शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आरटीई प्रवेश संकटात; शाळांना परताव्याची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

बुलडाणा : आरटीइई अंतर्गत दरवर्षी हजाराे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येताे. या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना मिळते. सत्र २०१९-२०साठी ...

बुलडाणा : आरटीइई अंतर्गत दरवर्षी हजाराे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येताे. या विद्यार्थ्यांचे शुल्क शासनाकडून संबंधित शाळांना मिळते. सत्र २०१९-२०साठी एक रुपयाही शाळांना मिळाला नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रिया संकटात सापडल्याचे चित्र आहे.

सन २०१२-१३ पासून जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेश देण्यात येत आहेत. सुरुवातीच्या पाच वर्षांत शाळांना शंभर टक्के परतावा मिळाला आहे. मात्र, शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये ७५ टक्के रक्कमच वाटप करण्यात आली. शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये ३४ टक्के वाटप करण्यात आले. ६६ टक्के रक्कम अद्यापही मिळाली नसल्याचे चित्र आहे. तसेच शैक्षिणक सत्र २०१९-२० साठी तर शिक्षण विभागाला एक रुपयाही मिळाला नसल्याचे चित्र आहे.

प्रवेश प्रक्रिया जाहीर

गत तीन वर्षांपासून शाळांना शुल्काची रक्कम मिळालेली नाही. अशातच शिक्षण विभागाने सन २०२१-२२साठी आरटीई अंतर्गंत प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. शाळांची नाेंदणीही सुरू झाली असून, ९ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्यात येणार आहे.

२०१७-१८ या वर्षात ७५ टक्केच मिळाले

शैक्षणिक सत्र २०१७-१८ मध्ये १४० शाळांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये एकूण ६ हजार ५०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. त्यासाठी शिक्षण विभागाने ३ काेटी ३९ लाख ५८ हजार २५६ रुपयांची मागणी केली हाेती. प्रत्यक्षात ४ काेटी ११ लाख २७ हजार ७६२ रुपयेच मिळाले आहेत.

२०१८-१९ या वर्षात ६६ टक्के कमी मिळाले

शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये १८३ शाळांनी नाेंदणी केली हाेती. त्यामध्ये ७ हजार ६४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. शिक्षण विभागाने पाच काेटी ६२ लाख ८८ हजार ८६० रुपयांची मागणी केली हाेती. त्यापैकी केवळ एक काेटी ७० लाख ५३ हजार रुपयेच जिल्ह्याला मिळाले आहेत.

२०१९-२० या वर्षात निधीची प्रतीक्षाच

शैक्षणिक सत्र २०१९-२० मध्ये १९८ शाळांनी नाेंदणी केली हाेती. यामध्ये एकूण ९ हजार २४७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हाेता. त्यासाठी शिक्षण विभागाने सात काेटी ८९ लाख ४१ हजार ९३४ रुपयांची मागणी शासनाकडे केली आहे. मात्र, एक वर्ष लाेटल्यानंतरही शिक्षण विभागाला एक रुपयाही मिळालेला नाही. तसेच सन २०२०-२१चेही पैसे मिळालेले नाही. त्यामुळे, आरटीइ अंतर्गंत हाेणारी प्रवेश प्रक्रिया संकटात सापडली आहे.