शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सात हजार विद्यार्थ्यांंचा कोंबून प्रवास

By admin | Updated: September 6, 2014 01:07 IST

खामगाव आगारात बसेस पडताहेत अपुर्‍या; दररोज ७ हजार पासधारक विद्यार्थ्यांंच्या कोंबून प्रवास.

खामगाव : खामगाव आगाराच्या एस.टी.बसेसमधून दररोज सात हजार विद्यार्थी अप डाऊन करीत आहेत. परंतु या विद्यार्थ्यांंंच्या प्रवासाकरिता असणार्‍या बसेस अपुर्‍या पडत आहेत. परिणामी दररोज विद्यार्थ्यांंंना एसटीमधून कोंबून प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे आगारात वाहकाची ३0 पदे रिक्त असल्याने खामगाव आगाराची कसरत होत आहे.गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एस.टी. पोहचली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर पोहचण्याचे काम एस.टी.ने केले आहे. म्हणून आजही प्रवाशांच्या मनात एसटीचे महत्व अबाधित आहे. खामगाव हे घाटाखाली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे विविध महाविद्यालये, आय.टी.आय. शासकीय तंत्रनिकेतन, इंजिनिअरींग कॉलेज तसेच विविध शैक्षणिक, व्यावसायीक संस्था कार्यरत आहेत. खामगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांंंचा ओढा येथे वाढला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांंंसोबतच अकोला, जिल्ह्यासह शेगाव, नांदुरा, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, मोताळा या तालुक्यातील पासधारकांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी तसेच इतर पासधारक सवलतीचा लाभ घेतात. खामगाव आगाराच्या बसेसमधून दररोज ७ हजार पासधारक प्रवास करीत असल्याचे समजते. सकाळी शाळेत येतांना व परत जातावेळेस विद्यार्थ्यांंंची एस टी मध्ये तोबा गर्दी असते. एका बसमध्ये ४४ बसलेले व ११ उभे अशी आसनव्यवस्था असतांना सध्या एका बसमधून १00 पेक्षा जास्त प्रवाशी पर्याय नाही म्हणून प्रवास करीत आहे. यामध्ये विद्यार्थी तर अक्षरश: कोंबले जातात. शाळेत शिकायचे म्हणून विद्यार्थी हे सर्व निमुटपणे सहन करीत आहे. तर दुसरीकडे खामगाव आगारात सद्यास्थितीत ६0 बसेस उपलब्ध आहेत. मात्र यावरही वाहकांची कमतरता असल्याने आगार व्यवस्थापकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आगारातील एस.टी. बसेसना २५0 पेक्षा जास्त फेर्‍या करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खामगाव आगारातून लाखनवाडा, शहापूर, पिंपळगाव राजा, माटरगाव, नांदुरा, नागपूर, वर्णा, दिवठाणा, गारडगाव, अटाळी या मार्गावर विद्यार्थ्यांंंची गर्दी मोठय़ा प्रमाणात असल्याने बसगाड्या वाढविण्याची मागणी पालकांमधून होत आहे. तर वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून दखल घेण्याची गरज आहे. आगारात उपलब्ध बसगाड्या व कर्मचारी यांचा समन्वय साधून प्रवाशांना नियमीत सेवा पुरविण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र ऐन वेळेवर तांत्रिक अडचणी वा कर्मचार्‍यांच्या अडचणी पाहता नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे आगार व्यवस्थापक सुभाष पाटील यांनी सांगीतले.