शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

बियाण्यांच्या दरात तफावत!

By admin | Updated: June 2, 2017 00:28 IST

शेतकरी अडचणीत : १ लाख १५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज

ब्रह्मानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात १ लाख १५ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. सोयाबीनला सध्या २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र, सोयाबीनचे नामांकित कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेले सोयाबीन व नामांकित कपंन्याच्या सोयाबीन बियाण्यात हजारो रुपयांची तफावत असल्याने शेतकऱ्यांचे खत व बियाण्यांचे नियोजन बिघडले आहे.जिल्ह्यात यावर्षी ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीनचे पीक सर्वाधिक असून, ३ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात १ लाख १५ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे; परंतु सध्या शेतकऱ्यांच्या मालाला अत्यल्प भाव असल्याने शेतकरी आपल्याकडे पेरणीच्या खर्चासाठी ठेवलेला माल विकून पेरणीही पूर्ण करू शकत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले. मात्र, सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन घरातच ठेवले. खरीप हंगामाच्या पेरणीच्यावेळी घरातील माल विकायचा व त्यावर पेरणीसाठी लागणारे खत, बी-बियाणे खरेदी करून पेरणीचा खर्च भागवायचा, अशी तयारी बहुतांश शेतकऱ्यांची असते; मात्र सध्या सोयाबीनला केवळ २५०० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत भाव मिळत आहेत, तर नामांकित कंपन्याचे सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्ंिवटल ३६०० ते ४ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांकडे असलेल्या सोयाबीनच्या भावात व नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांच्या भावात हजारो रुपयांची तफावत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यावर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडले असल्याने खरीप पेरणीच्या नियोजनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. १ लाख ३६ हजार क्ंिवटल बियाण्याचे नियोजनजिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाबीज, राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडील ३८ हजार ५८० आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून ९७ हजार ९५९ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता! राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बँकानी पीक कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. परिणामी खरिपासाठी खत व बियाण्याकरिता पै-पै जुळविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनावर अर्थचक्र बिघडल्याचा परिणाम झाला असल्याने शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.