शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गुणवत्तापूर्ण शिक्षण अभियानासाठी जिल्ह्यातील तीन शाळांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:33 IST

धामणगाव बढे : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले गुणवत्ता ...

धामणगाव बढे : ग्रामविकास विभागाच्या महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत बुलडाणा जिल्ह्यातील तीन शाळांची ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण अभियानासाठी निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकली विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड येथील शाळांचा समावेश आहे.

ग्रामविकास विभागाच्या वतीने राज्यात "ज्ञानज्योती सवित्रीबाई फुले गुणवत्ता पूर्ण शिक्षण आभियान" राबविण्यात येत आहे. यासाठी राज्यभरातून १०० आदर्श शाळांची निवड करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या निर्देशानुसार ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे नोडल अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली २६ फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये मोताळा तालुक्यातील सिंदखेड, शेगाव तालुक्यातील टाकळी विरो आणि चिखली तालुक्यातील करवंड जिल्हा परिषद शाळांची नावे मुंबई येथे या उपक्रमासाठी पाठविण्यात आली होती. शुक्रवारी या तिन्ही शाळांची निवड झाल्याचे मुंबई येथून स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, शाळांचा भौतिक विकास, शाळा समिती बळकटीकरण, आनंददायी शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम पूर्ण ताकदीने राबविण्यात येणार आहेत. सोबतच या तिन्ही शाळा राज्यात आदर्श कराव्यात, अशा सूचनाही बैठकीत देण्यात आल्या आहेत.

सदर योजने अंतर्गत राज्य मूल्यांकन समितीमार्फत निकष पूर्ण करणाऱ्या शाळेला ३ जानेवारी २०२२ रोजी सावित्री बाई फुले जयंतीला आदर्श शाळा म्हणून निवड व पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. सिंदखेड येथील शाळेच्या निवडीबद्दल सरपंच सीमा कदम यांनी आनंद व्यक्त केला असून, समितीने दिलेले निकष पूर्ण करून सिंदखेड शाळा राज्यासाठी नवा आदर्श निर्माण करेल, त्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीने प्रयत्न केले जातील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

--अभियानाची उद्दिष्टे--

भौतिक सुविधांमध्ये मुला - मुलींना स्वतंत्र शौचालय, शुद्ध पाणी, हॅन्ड वॉश स्टेशन, बसण्यासाठी बेंच, शाळेला संरक्षण कुंपण राहील. यासोबतच पर्यावरणस्नेही शाळा व आरोग्यसाठी स्वच्छता ठेवणे, गुणवत्तापूर्ण शिक्षण, शाळा व्यवस्थापन समिती बळकटीकरण यांचा समावेश आहे.