शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
2
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
3
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
4
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
5
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
6
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
8
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
9
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
10
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
11
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
12
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
13
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
14
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
15
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
16
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
17
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
18
पवईत मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण?; शिक्षण विभागाशी समोर आले कनेक्शन, काय आहे प्रकार?
19
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...
20
Rohit Pawar: रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ, मुंबईत गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

घरपोच कच्चे धान्य वितरणात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 14:53 IST

निर्धारित केलेल्या मालापेक्षा कमी माल वितरीत केल्या जात असल्याने अनेक लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे.

अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: अंगणवाडी स्तरावर वितरीत केल्या जाणाऱ्या कच्च्या धान्याच्या वितरणात मोठ्याप्रमाणात घोळ केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. सिलबंद पाकीटाऐवजी खुले धान्य वितरीत करून निर्धारित केलेल्या मालापेक्षा कमी माल वितरीत केल्या जात असल्याने अनेक लाभार्थ्यांची फसवणूक होत आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.अंगणवाडी स्तरावर घरपोच आहार वितरणातील गैर व्यवहारास आळा बसविण्याशाठी शासन आणि आयुक्तांनी लाभार्थी निहाय सर्व कच्चे धान्य असलेली ५० दिवसांसाठी एक मोठी सीलबंद पिशवी तयार करण्यात यावी. त्यानंतर या पिशवीचे संबंधितांना वितरण करण्याचे निर्देशीत केले आहे. मात्र, ५० दिवसांसाठी सर्व माल असलेल्या सिलबंद पिशवी ऐवजी कंत्राटदाराकडून खुले धान्य वेगवेगळ्या पिशव्यांमधून वितरीत करण्यात येत आहे. उल्लेखनिय म्हणजे कच्च्या धान्याचे वितरण करताना अंगणवाडी सेविकांकडून पावतीवर दिनांक, वाहन क्रमांक आदींची नोंद केली जात नाही. परिणामी, माल कधी आला अथवा आलाच नाही, याबाबतही सांशकता निर्माण होत आहे. यासंदर्भात बाल कल्याणचे उप मुख्याधिकारी रामरामे यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होवू शकले नाही.

कच्चे धान्य वितरणातील लाभार्थी!अंगणवाडी मधील ०६ महिने ते ०३ वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदा माता तसेच कमी वजनाची बालके आणि ११ ते १४ वर्ष वयोगटातील कुमारवयीन मुलींना लाभार्थी निहाय सीलबंद पाकीटमध्ये कच्चे धान्य पुरवठा करण्यासाठी शासनाने ३० मार्च २०१९ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. यासाठी लाभार्थी निहाय पाककृती निश्चित करून महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनला पर्यायी व्यवस्थेतंर्गत कंत्राट देण्यात आला आहे. त्यानुसार फेडरेशनने प्रत्येक जिल्ह्यात वितरणासाठी कंत्राटदार नियुक्त केलेत. याकंत्राटदारांकडून सीलबंद पाकीटात संबधीत धान्याचा पुरवठा होत नसल्याने वितरणात खोळंबा निर्माण झाला आहे.

निर्धारित धान्यांपासून लाभार्थी अनभिज्ञ!एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तांनी ठरवून दिलेल्या मालाच्या प्रमाणाबाबत संबंधित कंत्राटदारांकडून कमालिची गुप्तता पाळली जात आहे. दरम्यान, शासनाकडून कोणते धान्य, किती प्रमाणात वितरीत केले जाते याबाबत लाभार्थी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविकांकडून दिल्या जाणारे खुले पाकीट लाभार्थी घेऊन जाताहेत. गत सहा महिन्यांपासून सीलबंद पाकीटांऐवजी खुले धान्य वितरीत करून लाभार्थ्यांची लूट केली जात असल्याची चर्चा आहे.स्तनदा माता आणि गरोदर महिलांनाही अपुरा आहार!स्तनदा माता, गर्भवती महिला आणि किशोर वयीन मुलींना ५० दिवसांसाठी ३.७७५ किलो गहू देणे बंधनकारक आहे. त्यासाठी १.८८७ किलोच्या दोन पिशव्या देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, बहुतांश ठिकाणी गव्हाची एकच पिशवी दिली जात आहे.तसेच पाककृतीनुसार निर्धारीत वजनाचे २ प्रकारचे कडधान्य, २ प्रकारची डाळ देणे क्रमप्राप्त आहे. मात्र, अपुरे धान्य वितरीत करून पूर्ण मालाचे देयक काढण्यात येत आहे.

अंगणवाडीतील घरपोच कच्चे धान्य वितरणासंबधीत यापूर्वी देखील तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुषंगाने चौकशीचे आदेश आपण दिले होते. अद्यापही कमी धान्य मिळत असल्याच्या तक्रारी असतील तर, जिल्हा परिषदेकडे सादर कराव्यात. त्यांची नि:पक्ष चौकशी केली जाईल. संबधितांवर कारवाई देखील केली जाईल.- श्वेता महाले-पाटीलसभापती, महिला व बालकल्याण, जिल्हा परिषद बुलडाणा.

 

टॅग्स :khamgaonखामगाव