शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

शौचालय बांधकामाला गती देण्यासाठी ‘स्वच्छता ही सेवा’  मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:18 IST

जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत गावे  हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व  स्वच्छता विभाग विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमां तर्गत प्रत्येक गावातील शौचालय बांधकामाचा वेग तिप्पट  वाढविण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायती  अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबरपासून सुरू  करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जबाबदार  अधिकारी मुक्कामी राहणार असून, लोकप्रतिनिधी स्वच्छता  सेवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.

ठळक मुद्देअधिकारी राहणार गावात मुक्कामीजबाबदार अधिकारी राहणार गावात मुक्कामी

हर्षनंदन वाघ। लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायत अंतर्गत गावे  हगणदरीमुक्त होण्यासाठी जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा व  स्वच्छता विभाग विविध उपक्रम राबवित आहे. या उपक्रमां तर्गत प्रत्येक गावातील शौचालय बांधकामाचा वेग तिप्पट  वाढविण्यासाठी राज्यासह जिल्ह्यातील ८६८ ग्रामपंचायती  अंतर्गत ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान १५ सप्टेंबरपासून सुरू  करण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जबाबदार  अधिकारी मुक्कामी राहणार असून, लोकप्रतिनिधी स्वच्छता  सेवामध्ये प्रत्यक्ष सहभागी होऊन श्रमदान करणार आहेत.सदर अभियान १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर गांधी जयंतीपर्यंत  संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत शासनाने नियुक्त केलेले अधिकारी किंवा  कर्मचार्‍याच्या मार्गदर्शनाखाली अभियान काळात स्वच्छ तेविषयी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे. या उपक्रमात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्य  संस्था व स्वयंसेवी संस्थांचा स्वच्छता सेवेमध्ये सक्रिय  सहभाग वाढविणे व श्रमदानात सहभागी करून घेणे, गावात  स्वच्छता दिंडी आयोजित करणे, श्रमदानातून शौचालयाच्या  खड्डय़ांचे लाइन आउट देऊन प्रत्यक्ष काम करणे, गावातील  कुटुंबीयांना भेटी देणे, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक,  निगराणी समितीमार्फत शौचालय वापराबाबत जनजागृती  करणे, शाळा, अंगणवाड्यांना भेटी देऊन स्वच्छ शाळा  दिवस पाळणे, प्रभात फेरीचे आयोजन करणे, प्राथमिक  आरोग्य केंद्र, उपआरोग्य केंद्र येथे स्वच्छता अभियान  राबविणे, शासकीय कार्यालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो आदी  सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन स्वच्छता मोहीम  राबविणे, साप्ताहिक बाजाराच्या ठिकाणी समूह शौचालय  यांची देखभाव दुरुस्ती करणे, प्रसार माध्यमाद्वारे जनजागृती  करणे, शाळा, महाविद्यालयात स्वच्छता कार्यक्रमाबाबत  निबंध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करणे आदी उपक्रमांचा  समावेश आहे.

जबाबदार अधिकारी राहणार गावात मुक्कामी‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी  तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी  समन्वयाने जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत  समिती तसेच तालुका स्तरावरील विविध विभागातील वर्ग-  १, वर्ग- २ व वर्ग- ३ चे अधिकारी व कर्मचारी यांना  जिल्ह्यातील एक एक गाव नेमून देण्यात येणार आहे. या  गावात नियुक्त अधिकारी किंवा कर्मचारी रात्री मुक्कामी  राहणार असून, अभियान कालावधीत किमान दोन वेळा भेट  देऊन प्रत्येक भेटीत किमान तीन तास स्वच्छता या  विषयावरील विविध उपक्रमाचे आयोजन करणे आवश्यक  आहे.