शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
3
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
4
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
5
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
6
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
7
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
8
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
9
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
10
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
11
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
12
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
13
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
14
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
15
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
16
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
17
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
18
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
19
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
20
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

सभापती व प्रशासनाच्या पुढाकाराने निघाला तोडगा

By admin | Updated: January 23, 2016 02:08 IST

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्वपदावर आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळला.

चिखली : आर्थिक चणचणीचे कारण पुढे करून स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संपूर्ण व्यवहार बाजार समिती प्रशासनाच्या आदेशावरून चार दिवसांपासून पूर्णपणे बंद होते. शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय पाहता अखेर गुरुवारी कृषी उत्पन्न बाजार समिती, अडते, व्यापारी आणि खरेदीदार यांच्यामध्ये झालेल्या समन्वय बैठकीमध्ये या समस्येवर तोडगा काढण्यात आला. त्यामुळे २२ जानेवारीपासून बाजार समितीमधील व्यवहार पूर्वपदावर आल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे. स्थानिक बाजार समितीमधील अडत्यांनी खरेदीदारांकडे व्यवहारांच्या रकमा अडकल्याने बाजारातील व्यवहार करण्यास असर्मथता दर्शविल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संपूर्ण व्यवहार सोमवार १८ जानेवारीपासून पूर्णपणे ठप्प होते. बाजार समितीनेही पुढील आदेशापर्यंंत शेतकर्‍यांनी शेतमाल विक्रीस आणू नये, असे कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या हितासाठी आणि गैरसोय टाळण्यासाठी जाहीर केले होते. बाजार समितीने अडते आणि खरेदीदार यांच्यातील व्यवहारासंदर्भातील वाद समन्वयाने मिटावा आणि बाजार पूर्ववत सुरू व्हावा, यासाठी गेल्या चार दिवसांपासून बरीच खलबते चालविली होती. परंतु दोन्ही घटक आपापल्या भूमिकांबाबत ठाम असल्याने या प्रकरणावर पडदा पडत नव्हता. अखेर बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील यांच्या पुढाकाराने २१ जानेवारी रोजी व्यापारी आणि खरेदीदार यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करुन सविस्तर चर्चा करण्यात आली. या चर्चेदरम्यान शेतकर्‍यांच्या हितासाठी सर्वांंनी आपापल्या भूमिकेमध्ये सुवर्णमध्य काढण्याचा सल्ला सभापती विष्णू पाटील कुळसुंदर यांनी व्यक्त केला. सुमारे दोन तास चाललेल्या या प्रदीर्घ चर्चेत शेतकरी हितासाठी समन्वयाने तोडगा काढण्यात निघाल्याने २२ जानेवारीपासून बाजार पूर्णपणे पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये बाजार समितीचे सभापती विष्णू पाटील कुळसुंदर, माजी प्रशासक दिनदयाल वाधवाणी, संचालक काशिनाथआप्पा बोंद्रे, मनोज खेडेकर, रूपराव सावळे, धनंजय पवार, प्रेमराज भाला, बाळू वराडे, सुधीर पडघान, अडते, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, सचिव पवन अग्रवाल, गोविंद कोठारी यांच्यासह समितीचे सचिव अजय मिरकड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावून तोडगा काढण्यासाठी विशेष प्रयत्न केले.