शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

अभयारण्ये खुली होताच वाढली पर्यटकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 10:48 IST

गत तीन महिने घरामध्ये बसून असलेले पर्यटक बाहेर पडले असून, जंगल भ्रमंतीसाठी गर्दी करीत आहेत.

- विवेक चांदूरकर लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: कोरोनामुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडली होती. गत काही दिवसांपूर्वीच ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे गत तीन महिने घरामध्ये बसून असलेले पर्यटक बाहेर पडले असून, जंगल भ्रमंतीसाठी गर्दी करीत आहेत. जिल्ह्यात लोणार, सिंदखेड राजा, अंबाबरवा व ज्ञानगंगा अभयारण्य, मैलगड, गोंधनापूरचा किल्ला आदी पर्यटनस्थळे आहेत. लोणार व सिंदखेड राजा येथे जगभरातून पर्यटक येतात. ज्ञानगंगा व अंबाबरवा अभयारण्ये गत तीन महिन्यांपासून पर्यटकांसाठी कोरोनामुळे बंद ठेवण्यात आली होती. मात्र गत आठवड्यात दोन्ही अभयारण्ये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. गत तीन महिन्यांपासून कोरोनामुळे सर्वच जण घरात बसून आहेत. बाहेर फिरण्यासाठी कोणतीही मुभा नसल्यामुळे अनेकजण त्रस्त झाले होते. त्यातच ज्ञानगंगा अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर दररोज पर्यटक अभयारण्यात फिरण्यासाठी गर्दी करीत आहेत. या अभयारण्यात सध्या टी वन वाघाचे वास्तव्य असल्याने वाघाचे दर्शन घेण्याकरिता पर्यटकांची उत्सूकता वाढली आहे. तसेच या अभयारण्यात बिबट, अस्वल, सांबर, चितळ, हरिण, नीलगाय, सायाळ, रानडुक्कर आदी प्राणी आहेत. मोर, पोपट, बदकासह अनेक पक्षीही अभयारण्यात निदर्शनास पडतात.अभयारण्यात फिरण्याकरिता बोथा येथे नोंदणी करावी लागत असून, तेथून वनविभागाच्या जीप्सीमध्ये पर्यटकांना जंगलात सफारीसाठी सोडण्यात येते. जिल्ह्याबाहेरील पर्यटक सुद्धा अभयारण्यात फिरण्यासाठी गर्दी करीत आहेत.

अभयारण्यात फिरण्याचे नियम बदललेज्ञानगंगा अभयारण्यात कोरोनामुळे फिरण्याचे नियम बदलण्यात आले आहेत. एका जिप्सीमध्ये आधी आठ जणांना बसविण्यात येत होते. आता मात्र एका कुटुंबातील असले तर चार आणि वेगवेगळे असले तर दोघांनाच बसविण्यात येते. तसेच अभयारण्यात जाण्यापूर्वी तपासणी करण्यात येत आहे. पर्यटकांनी मास्क लावणे आवश्यक आहे. अभयारण्यात असलेल्या ८ सुटपैकी केवळ दोनच सुट पर्यटकांसाठी राखीव करण्यात येत आहेत.

अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आल्यानंतर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. कोरोनामुळे घरात बसून त्रस्त झालेले नागरिक आता फिरण्यासाठी बाहेर पडत आहेत. दररोज पर्यटक गर्दी करीत आहेत. बोथा येथे नोंदणी करण्यात येत असून, तेथे पर्यटकांची तपासणी केल्यानंतर अभयारण्यात जिप्सीमध्ये फिरविण्यात येत आहे.-संतोष डांगे वनपरिक्षेत्र अधिकारी, ज्ञानगंगा अभयारण्य, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य