शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कृउबास संचालकांकडे तूर विक्रीची ‘सेटिंग’!

By admin | Updated: May 13, 2017 04:51 IST

पंचनामा झालेल्याच तुरीची खरेदी : १ लाख २ हजार पोते तूर खरेदी बाकी

ब्रम्हानंद जाधव बुलडाणा : जिल्ह्यात नाफेड केंद्रावर ५ लाख ७३ हजार तुरीची खरेदी पूर्ण झाली आहे. सध्या पंचनामा झालेल्याच तुरीची खरेदी सुरू असून, १ लाख २ हजार पोते तूर खरेदी बाकी आहे. त्यामुळे तूर विक्री करण्यासाठी जिल्ह्यात कृउबासच्या काही संचालकांकडून सेटिंग लावल्या जात असून, संचालकांनी तूर विक्रीसाठी आपल्या नातेवाइकांचे सात-बारा सुद्धा घेऊन ठेवले असल्याने जिल्ह्यात तूर खरेदीचे गौडबंगाल सुरू असल्याचे दिसून येते.जिल्ह्यात यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले. मात्र, तुरीला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तुरीची हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात सात ठिकाणी नाफेड केंद्र सुरू करण्यात आले; परंतु जिल्ह्यातील नाफेड केंद्र विविध अडचणीत सापडल्याने शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांकडे तूर विकावी लागत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २८९ कोटी ३६ लाख रुपये किमतीची ५ लाख ७३ हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही १ लाख २ हजार तुरीच्या पोत्यांची खरेदी बाकी आहे. जिल्ह्यातील नाफेड केंद्रावर तूर खरेदीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली असून, आता ३१ मेपर्यंत तूर खरेदी केली जाणार आहे; परंतु सध्या पंचनामा झालेल्याच तुरीची खरेदी करण्यात येत असून, नाफेड केंद्रावर येणाऱ्या नवीन शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येत नाही. मात्र, कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांकडे व्यापारी, धनदांडगे शेतकरी व संचालकांचे नातेवाईक तूर विक्रीसाठी सेटिंग लावत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी काही कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांनी आपल्या नातेवाईक शेतकऱ्यांचे सात-बारे घेऊन नाफेड केंद्रावर तूर खपविण्याचा प्रकार सुरू केला आहे. तसेच नाफेड केंद्रावरील काही प्रशासकीय अधिकाऱ्यांची व्यापाऱ्यांशी मिलीभगत असल्याने व्यापाऱ्यांची तूरही हमीभावाने शेतकऱ्यांच्या नावावर खरेदी केली जात आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीचा फायदा घेऊन ३ हजार ५०० ते ३ हजार ८०० रुपये भावात व्यापारी तूर खरेदी करत आहेत. त्यानंतर शेतकऱ्यांचे सात-बारे घेऊन ते व्यापारी नाफेड केंद्रावर ५ हजार ५० रुपये भावाने कृउबासच्या सदस्यांमार्फत तूर विक्री करत आहेत. तसेच बहुतांश केंद्रावर टोकण पद्धतीने तुरीची मोजणी झालीच नाही. सिंदखेड राजा येथे तहसीलदारांनी पंचनामे करून शेतकऱ्यांची यादी नाफेडच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दिली होती; मात्र तहसीलदारांच्या या यादीनुसार शेतकऱ्यांची तूर खरेदी झाली नसल्याने अनेक शेतकऱ्यांची तूर खरेदी करणे अद्याप बाकीच आहे. परिणामी, सर्वसामान्य शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी प्रतीक्षेतच बसावे लागत आहे. जिल्ह्यात काही कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांनी आपल्या नातेवाईक शेतकऱ्यांची तसेच व्यापाऱ्यांकडून कमी भावात तूर खरेदी करून घेण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यानंतर ही तूर नाफेड केंद्रावर विक्री केल्या जाते. त्यामुळे अनेक शेतकरी आपली तूर नाफेड केंद्रावर विक्री व्हावी व तुरीला भाव मिळावा, यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालकांच्या विनवण्या करताना दिसत आहेत.

सध्या पंचनामा झालेल्या तुरीची खरेदी सुरू आहे. नाफेड केंद्रावर ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्यात येईल. नाफेड केंद्रावर तूर खरेदीचा गैरप्रकार आढळल्यास वरिष्ठ अधिकारी कार्यवाही करतील. - पी. एस. शिंगणे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी, बुलडाणा.