शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

  ‘स्वाभीमानी’चे आत्मक्लेष आंदोलन; रविकांत तुपकर यांनी स्वत:ला घेतले जमीनीत गाडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2020 15:58 IST

नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

मोताळा: अतिपावसामुळे जिल्ह्यात पिकांच्या झालेल्या नुकसानापोटी शेतकºयांना त्वरित मोबदला द्यावा, या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्त्वात मोताळा तालुक्यातील परडा शिवारात शेतातच स्वत:ला मानेपर्यंत गाडून घेत आत्मक्लेष आंदोलन करण्यात येत आहे. जो पर्यंत शेतकºयांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा रविकांत तुपकर यांनी दिला आहे.यंदा अतिपावसामुळे शेतकºयांचे मका, सोयाबीन, मुग, उडीद, कापसाच्या पिकाचे नुकसान झाले आहे. मात्र प्रत्यक्षात कोठे पंचनामे झाले नाही. नुकसानाचा अंतिम अहवालही अद्याप सादर करण्यात आलेला नाही. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. मात्र त्यास कुठलीच मदत देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांना हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी, ही प्रमुख मागणी घेवून हे आंदोलन २३ सप्टेंबर रोजी रविकांत तुपकर यांनी मोताळा तालुक्यातील परडा शिवारात एका शेतात स्वत:ला गळ््यापर्यंत जमिनीत गाडून घेत हे समाधी आंदोलन सुरू केले आहे. त्यांच्या समवेत स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे सय्यद वसीम, शेख रफीक शेख करीम आणि दत्ता पाटील या त्यांच्या सहकाºयांनीही त्यांच्या समवेत गळ््या पर्यंत स्वत:ला जमिनीत गाडून घेत हे आंदोलन सुरू केले आहे.गेल्या दोन दिवसापूर्वी जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे २२१ गावातील दहा हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. मात्र पंचनामे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाही. शेत पिकांसह, जमीन खरडून गेल्याचेही प्रकार यात झाले आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. गेल्या वर्षीही खरीप आणि रब्बी पिकांचेही अति पावसामुळे नुकसान झाले होते. त्यामुळे गतवर्षीेचे दोन्ही हंगाम हातचे गेले यंदाही खरीपाचा हंगाम हातचा गेल्यात जमा असल्याचे सांगत रविकांत तुपकर यांनी शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे.

तहसिलदार आंदोलन स्थळी‘स्वाभीमानी’च्या या आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तहसिलदार व्ही. एस. कुमरे आणि बोराखेडीचे ठाणेदार हे आंदोलनस्थळी पोहोचले असून स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे. मात्र जो पर्यंत शेतकºयांना त्वरित नुकसान भरपाई मिळत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. त्यामुळे आता आंदोलनाची तिव्रता वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

आमच्या रक्ताचा नैवेद्य द्यायचा का- तुपकरशेतकरी नुकसानामुळे त्रस्त आहे. गतवर्षीही अशीच स्थिती होती. यंदाही तिच स्थिती आहे. त्यामुळे शेतकºयांना मदत मिळण्यासाठी आता आम्ही शेतकºयांनी आमच्याच रक्ताचा नैवेद्य द्यायचा का? असा संतप्त सवाल रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाRavikant Tupkarरविकांत तुपकरbuldhanaबुलडाणा