शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

गावठाणप्रमाणेच शेतीच्या सीमारेषा निश्चित करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:37 IST

राज्य सरकारच्यावतीने स्वामित्व भूमापन योजनेअंतर्गत महसूल, भूमिअभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून ‘ड्रोन’द्वारे जिल्ह्यातील गावठाणांचे सर्वेक्षण राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू ...

राज्य सरकारच्यावतीने स्वामित्व भूमापन योजनेअंतर्गत महसूल, भूमिअभिलेख आणि ग्रामविकास विभाग यांच्याकडून ‘ड्रोन’द्वारे जिल्ह्यातील गावठाणांचे सर्वेक्षण राज्यभरात अनेक ठिकाणी सुरू आहे. कोरोनामुळे मध्यंतरी हे काम थांबविण्यात आले होते; परंतु आता हळूहळू या कामास गती येत आहे. ड्रोनद्वारे होणाऱ्या या मोजणीमुळे ग्रामपंचायतींच्या हद्दींचे नकाशे उपलब्ध होणार आहेत. जमीन मोजणीची प्रक्रिया सोपी होऊन नागरिकांना मालमत्तांच्या मालकीहक्कांचे प्रमाणपत्र मिळू शकणार आहे. पर्यायाने मालमत्तेवरून होणारे वादही मिटणार असल्याने निश्चितच राज्य सरकार यासाठी अभिनंदनास पात्र ठरते, या शब्दांत माजी आमदार रेखाताई खेडेकर यांनी या उपक्रमाचे स्वागत करतानाच याचप्रमाणे शेतीचे वाद मिटविण्यासाठीही राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

‘शेत पडे पण धुऱ्यासाठी लढे’, अशी स्थिती राज्यातील बहुतांश गावांत आहे. शेतीच्या सीमारेषा निश्चित नसल्यामुळे धुऱ्यावरून सख्ख्या भावांत अनेक ठिकाणी वाद आहेत. अशी अनेक प्रकरणे कोर्टातही प्रलंबित आहेत, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. सध्या गावठाणांचे सर्वेक्षण सुरू झाल्याने व या सर्वेक्षणाअंती येणारे सकारात्मक परिणाम पाहता शेतीच्या सीमारेषा देखील याच पद्धतीने निश्चित केल्यास शेती व शेतकऱ्यांच्या अनेक समस्या मार्गी लागणार आहेत. त्यानुषंगाने राज्य सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा व गावठाणांप्रमाणेच शेतीचेही ‘ड्रोन’द्वारे सर्वेक्षण करून सीमारेषा निश्चित कराव्यात, अशी मागणी रेखाताई खेडेकर यांनी केली आहे.

...तर महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरेल

गावठाणांचे सर्वेक्षण ‘ड्रोन’व्दारे करण्यात महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हरयाणा आणि उत्तराखंड या राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबविण्यात आली आहे; परंतु शेतीच्या सर्वेक्षणाबाबत अद्याप कोणत्याही राज्याने पुढाकार घेतलेला नाही. या पृष्ठभूमीवर राज्य सरकारने पुढाकार घेत शेतीच्या सर्वेक्षणासाठी देखील अशी योजना राबविल्यास असा उपक्रम राबविणारे पहिले राज्य म्हणून नावलौकिक मिळविण्याची संधी देखील महाराष्ट्र सरकारला मिळणार असल्याचे रेखाताई खेडेकर यांनी स्पष्ट केले आहे.