शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

लग्नसमारंभात रोपटे वाटप करून दिला ‘पर्यावरण बचाव’चा संदेश

By admin | Updated: May 20, 2017 00:21 IST

किनगावराजा : जायभाये परिवाराने समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आणि लग्नसमारंभास आलेल्या पाहुण्यांना रोपट्याचे वाटप करून ‘पर्यावरण बचाव’चा संदेश दिला.

लोकमत न्यूज नेटवर्ककिनगावराजा: आज लग्नसमारंभ म्हटले की हार तुरे, भाषणे आणि स्वागत समारंभ पाहायला मिळतात; पण या सर्व गोष्टीला फाटा देत जायभाये परिवाराने समाजात वेगळा पायंडा पाडण्याचा सकारात्मक प्रयत्न केला आणि लग्नसमारंभास आलेल्या पाहुण्यांना रोपट्याचे वाटप करून ‘पर्यावरण बचाव’चा संदेश दिला.१५ मे रोजी किनगाव राजा येथील डॉ. शिवानंद जायभाये रा. सावखेड तेजन यांचे कनिष्ठ बंधू आणि लोकनेता प्रतिष्ठानचे सदस्य भारत जायभाये यांचा लग्नसोहळा देऊळगावराजा येथील दीनदयाल महाविद्यालयात संपन्न झाला. सध्या आपण सर्व पाणी व दुष्काळाचा सामना करत आहे. या गोष्टीचा या परिवाराने सकारात्मक विचार करून येणाऱ्या पाहुण्यांचे हार-तुरे न देता समाजात वृक्षाचे महत्त्व वाढावे आणि लोकांनी वृक्षारोपण करावे, याला चालना मिळावी म्हणून आलेल्या पाहुण्यांना चिक्कूच्या कलमा भेट देऊन समाजात एक वेगळा संदेश दिला. प्रातिनिधिक स्वरूपात ५० वृक्ष कलम देऊन आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. येत्या जून महिन्यात पर्यावरण सप्ताहात सावखेड फाटा ते सावखेड गावापर्यंत भारत जायभाये व पूजा जायभाये यांच्या विवाहप्रीत्यर्थ जायभाये परिवार वृक्षारोपण करणार असल्याचे डॉ. शिवानंद जायभाये यांनी सांगितले. खरे तर असाच संदेश घेऊन लोकांनी पर्यावरण जपण्याचा प्रयत्न अशा समारंभातून केला तर भविष्यात पाणी संकटाला तोंड देण्याचे काम पडणार नाही, एवढे मात्र नक्की. या लग्नसोहळ्यातील आलेल्या प्रत्येक आप्तस्वकीय, मित्र परिवार यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.