शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

बीजोत्पादक शेतकऱ्यांना महाबीजचे ५० टक्केच बियाणे मिळणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST

चिखली : खरिपाच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांनी महाबीजकडे सोयाबीन बियाणे मिळण्यासाठी नोंदणी केली आहे; परंतु तालुक्यात मागणीच्या तुलनेत ५० टक्के ...

चिखली : खरिपाच्या तोंडावर अनेक शेतकऱ्यांनी महाबीजकडे सोयाबीन बियाणे मिळण्यासाठी नोंदणी केली आहे; परंतु तालुक्यात मागणीच्या तुलनेत ५० टक्के बियाणे मिळणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पृष्ठभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सोयाबीनचे पायाभूत व प्रमाणित बियाण्यांचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी पंदेकृविचे सदस्य तथा स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी ‘महाबीज’च्या व्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.

सोयाबीन उत्पादनात चिखली तालुका राज्यात अग्रेसर असून चिखली येथे सर्वांत मोठा बियाणे प्रकल्पसुद्धा आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी महाबीज केंद्रावर बियाण्यांची यापूर्वीच नोंदणी केली आहे. त्या दृष्टीने शेतकऱ्यांनी पेरणीचे नियोजनसुद्धा केले आहे. परंतु जिल्ह्यात ५४ टक्के शेतकऱ्यांनाच महाबीजकडून बियाणे मिळू शकते, अशी माहिती मिळाल्याने व चिखली महाबीज केंद्रावर शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत ५० टक्के बियाणेच मिळेल असे सांगितले जात आहे. तथापि कृषी केंद्रावरही महाबीज प्रमाणित बियाण्यांचा साठा कमी असल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. वस्तुत: पायाभूत बियाण्यांशेजारी इतर दुसरे कोणत्याही बियाण्यांची पेरणी करता येत नाही. असे असताना मागणीप्रमाणे बियाणे मिळणार नसल्याने यामुळे उर्वरित क्षेत्र पडीक ठेवायचे का? असा प्रश्न सरनाईक यांनी उपस्थित केला आहे़ सोयाबीनच्या पायाभूत बियाण्यांचा कोटा वाढवून देण्यासह ‘महाबीज’कडून प्रमाणित बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी विनायक सरनाईक यांनी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी व महाबीज जिल्हा व्यवस्थापकांकडे केली आहे.