शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
2
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
3
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
4
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
5
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
6
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
7
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
8
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
9
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
10
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
11
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
12
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
13
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
14
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
15
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
16
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
17
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
18
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
19
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
20
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?

रासायनिक खतांची विक्री जुन्या दरानेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चिखली : केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या नसल्या तरीसुद्धा खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे भाव वाढवले. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चिखली : केंद्र सरकारने खतांच्या किमती वाढविल्या नसल्या तरीसुद्धा खत उत्पादक कंपन्यांनी खतांचे भाव वाढवले. दरम्यान, केंद्राने खतांवरील सबसिडी वाढवून किमती कमी केल्या असल्याने जुन्या दरात खते मिळणे अपेक्षित आहे. मात्र, कंपनीकडून कोणत्याही सूचना नसल्याने लहान-मोठ्या खत वितरकांना खतांच्या किमती निश्चित सांगता येत नाहीत. त्यामुळे खतांच्या किमतीबाबत असलेला हा संभ्रम दूर करावा, अशी मागणी आमदार श्वेता महाले पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली हाेती़. यावेळी त्यांनी खते जुन्या दरानेच देण्याचे आश्वासन दिले आहे.

खतांच्या किमती वाढलेल्या नसताना खत कंपन्यांकडून वाढीव दराने खतांची विक्री होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि यामुळे शेतकऱ्यांसह लहान-मोठ्या खत वितरकांना होत असलेला त्रास पाहता, आमदार श्वेता महाले यांनी २५ मे रोजी जिल्हाधिकारी एस. राममूर्ती यांची खते वितरकांसह भेट घेतली. तत्पूर्वी आमदार महालेंनी चिखली शहरातील खत वितरक आणि तालुका कृषी अधिकारी यांची २४ मे रोजी बैठक घेऊन याबाबत माहिती घेतली होती. त्यानंतर आमदार महालेंनी वितरकांसह २५ मे राेजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन खतांच्या दराबाबत असलेला संभ्रम दूर करण्याची मागणी केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी जुन्याच दरात खते मिळतील, असे आश्वासन दिले आहे. या बैठकीला बुलडाणा भाजप तालुकाध्यक्ष अ‍ॅड. सुनील देशमुख, उबाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नाईक, तालुका कृषी अधिकारी अमोल शिंदे, महेश महाजन, रमेश सिसोदिया, राजेंद्र बाहेकर, पुरूषोत्तम सुरडकर, दीपक बोंद्रे, आशिष बोंद्रे, बाळू देशमुख, पांडुरंग होणे, सोनुने, आदी उपस्थित होते.

खत उत्पादक कंपन्यांवर कारवाई करा

खत वितरकांनी वाढीव दराने अ‍ॅडव्हान्स पैसे भरले आहेत. तसेच आता नव्याने खते घेण्याची वितरकांकडून मागणी गेल्यास खतांच्या किमती कमी न करता, वाढीव दरानेच पैसे भरावे लागतील, असे खते उत्पादक कंपन्या सांगत आहेत. त्यामुळे खत उत्पादक कंपन्यांची मनमानी मोडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीही यावेळी आमदार महाले यांनी केली.

बियाण्यासाठी महाडीबीटीला मुदतवाढ द्या !

महाडीबीटी अंतर्गत सोयाबीन बियाण्यांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. परंतु, लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सर्व ई - सेवा केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज करता आले नाहीत. महाडीबीटी पोर्टलवर सोयाबीन बियाण्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे होती. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची तारीख वाढवून देण्याची मागणी आमदार महालेंनी यावेळी केली.

कृषी सेवा केंद्रांची वेळ वाढवावी !

खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे. पेरणीच्या ऐन हंगामात दुकाने कमी वेळासाठी उघडी राहिल्यास मोठ्या प्रमाणावर गर्दी होईल आणि कोरोनाचा प्रसार होण्याची जास्त शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कृषी सेवा केंद्रांना सकाळी ९ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी ही बाब मान्य करून तसा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.