शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
3
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
4
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
5
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
6
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
7
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
8
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
9
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
10
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
11
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?
12
कर्ज घेऊन कार खरेदी करणे अधिक फायदेशीर ठरते का?
13
'इराणकडे भरपूर तेल...', ट्रम्प यांचा इराणी तेलावर डोळा; तीन दिवसात तीनवेळा केला उल्लेख
14
ती मुलगी मला पसंत नव्हती, तरी...; २३ वर्षांच्या नवरदेवाने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली अन् केलं कांड!
15
भारताच्या मित्र देशात सत्तांतराचं मोठं षडयंत्र अयशस्वी; प्रमुख आर्कबिशप यांच्यासह १४ जण अटकेत
16
"मला आणि माझ्या मुलाला इच्छामरणाचा अधिकार द्या" मुंबईकराचं फडणवीसांना पत्र, कारणही सांगितलं!
17
युद्धविराम झाला तरी...! इराणचे खामेनी बेपत्ता, इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन सुरूच
18
लाखावर दर गेल्यावर युरोप मागतोय अमेरिकेकडे सोने; रस्त्याच्या खाली आहे लाखो टन सोने...
19
"...तर आईची भाषा घरा बाहेर गेलीच समजा’’, वैभव मांगलेंची खरमरीत पोस्ट, उपस्थित केले असे प्रश्न 

हिवरा आश्रम ते जानेफळ रस्त्याचे काम प्रगतिपथावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

या रस्त्याच्या कामासाठी बेमुदत उपोषण ही करण्यात आले होते. त्यामुळे २६ जानेवारीला या रस्त्याच्या कामास सुरूवात झाली होती. परंतू ...

या रस्त्याच्या कामासाठी बेमुदत उपोषण ही करण्यात आले होते. त्यामुळे २६ जानेवारीला या रस्त्याच्या कामास सुरूवात झाली होती. परंतू या ना त्या कारणाने कामास विलंब होत होता. अखेर या रस्त्याचे निम्म्याहून अधिक काम पूर्ण झाले असून नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. हा रस्त्या अत्यंत महत्त्वपूर्ण असतानाही प्रशासनाने याकडे पाठ फिरवली होती. शिवाय रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडलेले होते. गावातील सांडपाण्यासाठी नाल्या नसल्यामुळे रस्त्याच्या मधोमध पाणी वाहत होते. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. त्यामुळेच हा रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण होता. गावातील नागरिक वसुदेव थुट्टे, संदिप काळे, एकनाथ काळे, परमेश्वर साबळे, विजय वाहेकर यांनी स्वतः हा खर्च करून पाईपद्वारे पाणी रस्त्याच्या कडेला काढले. पण जोपर्यंत पक्की नाली रस्त्याच्या कडेला होत नाही, तोपर्यंत याचा काही फायदा नाही. या लोकांप्रमाणेच इतर नागरिकांनी स्वतः च्या सांडपाण्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

गावा लगत माझी शेती असून पुर्ण रस्ता शेताला समांतर आहे. या रस्त्यावरून नागरिकांनी काढलेले पाणी पुर्ण शेतात पाझरणार त्यामुळे चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून पक्क्या नालीचे बांधकाम करणे गरजेचे आहे.

वसुदेव थुट्टे, शेतकरी, रायपूर.

शोषखड्डे घेण्याचे आवाहन

ज्यापध्दतीने नागरिकांनी पाईपव्दारे रस्त्याच्या कडेला पाणी काढले, त्याच पध्दतीने इतर गावकऱ्यांनी सांडपाण्याची व्यवस्था करावी. शोषखड्डे घ्यावेत असे आवाहन करून निधी उपलब्ध झाल्यास त्वरीत नालीचे काम करण्यात येईल अशी माहिती ग्रामसेवक मवाळ यांनी दिली.