शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

माध्यमिक शाळेची घंटा वाजली, प्राथमिक शाळांची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २६ जूनपासून सुरू केल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २६ जूनपासून सुरू केल्या. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात प्रतिसाद आहे. अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक संभ्रमात आहेत. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याची प्रतीक्षा आहे.

प्राथमिक शाळा सुरू केल्या तर मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी, अद्यापही धोका टळलेला नाही. माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या; परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे; परंतु त्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे, जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा कायम आहे़ दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा धाेका तज्ज्ञांनी वर्तवला असल्याने मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही, याविषयी संभ्रम आहे़

जिल्ह्यात ४८७ शाळा सुरू

जिल्ह्यात माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या ९१९ शाळांपैकी ४८७ शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याविषयी अद्यापही आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७५३ विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

शासनाने माध्यमिक शाळा सुरू केल्या. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. परंतु शाळा, वर्गांचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. त्यासाठी पैसा कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाने मेंटेनन्स अनुदान दिले असून, त्यातून हा खर्च भागविण्यास सांगितले आहे.

पालकांमध्ये मुलांना पाठवण्याविषयी संभ्रम

प्राथमिक शाळा सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिली नाही़ पालकांची संमती, ग्रामपंचायतीचा ठराव, न.प., मनपा यांची संमती असल्यास आणि कोरोनामुक्त परिसर, गाव असल्यास शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना आहेत़ त्यानुसार जिल्ह्यात इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत़ प्राथमिकच्या शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही याविषयी संभ्रम आहे़

प्राथमिकची मुले घरातच

काेराेना संक्रमणामुळे गत दाेन वर्षांपासून प्राथमिकची मुले घरातच आहेत़ ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात विविध समस्यांमुळे ते केवळ नावापुरतेच ठरत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे़ काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये प्राथमिक शाळाही सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत़