शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर येथे रास्ता रोको, आंदोलनकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:32 IST

दिल्ली येथील ७० दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय ...

दिल्ली येथील ७० दिवसांपासून सुरु असलेल्या आंदोलनाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत असल्यामुळे येणाऱ्या काळात स्वाभिमानी शेतकरी संघटना व राष्ट्रीय किसान समन्वय समितीच्या माध्यमातून राष्ट्रीय किसान मोर्चा, आम आदमी पार्टीच्या वतीने आंदोलनाची भूमिका ठरवू तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा आक्रमक झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी दिला. केंद्र सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन प्रमुख शेतकरी नेत्यांची आंदोलनकर्त्यांशी चर्चा करायला हवी होती. शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला पाहिजे होते, तसे होताना कुठेही दिसत नाही, असे मत यावेळी आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केले. आंदोलनादरम्यान पोलिस बंदोबस्त होता. आंदोलन करत असताना वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, पोलिसांनी जिल्हाध्यक्ष डॉ.ज्ञानेश्वर टाले यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांना आंदोलन करताना ताब्यात घेऊन अटक केली होती. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष प्रफुल्ल देशमुख, पक्षाचे तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल, लोणार तालुका अध्यक्ष सहदेव लाड, तालुका उपाध्यक्ष अनिल पवार, अशपाक शहा, अफरोज शहा, सदाशिव वडुळकर, अजम कुरेशी, अजगर कुरेशी, राष्ट्रीय किसान मोर्चाचे ॲड. विष्णू सरदार, अरुण गवळी, गजानन धंदोरे, गजानन पवार, भास्कर कंकाळ, आम आदमी पार्टीचे भानुदास पवार, वसुदेव लंबे, संजय लष्कर, मच्छिंद्र सेलकर, रवी निकाळजे व शेतकरी उपस्थित होते.