शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
3
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
4
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
5
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
6
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
7
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
8
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
9
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
10
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
11
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
12
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
13
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
14
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
15
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
16
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
17
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
18
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
19
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
20
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार

शौचालय बांधकामाला गती देण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’  मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:18 IST

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत गावे  हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व  स्वच्छता विभाग विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमां तर्गत प्रत्येक गावातील शौचालय बांधकामाचा वेग तिप्पट  वाढविण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायती  अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबरपासून सुरू  करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जबाबदार  अधिकारी मुक्कामी राहणार असून, लोकप्रतिनिधी स्वच्छता  सेवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.

ठळक मुद्देअधिकारी राहणार गावात मुक्कामीजबाबदार अधिकारी राहणार गावात मुक्कामी

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत गावे  हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व  स्वच्छता विभाग विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमां तर्गत प्रत्येक गावातील शौचालय बांधकामाचा वेग तिप्पट  वाढविण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायती  अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबरपासून सुरू  करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जबाबदार  अधिकारी मुक्कामी राहणार असून, लोकप्रतिनिधी स्वच्छता  सेवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.सदर अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत  संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शासनाने नियुक्त केलेले अधिकारी किंवा  कर्मचार्‍याच्या मार्गदर्शनाखाली अभियान काळात स्वच्छ तेविषयी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य  संस्था व स्वयंसेवी संस्थांचा स्वच्छता सेवेमध्ये सक्रिय  सहभाग वाढविणे व श्रमदानात सहभागी करून घेणे, गावात  स्वच्छता दिंडी आयोजित करणे, श्रमदानातून शौचालयाच्या  खड्डय़ांचे लाइन आउट देऊन प्रत्यक्ष काम करणे, गावातील  कुटुंबीयांना भेटी देणे, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक,  निगराणी समितीमार्फत शौचालय वापराबाबत जनजागृती  करणे, शाळा, अंगणवाड्यांना भेटी देऊन स्वच्छ शाळा  दिवस पाळणे, प्रभात फेरीचे आयोजन करणे, प्राथमिक  आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र येथे स्वच्छता अभियान  राबविणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो आदी  सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता मोहीम  राबविणे, साप्ताहिक बाजाराच्या ठिकाणी समूह शौचालय  यांची देखभाव दुरुस्ती करणे, प्रसार माध्यमाद्वारे जनजागृती  करणे, शाळा, महाविद्यालयात स्वच्छता कार्यक्रमाबाबत  निबंध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करणे आदी उपक्रमांचा  समावेश आहे.

जबाबदार अधिकारी राहणार गावात मुक्कामी‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी  तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  समन्वयाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत  समिती तसेच तालुका स्तरावरील विविध विभागातील वर्ग-  १, वर्ग- २ व वर्ग- ३ चे अधिकारी व कर्मचारी यांना  जिल्ह्यातील एक एक गाव नेमून देण्यात येणार आहे. या  गावात नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी रात्री मुक्कामी  राहणार असून, अभियान कालावधीत किमान दोन वेळा भेट  देऊन प्रत्येक भेटीत किमान तीन तास स्वच्छता या  विषयावरील विविध उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक  आहे.