शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
2
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
3
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
4
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
5
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
6
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
7
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
8
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
9
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
10
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
11
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
12
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
13
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
14
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
15
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!
16
आता फक्त मोदी-जिनपिंगशी बोलणार; ट्रम्पना फोनही नाही करणार! टॅरिफ वॉर दरम्यान ब्राझीलने काय म्हटलं?
17
अमित शाह... अधिक वेग, अधिक जबाबदाऱ्या! 
18
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
19
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
20
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान

‘जलयुक्त शिवार’साठी २४५ गावांची निवड

By admin | Updated: May 2, 2016 02:26 IST

बुलडाणा येथे राज्याचा ५६ वा स्थापना दिवस थाटात संपन्न.

बुलडाणा : भूजल पातळी वाढवून मोठय़ा प्रमाणावर संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी सन २0१६-१७ साठी दुसर्‍या टप्प्यात २४५ गावांची निवड करण्यात आली असून, या गावांचा ३३७.२0 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय झाडे यांनी दिली. महाराष्ट्र राज्याचा ५६ वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर १ मे रोजी आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर संबोधित करीत होते. याप्रसंगी माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्ष टी. डी. अंभोरे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजीवकुमार बाविस्कर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नेवाणे, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या काळात नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्यास शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात ८४५ गावांचा पाणीटंचाईचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार ५0 गावांमध्ये ५६ टँकरद्वारे, २७५ गावांमध्ये अधिग्रहित ३२१ खासगी विहिरींद्वारे, ९ गावांमध्ये ११ विंधन विहिरींद्वारे पाणीटंचाईवर मात करण्यात येत आहे. प्रशासनाने विविध उपाययोजनांमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याचा विश्‍वास जिल्हाधिकारी डॉ. झाडे यांनी व्यक्त केला.