शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

माध्यमिक शाळेची घंटा वाजली, प्राथमिक शाळांची प्रतीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २६ जूनपासून सुरू केल्या. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे शासनाने इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा २६ जूनपासून सुरू केल्या. या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा काही प्रमाणात प्रतिसाद आहे. अद्यापही कोरोनाची दहशत कायम असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत पालक संभ्रमात आहेत. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याची प्रतीक्षा आहे.

प्राथमिक शाळा सुरू केल्या तर मुलांच्या आरोग्याची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी, अद्यापही धोका टळलेला नाही. माध्यमिकच्या शाळा सुरू झाल्या; परंतु विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. शासनाने प्राथमिक शाळा सुरू करण्याचा विचार केला आहे; परंतु त्याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले नाहीत. त्यामुळे, जिल्ह्यात प्राथमिक शाळा सुरू हाेण्याची प्रतीक्षा कायम आहे़ दुसरीकडे तिसऱ्या लाटेचा धाेका तज्ज्ञांनी वर्तवला असल्याने मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही, याविषयी संभ्रम आहे़

जिल्ह्यात ४८७ शाळा सुरू

जिल्ह्यात माध्यमिकच्या इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या ९१९ शाळांपैकी ४८७ शाळा सुरू झाल्या आहेत; परंतु विद्यार्थ्यांची उपस्थिती कमी आहे. प्राथमिकच्या शाळा सुरू करण्याविषयी अद्यापही आदेश आलेले नाहीत. जिल्ह्यात १ लाख ९७ हजार ७५३ विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत येत आहेत.

सॅनिटायझेशन करा, पैसे देणार कोण?

शासनाने माध्यमिक शाळा सुरू केल्या. आता प्राथमिक शाळा सुरू करण्याच्या हालचालीही सुरू केल्या आहेत. परंतु शाळा, वर्गांचे सॅनिटायझेशन करावे लागणार आहे. त्यासाठी पैसा कोण देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिक्षण विभागाने मेंटेनन्स अनुदान दिले असून, त्यातून हा खर्च भागविण्यास सांगितले आहे.

पालकांमध्ये मुलांना पाठवण्याविषयी संभ्रम

प्राथमिक शाळा सुरू करण्यास शासनाने अद्याप परवानगी दिली नाही़ पालकांची संमती, ग्रामपंचायतीचा ठराव, न.प., मनपा यांची संमती असल्यास आणि कोरोनामुक्त परिसर, गाव असल्यास शाळा सुरू कराव्यात, अशा सूचना आहेत़ त्यानुसार जिल्ह्यात इयत्ता आठवी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत़ प्राथमिकच्या शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठवावे किंवा नाही याविषयी संभ्रम आहे़

प्राथमिकची मुले घरातच

काेराेना संक्रमणामुळे गत दाेन वर्षांपासून प्राथमिकची मुले घरातच आहेत़ ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी ग्रामीण भागात विविध समस्यांमुळे ते केवळ नावापुरतेच ठरत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत आहे़ काेराेनामुक्त झालेल्या गावांमध्ये प्राथमिक शाळाही सुरू करण्याची मागणी पालक करीत आहेत़