शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
4
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
5
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
6
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
7
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
8
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
9
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
11
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
12
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
13
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
14
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
15
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
16
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
17
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
18
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
19
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
20
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ

देशाचा राज्यकर्ता घाबरलेला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:35 IST

सिंदखेडराजा : देशाचा राज्यकर्ता घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी राजधानीत काटेरी तारेचे कुंपण घातले जात आहे, अशी खरमरीत टीका ...

सिंदखेडराजा : देशाचा राज्यकर्ता घाबरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांसाठी राजधानीत काटेरी तारेचे कुंपण घातले जात आहे, अशी खरमरीत टीका राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.

राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमानिमित्त जयंत पाटील सोमवारी सिंदखेडराजा येथे होते. मेहकर व सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी पदाधिकारी बैठकीत बोलताना पाटील यांनी जिल्ह्यातील जिगाव प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा या जिल्ह्यात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी वैनगंगेचे पाणी नळगंगेपर्यंत आणण्याचा विचार सुरू असल्याचे ते म्हणाले. सिंदखेडराजासारख्या पवित्र ठिकाणी येऊन समाधान झाल्याचे सांगून त्यांनी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकारने केलेला शेतकरी कायदा या देशातील शेतकऱ्यांना मानवणारा नाही, राष्ट्रवादीचे नेते खा. शरद पवार यांनी केंद्र सरकारला अनेकवेळा चांगले सल्ले दिले होते मात्र त्याकडे मोदी सरकारचे लक्ष नाही, असे ते म्हणाले. मोदी सरकारने कंपनी कायद्यात बदल करून तीनशेपेक्षा जास्त कामगार संख्या असलेल्या कंपन्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. याही पुढे जाऊन हे सरकार दीड हजार पेक्षा कमी संख्या असलेल्या कारखान्यांवर बंदीची वेळ आणणार आहे. त्यामुळे बेरोजगारी वाढणार असल्याचे भाकीत त्यांनी केले. राज्यातील विरोधकांवर त्यांनी टीका केली.

कार्यक्रमाला पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, युवा अध्यक्ष मेहबूब शेख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. नाझेर काजी, विविध आघाड्यांवर प्रदेशाध्यक्ष यावेळी उपस्थित होते.