शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

सोयाबीनवर संकटाची मालिका

By admin | Updated: August 25, 2015 02:09 IST

पाणी समस्या, चक्रीभुंगापाठोपाठ लष्करी अळीचा प्रकोप.

बुलडाणा : यावर्षी जिल्हय़ात जवळपास अडीच लाख हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मॉन्सूनचा पाऊस वगळता पावसात सातत्य नसल्याने अनेक तालुक्यातील सोयाबीन मान टाकत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला होत असल्याने सोयाबीन संकटात सापडले आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांवर मागील काही वषार्ंपासून सातत्याने नैसर्गिक संकटाची मलिकाच सुरू आहे. यावर्षी सर्व संकटातून शेतकरी सुखरुप बचावेल, असे वाटत होते; मात्र सोयाबीन पिकांवर होणार्‍या नैसर्गिक आक्रमणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी प्रभावित क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८९३ हेक्टर एवढे आहे. यात यावर्षी ज्वार, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात गत वर्षी सोयाबीनची पेरणी २६६९२९ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. यावर्षी सोयाबीन पेरणीसाठी ३ लाख ४४ हजार ९६0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हय़ात सर्वात जास्त सोयाबीन यंदा चिखली तालुक्यात सुमारे ६४ हजार हेक्टरवर करण्यात आले. तर सर्वात कमी सोयाबीन जळगाव जामोद तालुक्यात ८ हजार ७२ हेक्टरवर पेरण्यात आले आहे; मात्र मागील काही दिवसांपासून सोयाबीन या पिकावर संकटाची मालिका सुरु असल्याने आता शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पन्न होणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

         जिल्हय़ात प्रारंभी सोयाबीन पिकावर हिलीओथीस नावाच्या अळीचा हल्ला झाला. हा प्रभाव कमी होतो न होतो, तोच चक्रीभुंगाही आला व आता पाठोपाठ लष्करी अळीही दाखल झाली आहे. दुसरीकडे या पिकांना आवश्यक असलेला पाऊस गायब झाल्याने पिकाने माना टाकावयास सुरुवात केली आहे. *तालुकास्तरावर दिल्या विविध सूचना जिल्हय़ात सागाच्या झाडावर हल्ला चढविणार्‍या लष्करी अळीचा प्रादुर्भाव आता सोयाबीनवरदेखील जाणवावयास लागला आहे. याची माहिती मिळताच जिल्हा कृषी अधीक्षक विभागाच्यावतीने सर्व तालुकास्तरीय कार्यालयात पत्र पाठवून या संकटाचा वेळेपूर्वीच बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.