बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या वतीने तीव्र निषेधमलकापूर: पाकिस्तान व दहशतवाद्यांकडून भारतीय जवानांवर भ्याड हल्ले केले जात आहे. या बाबीचा तीव्र निषेध करण्याकरिता २ मे रोजी मलकापूर शहरात बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेच्या संयुक्त विद्यमाने तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला.भारतीय सैनिकांवर काश्मीर घाटीमध्ये व सरहद्दीवर तसेच इतर ठिकाणी पाकिस्तानी सैनिकांद्वारा व दहशतवाद्यांकडून निंदनीय कृत्ये केली जात आहेत. ही बाब निषेधार्थ असून, याविरुद्ध मंगळवारी बसस्थानक येथून आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी शहीद जवान अमर रहे, पाकिस्तान मुर्दाबाद, भारतीय सेना जिंदाबाद अशी नारेबाजी करीत परिसर दणाणून सोडला. सदर मोर्चा हनुमान चौक, निमवाडी चौक, स्टेशन रोड मार्गे तहसील चौकात धडकला. तद्वतच बजरंग दलाचे विदर्भ प्रांत सहसंयोजक अॅड. अमोल अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत महामहीम राष्ट्रपतींना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले.या आक्रोश मोर्चात अॅड. अमोल अंधारेंसह जिल्हा सहसंयोजक मोहनसिंग राजपूत, बजरंग दल गौरक्षा जिल्हाप्रमुख श्रीकृष्ण तायडे, बजरंग दल शहर अध्यक्ष दीपक कपले, उमेश बैरागी या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह गणेश भोपळे, गजानन ठोसर, कॅप्टन माजी सुभेदार नारायणराव डिवरे, सुरेश भोजने, दामोधर शर्मा, डॉ. विजय डागा, नगरसेवक सुहास चवरे, नगर संघचालक दामोधरदास लख्खानी, शिवसेनेचे अरुण अग्रवाल, अमोल टप, पिंटू कवळकार, आशीष माहुरकर, विजय अंबुसकर, त्रिवेदीसर, डॉ. गोपाळराव वानखेडे, कृष्णा मेहसरे, भूषण बोरसे यासह बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व हिंदू समाजप्रेमी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनशहराच्या विविध मार्गांवरून हा मोर्चा निघाल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. या निवेदनात भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा
By admin | Updated: May 2, 2017 23:33 IST