शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

बियाण्यांच्या दरात तफावत!

By admin | Updated: June 2, 2017 00:28 IST

शेतकरी अडचणीत : १ लाख १५ हजार क्विंटल सोयाबीन बियाण्याची गरज

ब्रह्मानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात १ लाख १५ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे. सोयाबीनला सध्या २५०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. मात्र, सोयाबीनचे नामांकित कंपन्यांचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल मागे चार हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडे असलेले सोयाबीन व नामांकित कपंन्याच्या सोयाबीन बियाण्यात हजारो रुपयांची तफावत असल्याने शेतकऱ्यांचे खत व बियाण्यांचे नियोजन बिघडले आहे.जिल्ह्यात यावर्षी ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये सोयाबीनचे पीक सर्वाधिक असून, ३ लाख ६१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पिकाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यात १ लाख १५ हजार क्ंिवटल सोयाबीन बियाण्याची गरज आहे; परंतु सध्या शेतकऱ्यांच्या मालाला अत्यल्प भाव असल्याने शेतकरी आपल्याकडे पेरणीच्या खर्चासाठी ठेवलेला माल विकून पेरणीही पूर्ण करू शकत नसल्याची परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. गेल्या तीन वर्षांनंतर पहिल्यांदाच गतवर्षी सोयाबीनचे उत्पादन चांगले झाले. मात्र, सोयाबीनला भाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपल्याकडील सोयाबीन घरातच ठेवले. खरीप हंगामाच्या पेरणीच्यावेळी घरातील माल विकायचा व त्यावर पेरणीसाठी लागणारे खत, बी-बियाणे खरेदी करून पेरणीचा खर्च भागवायचा, अशी तयारी बहुतांश शेतकऱ्यांची असते; मात्र सध्या सोयाबीनला केवळ २५०० रुपये प्रतिक्ंिवटलपर्यंत भाव मिळत आहेत, तर नामांकित कंपन्याचे सोयाबीनचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रतिक्ंिवटल ३६०० ते ४ हजार रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागत आहेत. शेतकऱ्यांकडे असलेल्या सोयाबीनच्या भावात व नामांकित कंपन्यांच्या सोयाबीन बियाण्यांच्या भावात हजारो रुपयांची तफावत असल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यावर्षी शेतकऱ्यांचे अर्थचक्रच बिघडले असल्याने खरीप पेरणीच्या नियोजनावर त्याचा परिणाम जाणवत आहे. १ लाख ३६ हजार क्ंिवटल बियाण्याचे नियोजनजिल्ह्यात २०१७-१८ मध्ये ७ लाख ४७ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप हंगामाकरिता जिल्ह्यात पेरणीसाठी प्रस्तावित केलेल्या क्षेत्रावर सर्व पिकांच्या १ लाख ३६ हजार ५३९ क्विंटल बियाणे पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये महाबीज, राष्ट्रीय बियाणे निगम यांच्याकडील ३८ हजार ५८० आणि खासगी बियाणे कंपन्यांकडून ९७ हजार ९५९ क्विंटल बियाण्याचा समावेश आहे.पीक कर्ज वाटपात बँकांचा हात आखडता! राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांच्या थकबाकीदारांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बँकानी पीक कर्ज वाटपात हात आखडता घेतला आहे. परिणामी खरिपासाठी खत व बियाण्याकरिता पै-पै जुळविण्यासाठी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यंदाच्या खरीप हंगामाच्या नियोजनावर अर्थचक्र बिघडल्याचा परिणाम झाला असल्याने शेतकऱ्यांना सावकारांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.