शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

रोहयोमध्ये जगण्याचे बळ!

By admin | Updated: February 29, 2016 02:25 IST

बुलडाणा जिल्हा नियोजन समिती सभागृहात आढावा बैठक.

बुलडाणा : समाजातील दीन- दुबळ्या घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना ही अशा घटकांना मजुरीच्या माध्यमातून समाजात ताठ मानेने जगण्याचे बळ देते. या योजनेत जनसामान्यांमध्ये जगण्याची ताकद निर्माण करण्याची क्षमता असून, योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना समितीचे अध्यक्ष जयकुमार रावल यांनी दिल्या. स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात २८ फेब्रुवारी रोजगार हमी योजनेची ची जिल्हा आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समिती सदस्य आमदार शोभा फडणवीस, सुभाष देशमुख, संजय रायमुलकर, बुलडाण्याचे आमदार हर्षवर्धन सपकाळ, सहसचिव म. मु काज, रोहयोचे उपसचिव प्रमोद शिंदे, कक्ष अधिकारी शशिकांत गायकवाड आदी उपस्थित होते. राज्याचे नवनिर्माण करण्यासाठी रोहयोमध्ये आमूलाग्र बादल करण्यात येणार असल्याचे संकेत देत रावल म्हणाले की, या योजनेत लवचिकता आणून मोठय़ा प्रमाणावर मजुरांना तातडीने कामे उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे. लवकरच महाराष्ट्र जनकल्याण स्वाभिमान योजना आणण्यात येणार आहे. ही योजना अत्यंत प्रभावीपणे राज्यातील बेरोजगार हातांना काम देऊन निर्माण कार्य करेल. ते म्हणाले की, भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने विहीर पुनर्भरणाची कामे रोहयोच्या माध्यमातून घेण्यात यावी. गोठा, तलावातील गाळ काढणे, फळबाग लागवड, शौचालय निर्मिती, शेत रस्ते, गावातील अंतर्गत रस्ते आदी कामे रोहयोतून घेता येतात. ती घ्यावी आणि रोजगार उपलब्ध करून द्यावा. मजुरांचे पगार देताना पगार हजेरीपत्रक दोन वेळा जर चुकल्यास संबंधित कर्मचार्‍याला निलंबित करण्याचे आदेशही त्यांनी यावेळी दिले. मेहकर तहसीलदार यांनी स्व:खर्चातून गाळ काढण्याचे सुरू केलेले काम प्रशंसनीय असल्याचे ते म्हणाले. समितीला जिल्हाधिकारी डॉ. विजय झाडे यांनी माहिती दिली. बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, रोहयो उपजिल्हाधिकारी रमेश घेवंदे, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक एस. आर. मोरे, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे, जिल्हा कृषी अधीक्षक प्रमोद लहाळे, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण कथने आदींसह विविध विभागांचे विभागप्रमुख, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.