शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेड लाड येथे भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:04 IST

किनगाव जट्टू : पाणीपुरवठा याेजना बंद पडल्याने खापरखेड लाड येथे गत काही दिवसापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील ...

किनगाव जट्टू : पाणीपुरवठा याेजना बंद पडल्याने खापरखेड लाड येथे गत काही दिवसापासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावातील एका शेतकऱ्याने शेतातील पाणी गावात आणले तरी ते ताेकडे पडत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पाणीटंचाइची तीव्रता वाढणार असल्याचे चित्र आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाने लक्ष देऊन पाणीपुरवठा याेजना सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी कली आहे.

खापरखेड लाड गावात २० वर्षांपूर्वी पूर्णा नदीत विहीर खोदून गावात पाईपलाईन टाकण्यात आली होती. या योजनेचे काम निकृष्ट झाल्याने जेमतेम पाच वर्षात योजना बंद पडली. दुरुस्तीवरसुद्धा खर्च करण्यात आला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. गावात पाणीपुरवठा करण्याकरिता आणखी दोन विहिरी आहेत. त्या पाण्याअभावी कचराकुंड्या बनल्या आहेत. हातपंप आहेत, ते पाण्याअभावी बंद आहेत. ग्रामस्थांना तिन्ही ऋतूत पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने शासनाच्या वतीने कायमस्वरूपी पाणीटंचाई दूर करण्याकरिता एक वर्षापूर्वी खडकपूर्णा नदीत विहीर खोदून गावापर्यंत पाईपलाईन टाकलेली आहे. परंतु हे काम सुरू असताना विहिरीवर टाकलेली स्लॅब कोसळली होती. त्या

विहिरीवर दुसरी स्लॅब टाकली, तीसुद्धा पूर्णा नदीच्या पात्रात असल्याने पावसाळ्यात पहिल्याच पुरात बुजली. त्यामुळे ही योजना बंद पडली. या योजनेवर लाखो रुपये खर्च करून जेमतेम एक महिना पाणी मिळाले. तेव्हापासून ग्रामस्थांना शेतशिवारातून खडकपूर्णा नदीतून पाणी आणावे लागत आहे. उन्हाळ्यात शासनाच्या वतीने विहीर अधिग्रहण करून देण्यात आली होती. परंतु पावसाळा सुरू झाल्यामुळे अधिग्रहण विहिरीचे पाणी बंद झाल्याने गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोरोना महामारीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना, अशा वातावरणात ग्रामस्थांना मिळेल तिथून पाणी आणावे लागत असल्याचे येथील साळुबा गवई, काळुबाई लाड व इतर नागरिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अखेर येथील शेतकरी कडुबा गवई यांनी त्यांच्या शेतातून पाईपलाईन गावात आणून ते सहा महिन्यापासून ग्रामस्थांची तहान भागवीत आहेत.

ग्रामस्थांची पाण्यासाठी हाेत असलेली भटकंती पाहून शेतातून पाईपलाईन गावात आणली आहे. गत जून महिन्यापासून ग्रामस्थांना पाणीपुरवठा करीत आहेत. कडुबा गवई

पूर्णा नदीच्या पहिल्याच पुरात विहीर बुजल्याने आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करूनसुद्धा अद्यापही नळ योजना बंदच आहे.

सहदेव लाड स्वाभिमानी शेतकरी संघटना लोणार तालुका अध्यक्ष