दुसरीकडे उभय बाजूंशी आपली चर्चा झाली असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील याचे आश्वासन दोन्ही बाजूंकडून देण्यात आले आहे. जिल्ह्यात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
--अधिकाऱ्यांची घेतली बैठक--
सकाळीच बुलडाण्यात दाखल झालेल्या डीआयजींनी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोड यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांची बैठक घेत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. कोरोना संसर्गाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील या दृष्टीने उपाययोजना करून त्यादृष्टीने बंदोबस्त लावण्यात यावा, अशा सूचना दिला.
--राजकीय तणाव निवळला--
सोमवारी भाजपने हा विषय आमच्यासाठी संपल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केेले होते. त्याच धर्तीवर महाविकास आघाडीतर्फे खा. प्रतापराव जाधव यांनी हा विषय आमच्यासाठी संपला असल्याचे सांगतिले. सोबतच कोरोनाची साथ पाहता उभय बाजूंनी ‘साथ-साथ’ येऊन त्याचा मुकाबला करणे गरजेचे आहे. शक्तिप्रदर्शन न करता कोरोना प्रतिबंधासाठी आपली शक्ती वापरावी, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनांवर शिवसेना भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता शिवसेना-भाजपमधील वादग्रस्त वक्तव्यावरून निर्माण झालेला तणाव आता निवळला असल्याचे चिन्ह आहेत. सोबतच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती आणि पोलीस उपमहानिरीक्षक चंद्रकिशोर मीना यांचीही भेट घेऊन विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.