शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पाणीपुरवठा योजनेच्या कामास मंजुरी

By admin | Updated: December 14, 2015 02:23 IST

रायमूलकर यांची पत्रकार परिषदेत माहिती.

लोणार (जि. बुलडाणा) : शहराला सातत्याने भेडसावणारा पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी सुजल निर्मल योजनेंतर्गत बोरखेडी धरणावरून कार्यान्वित होणार्‍या वाढीव पाणीपुरवठा योजनेची वितरण व्यवस्था आणि पाण्याच्या टाक्यांच्या कामासाठी शासनस्तरावर सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास ता त्काळ मंजुरी देऊन १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्याची मागणी आ.डॉ. संजय रायमूलकर यांनी मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे ९ डिसेंबर रोजी केली. सदर प्रस्तावास अधिवेशन संपण्यापूर्वी मंजुरी देण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून मिळाल्याची माहिती स्थानिक कृषिउत्पन्न बाजार समितीत आयोजित पत्रकार परिषदेतून आ. रायमुलकर यांनी दिली. लोणार हे ह्यअह्ण वर्ग दर्जा प्राप्त पर्यटनस्थळ आहे. लोणार नगरपालिकेत विरोधकांची सत्ता असली तरी विकासकामात कोणत्याही प्रकारचे राजकारण करणार नसल्याचे आ. रायमूलकर यांनी सांगितले. शहराचा पर्यटनात्मक विकासासाठी शासनाकडून पाहिजे तेवढा निधी आणताना विरोधकांना हवे ते सहकार्य करण्याची माझी भूमिका आहे. शहराच्या विकासाच्या दृष्टिकोणातून प्रस्ताव नगराध्यक्षांनी सादर केल्यास ते मु ख्यमंत्र्याकडून मंजूर करून घेण्याची जबाबदारी माझी, असेही यावेळी आ. रायमूलकर यांनी सांगितले. शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्यासाठी बोरखेडी धरणावरून कार्यान्वित होणार्‍या २७ कोटी रुपयांच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेस मंजुरी मिळाल्यानंतर यामधून धरणाच्या पुनस्र्थापनेकरिता १0 कोटी २९ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती; परंतु जलसंपदा विभागाने पुनस्थापनेचा खर्च पूर्णत: माफ केल्याने सदर १0 कोटी रुपयांची बचत झाली होती; मात्र शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेत पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्थेच्या खर्चाचा समावेश नसल्याने कामे सुरू करण्यात अडचण निर्माण झाली आहे. याबाबत ह्यलोकमतह्णने ८ डिसेंबरच्या अंकात वृत्त प्रकाशित केल्यानंतर आ. रायमूलकर आणि योजनेचे कंत्राटदार सास्ते पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पूर्वी पाण्याच्या टाक्या आणि वितरण व्यवस्थेच्या कामासाठी विशेष बाब म्हणून वाढीव सुधारित १३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणी केली.