शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीत मिळणार शेवई, शिरा, उपमा!

By admin | Updated: July 11, 2017 00:43 IST

महिला व बाल कल्याण विभागाचा अभिनव उपक्रम : सुदृढ आरोग्यासाठी आहारात बदल

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : ग्रामीण भागातील लहान मुले, किशोरवयीन मुली तसेच गरोदर व स्तनदा मातांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात येतो. त्यात वरणभात, खिचडी, उसळ, सुगडीचा समावेश होता. मात्र, आता मुलांच्या सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहारात बदल करण्यात आला असून, या सत्रापासून शेवई, शिरा, उपमा देण्यात येणार आहे.ग्रामीण भागातील मुले, महिला यांचे आरोग्य चांगले व सुदृढ राहण्यासाठी दरवर्षी अंगणवाडीच्या माध्यमातून प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. शाळेत येणारी मुले उपाशी किंवा कुपोषित राहू नये म्हणून शासनाने खबरदारी घेतली आहे. मुलांचा प्राथमिक स्तर गुणवत्तापूर्वक व निरोगी व्हावा, हा उद्देश ठेवून अंगणवाडीत मुलांना शक्य त्या सर्व सोयी, सुविधा देण्यावर शासनाचा भर आहे. त्यात उत्तम आहार, दर्जेदार शिक्षणाबरोबर गुणवत्ता वाढीसाठीही विशेष उपक्रम राबविले जातात. पहिलीच्या शाळेत जाण्यापूर्वी म्हणजे ६ वर्षांपर्यंतची मुले अंगणवाडीत शिक्षण घेत असतात. या मुलांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वरणभात, लापशी, खिचडी, उसळ तसेच सुखडी देण्यात येते. याशिवाय अंगणवाडीत न जाणारी ६ महिने ते ३ वर्षांखालील मुले, ११ ते १८ वर्षांखालील किशोरवयीन मुली तसेच गरोदर व स्तनदा माता यांच्यासाठी अंगणवाडीच्या माध्यमातून खायला चवदार व पोषक असलेले सुखडीचे २ पॅकबंद पाकिटे देण्यात येतात. मात्र आता पोषण आहारात बदल करण्यात आला असून, आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले व जे खराब होणार नाहीत, शिवाय उत्तम आहार आणि दर्जा असलेले पदार्थ देण्यात येणार आहेत. यात शेवई, शिरा, उपमा व सुखडी अशा भरपूर पदार्थांचा समावेश असून, यामध्ये गहू, साखर, सोयाबीन, मूग, शेंगदाणे, सूक्ष्म पोषकतत्त्वे, गुळ, स्निग्धरहित सोया, खाण्याचे तेल, साखर, चणा, मसाले, असे आरोग्यासाठी अत्यंत चांगले असलेले घटक या खाऊत सामावलेले असणार आहेत.पोषण आहाराची तीन पाकिटे मिळणार!अंगणवाडीतील मुलांना पूर्वीप्रमाणे बचत गटामार्फत असलेले वरणभात, लापशी, खिचडी, उसळ, जेवण व नाश्ता देण्यात येत आहे, त्यात मात्र सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पण, शाळेत न येणारे ६ महिने ते ३ वर्षांचे मुले, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना शेवई, शिरा, उपमा हा नवीन पोषण आहार मिळणार असून, त्यांना २५ दिवसांतून प्रत्येकी तीन पाकिटे मिळणार आहेत.ग्रामीण भागातील अंगणवाडीतील मुलांसाठी नेहमीचा पोषण आहार देण्यात येत आहे. मात्र, अंगणवाडीत न येणारे ६ महिने ते ३ वर्षांची मुले, किशोरवयीन मुली, गरोदर व स्तनदा माता यांना शासनाच्या नवीन निर्देशानुसार पोषण आहार देण्यात येईल.- सी. बी. चेके, उपमुकाअ , महिला व बालकल्याण जि.प. बुलडाणा.