शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

सोयाबीनवर संकटाची मालिका

By admin | Updated: August 25, 2015 02:09 IST

पाणी समस्या, चक्रीभुंगापाठोपाठ लष्करी अळीचा प्रकोप.

बुलडाणा : यावर्षी जिल्हय़ात जवळपास अडीच लाख हेक्टर जमिनीवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली आहे. मॉन्सूनचा पाऊस वगळता पावसात सातत्य नसल्याने अनेक तालुक्यातील सोयाबीन मान टाकत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता सोयाबीनवर लष्करी अळीचा हल्ला होत असल्याने सोयाबीन संकटात सापडले आहे. जिल्हय़ातील शेतकर्‍यांवर मागील काही वषार्ंपासून सातत्याने नैसर्गिक संकटाची मलिकाच सुरू आहे. यावर्षी सर्व संकटातून शेतकरी सुखरुप बचावेल, असे वाटत होते; मात्र सोयाबीन पिकांवर होणार्‍या नैसर्गिक आक्रमणामुळे शेतकरी हतबल झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यात खरीप पेरणीसाठी प्रभावित क्षेत्र ७ लाख ४२ हजार ८९३ हेक्टर एवढे आहे. यात यावर्षी ज्वार, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद, सूर्यफूल, तीळ, ऊस, सोयाबीन, कापूस आदी पिकांचे कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात गत वर्षी सोयाबीनची पेरणी २६६९२९ हेक्टर क्षेत्रात करण्यात आली होती. यावर्षी सोयाबीन पेरणीसाठी ३ लाख ४४ हजार ९६0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते. जिल्हय़ात सर्वात जास्त सोयाबीन यंदा चिखली तालुक्यात सुमारे ६४ हजार हेक्टरवर करण्यात आले. तर सर्वात कमी सोयाबीन जळगाव जामोद तालुक्यात ८ हजार ७२ हेक्टरवर पेरण्यात आले आहे; मात्र मागील काही दिवसांपासून सोयाबीन या पिकावर संकटाची मालिका सुरु असल्याने आता शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पन्न होणार की नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

         जिल्हय़ात प्रारंभी सोयाबीन पिकावर हिलीओथीस नावाच्या अळीचा हल्ला झाला. हा प्रभाव कमी होतो न होतो, तोच चक्रीभुंगाही आला व आता पाठोपाठ लष्करी अळीही दाखल झाली आहे. दुसरीकडे या पिकांना आवश्यक असलेला पाऊस गायब झाल्याने पिकाने माना टाकावयास सुरुवात केली आहे. *तालुकास्तरावर दिल्या विविध सूचना जिल्हय़ात सागाच्या झाडावर हल्ला चढविणार्‍या लष्करी अळीचा प्रादुर्भाव आता सोयाबीनवरदेखील जाणवावयास लागला आहे. याची माहिती मिळताच जिल्हा कृषी अधीक्षक विभागाच्यावतीने सर्व तालुकास्तरीय कार्यालयात पत्र पाठवून या संकटाचा वेळेपूर्वीच बंदोबस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.