शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सात हजार विद्यार्थ्यांंचा कोंबून प्रवास

By admin | Updated: September 6, 2014 01:07 IST

खामगाव आगारात बसेस पडताहेत अपुर्‍या; दररोज ७ हजार पासधारक विद्यार्थ्यांंच्या कोंबून प्रवास.

खामगाव : खामगाव आगाराच्या एस.टी.बसेसमधून दररोज सात हजार विद्यार्थी अप डाऊन करीत आहेत. परंतु या विद्यार्थ्यांंंच्या प्रवासाकरिता असणार्‍या बसेस अपुर्‍या पडत आहेत. परिणामी दररोज विद्यार्थ्यांंंना एसटीमधून कोंबून प्रवास करावा लागत आहे. तर दुसरीकडे आगारात वाहकाची ३0 पदे रिक्त असल्याने खामगाव आगाराची कसरत होत आहे.गाव तेथे रस्ता व रस्ता तेथे एस.टी. पोहचली आहे. ग्रामीण भागातील शेवटच्या टोकावर पोहचण्याचे काम एस.टी.ने केले आहे. म्हणून आजही प्रवाशांच्या मनात एसटीचे महत्व अबाधित आहे. खामगाव हे घाटाखाली जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखले जाते. येथे विविध महाविद्यालये, आय.टी.आय. शासकीय तंत्रनिकेतन, इंजिनिअरींग कॉलेज तसेच विविध शैक्षणिक, व्यावसायीक संस्था कार्यरत आहेत. खामगाव हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने शिक्षणाकरिता विद्यार्थ्यांंंचा ओढा येथे वाढला आहे. तालुक्यातील विद्यार्थ्यांंंसोबतच अकोला, जिल्ह्यासह शेगाव, नांदुरा, मेहकर, मलकापूर, जळगाव जामोद, मोताळा या तालुक्यातील पासधारकांची संख्या वाढली आहे. विद्यार्थी तसेच इतर पासधारक सवलतीचा लाभ घेतात. खामगाव आगाराच्या बसेसमधून दररोज ७ हजार पासधारक प्रवास करीत असल्याचे समजते. सकाळी शाळेत येतांना व परत जातावेळेस विद्यार्थ्यांंंची एस टी मध्ये तोबा गर्दी असते. एका बसमध्ये ४४ बसलेले व ११ उभे अशी आसनव्यवस्था असतांना सध्या एका बसमधून १00 पेक्षा जास्त प्रवाशी पर्याय नाही म्हणून प्रवास करीत आहे. यामध्ये विद्यार्थी तर अक्षरश: कोंबले जातात. शाळेत शिकायचे म्हणून विद्यार्थी हे सर्व निमुटपणे सहन करीत आहे. तर दुसरीकडे खामगाव आगारात सद्यास्थितीत ६0 बसेस उपलब्ध आहेत. मात्र यावरही वाहकांची कमतरता असल्याने आगार व्यवस्थापकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. आगारातील एस.टी. बसेसना २५0 पेक्षा जास्त फेर्‍या करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. खामगाव आगारातून लाखनवाडा, शहापूर, पिंपळगाव राजा, माटरगाव, नांदुरा, नागपूर, वर्णा, दिवठाणा, गारडगाव, अटाळी या मार्गावर विद्यार्थ्यांंंची गर्दी मोठय़ा प्रमाणात असल्याने बसगाड्या वाढविण्याची मागणी पालकांमधून होत आहे. तर वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देवून दखल घेण्याची गरज आहे. आगारात उपलब्ध बसगाड्या व कर्मचारी यांचा समन्वय साधून प्रवाशांना नियमीत सेवा पुरविण्याचा प्रयत्न चालू आहे. मात्र ऐन वेळेवर तांत्रिक अडचणी वा कर्मचार्‍यांच्या अडचणी पाहता नागरिकांकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे आगार व्यवस्थापक सुभाष पाटील यांनी सांगीतले.