शहरं
Join us  
Trending Stories
1
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
2
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूर स्थगित केलंय, थांबवलेलं नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा
3
"भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
4
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
5
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
7
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
8
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
9
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
10
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
11
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
12
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
13
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
14
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
15
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
16
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
17
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
18
सैफ-अमृताच्या घटस्फोटावर करीनाचं नाव घेत इब्राहिम अली खान म्हणाला असं काही.., वाचून व्हाल हैराण
19
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
20
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न

आरटीई प्रवेश संकटात; शाळांना परताव्याची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

बुलडाणा : आरटीइई अंतर्गत दरवर्षी हजाराे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येताे. या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना मिळते. सत्र २०१९-२०साठी ...

बुलडाणा : आरटीइई अंतर्गत दरवर्षी हजाराे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येताे. या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना मिळते. सत्र २०१९-२०साठी एक रुपयाही शाळांना मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया संकटात सापडल्याचे चित्र आहे.

सन २०१२-१३ पासून जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहेत. सुरुवातीच्या पाच वर्षांत शाळांना शंभर टक्के परतावा मिळाला आहे. मात्र, शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये ७५ टक्के रक्कमच वाटप करण्यात आली. शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये ३४ टक्के वाटप करण्यात आले. ६६ टक्के रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचे चित्र आहे. तसेच शैक्षिणक सत्र २०१९-२० साठी तर शिक्षण विभागाला एक रुपयाही मिळाला नसल्याचे चित्र आहे.

प्रवेश प्रक्रिया जाहीर

गत तीन वर्षांपासून शाळांना शुल्काची रक्कम मिळालेली नाही. अशातच शिक्षण विभागाने सन २०२१-२२साठी आरटीई अंतर्गंत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांची नाेंदणीही सुरू झाली असून, ९ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यात येणार आहे.

२०१७-१८ या वर्षात ७५ टक्केच मिळाले

शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये १४० शाळांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये एकूण ६ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. त्यासाठी शिक्षण विभागाने ३ काेटी ३९ लाख ५८ हजार २५६ रुपयांची मागणी केली हाेती. प्रत्यक्षात ४ काेटी ११ लाख २७ हजार ७६२ रुपयेच मिळाले आहेत.

२०१८-१९ या वर्षात ६६ टक्के कमी मिळाले

शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये १८३ शाळांनी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ७ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. शिक्षण विभागाने पाच काेटी ६२ लाख ८८ हजार ८६० रुपयांची मागणी केली हाेती. त्यापैकी केवळ एक काेटी ७० लाख ५३ हजार रुपयेच जिल्ह्याला मिळाले आहेत.

२०१९-२० या वर्षात निधीची प्रतीक्षाच

शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये १९८ शाळांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये एकूण ९ हजार २४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. त्यासाठी शिक्षण विभागाने सात काेटी ८९ लाख ४१ हजार ९३४ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, एक वर्ष लाेटल्यानंतरही शिक्षण विभागाला एक रुपयाही मिळालेला नाही. तसेच सन २०२०-२१चेही पैसे मिळालेले नाही. त्यामुळे, आरटीइ अंतर्गंत हाेणारी प्रवेश प्रक्रिया संकटात सापडली आहे.