शहरं
Join us  
Trending Stories
1
ताम्हिणी घाटात थार दरीत कोसळली; ६ जणांचा मृत्यू, ३ दिवसांनंतर अपघात झाल्याचे समजले
2
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
3
'ही' मोठी बँक भारतातील व्यवसाय बंद करण्याच्या विचारात, खरेदीसाठी दोन दिग्गज बँका शर्यतीत
4
"महाराष्ट्रातील घडामोडींवर माझं लक्ष, तुमचा…’’, तक्रार घेऊन आलेल्या एकनाथ  शिंदेनां अमित शाहांचं मोठं आश्वासन
5
देशाचा 'नंबर १' ब्रँड TCS नव्हे तर HDFC बँक! ब्रँडझेड रिपोर्टमध्ये मोठा उलटाफेर; 'या' कारणामुळे सर्वात मौल्यवान!
6
राज्यपालांवर वेळेची मर्यादा घालता येणार नाही; राष्ट्रपतींच्या 'त्या' प्रश्नावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
7
अल फलाह युनिव्हर्सिटीचे चेअरमन जावेद सिद्दीकी यांच्या अडचणी वाढल्या; आता घरावर चालणार बुलडोझर 
8
“डिसेंबर अखेरपर्यंत महामेट्रो मीरा-भाईंदरकरांच्या सेवेत येणार”: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
9
Mumbai: कापूर पडलेल्या तेलात तळलेला समोसा खाल्याने विद्यार्थ्यांना विषबाधा, शाळांना अन्न सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे निर्देश!
10
एक 'अशी' शूटर बनली नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री; जिनं भारताबाहेर कायम ठेवलाय दबदबा
11
फातिमा सना शेखने फेमिनझमवर केलं भाष्य; म्हणाली, "पुरुषांना कमी दाखवणं म्हणजे..."
12
भारतीय लष्कराला बूस्ट! अमेरिकेने जेव्हलिन क्षेपणास्त्र विक्रीला दिली मंजुरी
13
प्रवाशांसाठी गुड न्यूज! कोकण रेल्वेवरील ‘या’ एक्स्प्रेसचा वेग वाढला; ४० मिनिटे लवकर पोहोचेल
14
Kandivali: कांदिवलीत भरदिवसा तिघांचा दुचाकीने येत इस्टेट एजंटवर गोळीबार!
15
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
16
१७० खोल्या, क्रिकेट ग्राऊंड, गोल्फ कोर्स... बकिंघम पॅलेसपेक्षाही चार पट मोठं आहे भारतातील हे घर
17
"तुम्हाला भाजप आवडत आहे, तर तुम्ही काँग्रेसमध्ये कशाला थांबलात?"; माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने शशी थरूर यांना सुनावले
18
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
19
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
20
खंडोबा नवरात्र २०२५: खंडोबाचे षडरात्रोत्सव हा केवळ उत्सव नाही तर कुळाचार; पाहा पूजा साहित्य आणि व्रतविधी
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शाळेची घंटा वाजली, प्राथमिक शाळांची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २६ जूनपासून सुरू केल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २६ जूनपासून सुरू केल्या. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात प्रतिसाद आहे. अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक संभ्रमात आहेत. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याची प्रतीक्षा आहे.

प्राथमिक शाळा सुरू केल्या तर मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी, अद्यापही धोका टळलेला नाही. माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या; परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे; परंतु त्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे, जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा कायम आहे़ दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा धाेका तज्ज्ञांनी वर्तवला असल्याने मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही, याविषयी संभ्रम आहे़

जिल्ह्यात ४८७ शाळा सुरू

जिल्ह्यात माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या ९१९ शाळांपैकी ४८७ शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याविषयी अद्यापही आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७५३ विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

शासनाने माध्यमिक शाळा सुरू केल्या. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. परंतु शाळा, वर्गांचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. त्यासाठी पैसा कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाने मेंटेनन्स अनुदान दिले असून, त्यातून हा खर्च भागविण्यास सांगितले आहे.

पालकांमध्ये मुलांना पाठवण्याविषयी संभ्रम

प्राथमिक शाळा सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिली नाही़ पालकांची संमती, ग्रामपंचायतीचा ठराव, न.प., मनपा यांची संमती असल्यास आणि कोरोनामुक्त परिसर, गाव असल्यास शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना आहेत़ त्यानुसार जिल्ह्यात इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत़ प्राथमिकच्या शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही याविषयी संभ्रम आहे़

प्राथमिकची मुले घरातच

काेराेना संक्रमणामुळे गत दाेन वर्षांपासून प्राथमिकची मुले घरातच आहेत़ ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात विविध समस्यांमुळे ते केवळ नावापुरतेच ठरत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे़ काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये प्राथमिक शाळाही सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत़