शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळा सुरू, विद्यार्थ्यांना बसची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:35 IST

बुलडाणा : कोराेनामुळे मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आला हाेता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुरुवातीला ९ वी ते १२ वी ...

बुलडाणा : कोराेनामुळे मार्च महिन्यापासून लाॅकडाऊन करण्यात आला हाेता. काेराेनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने सुरुवातीला ९ वी ते १२ वी आणि त्यानंतर ५ ते ८ वीपर्यंत शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र, विद्यार्थिनींसाठी असलेल्या मानव विकास मिशनच्या बससह इतर बसची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा कायम आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.

जिल्ह्यातील चिखली, मेहकर, लाेणार, सिदंखेडराजा, देउळगावराजा, जळगाव जामाेद आणि संग्रामपूर तालुक्यांची निवड मानव विकास मिशनअंतर्गत करण्यात आली आहे. या तालुक्यांमध्ये विद्यार्थिनींसाठी माेफत बससेवा सुरू करण्यात आली हाेती. जवळपास ४९ बस या तालुक्यांमध्ये धावत हाेत्या. काेराेनामुळे बससेवा बंद करण्यात आली हाेती. अनलाॅक प्रक्रियेंतर्गत लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू झाल्या असल्या तरी मानव विकास मिशनच्या बसची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये अजूनही बससेवा सुरू झालेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना खासगी वाहनांनी प्रवास करावा लागत आहे.

समिती निश्चित करते बस फेरीचा मार्ग

मानव विकास मिशनअंतर्गत निवड झालेल्या तालुक्यांमध्ये बसची संख्या तसेच मार्ग निश्चित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येते. यामध्ये आगारप्रमुखांसह गटशिक्षणाधिकाऱ्यांचा समावेश असताे. ही समिती विद्यार्थिनींची संख्या पाहून मार्ग निश्चित करते.

काेराेनापूर्वी ४९ बस हाेत्या सुरू

काेराेना संक्रमण वाढण्यापूर्वी मार्च महिन्यात ४९ बस फेऱ्या सुरू हाेत्या. मुलींची संख्या किती त्यावर बसची संख्या निश्चित करण्यात आली आहे. जळगाव जामाेद, मेहकर तालुक्यांमध्ये सर्वाधिक मुलींची संख्या हाेती. त्यामुळे या तालुक्यांमध्ये बस माेठ्या प्रमाणात सुरू हाेत्या. मार्च महिन्यापूर्वी ४९ बस सुरू हाेत्या, शाळा सुरू झाल्यानंतर सध्या एकही बस सुरू नाही.

खासगी वाहनांचा आधार

ग्रामीण भागात अजूनही पाहिजे त्या प्रमाणात बससेवा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांची पायपीट सुरू आहे. मानव विकाससह इतर बसही सुरू नसल्याने विद्यार्थ्यांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आगारप्रमुखांनी याकडे लक्ष देऊन ग्रामीण भागातही बस फेऱ्या सुरू करण्याची गरज आहे.

शाळा सुरू झाल्या असल्या तरी मानव विकास मिशनच्या बस सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांनी शाळेत जावे लागत आहे. अनेक वेळा वाहने मिळत नसल्याने शाळेत जाता येत नाही.

साक्षी इंगळे, अंभाेडा

शाळा सुरू झाली असली तरी मानव विकास मिशनची बस अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे खासगी वाहनांनी शाळेत जावे लागत आहे. बससेवा सुरू करण्याची गरज आहे.

दीक्षा जाधव, काेलवड