शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त शिवार’साठी २४५ गावांची निवड

By admin | Updated: May 2, 2016 02:26 IST

बुलडाणा येथे राज्याचा ५६ वा स्थापना दिवस थाटात संपन्न.

बुलडाणा : भूजल पातळी वाढवून मोठय़ा प्रमाणावर संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी सन २0१६-१७ साठी दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांचा ३३७.२0 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा ५६ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर १ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर संबोधित करीत होते. याप्रसंगी माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बाविस्कर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेवाणे, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यास शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात ८४५ गावांचा पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ५0 गावांमध्ये ५६ टँकरद्वारे, २७५ गावांमध्ये अधिग्रहित ३२१ खासगी विहिरींद्वारे, ९ गावांमध्ये ११ विंधन विहिरींद्वारे पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. प्रशासनाने विविध उपाययोजनांमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. झाडे यांनी व्यक्त केला.