व सुखडी अशा भरपूर पदार्थांचा समावेश असून, यामध्ये गहू, साखर, सोयाबीन, मूग, शेंगदाणे, सूक्ष्म पोषकतत्त्वे, गुळ, स्निग्धरहित सोया, खाण्याचे तेल, साखर, चणा, मसाले, असे आरोग्यासाठी अत्यंत चांगले असलेले घटक या खाऊत सामावलेले असणार आहेत.पोषण आहाराची तीन पाकिटे मिळणार!अंगणवाडीतील मुलांना पूर्वीप्रमाणे बचत गटामार्फत असलेले वरणभात, लापशी, खिचडी, उसळ, जेवण व नाश्ता देण्यात येत आहे, त्यात मात्र सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण, शाळेत न येणारे ६ महिने ते ३ वर्षांचे मुले, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना शेवई, शिरा, उपमा हा नवीन पोषण आहार मिळणार असून, त्यांना २५ दिवसांतून प्रत्येकी तीन पाकिटे मिळणार आहेत.ग्रामीण भागातील अंगणवाडीतील मुलांसाठी नेहमीचा पोषण आहार देण्यात येत आहे. मात्र, अंगणवाडीत न येणारे ६ महिने ते ३ वर्षांची मुले, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना शासनाच्या नवीन निर्देशानुसार पोषण आहार देण्यात येईल.- सी. बी. चेके, उपमुकाअ , महिला व बालकल्याण जि.प. बुलडाणा.