शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पिकं बुडल्यात जमा!

By admin | Updated: September 25, 2014 01:18 IST

पश्‍चिम विदर्भातील कापूस व सोयाबीन पीकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव, शेतकरी अडचणीत.

खामगाव (बुलडाणा) : यावर्षी सुरुवातीपासून बळीराजावर अस्मानी संकट दिसून येत आहे. शेतमाल घरात येण्याच्या वेळेसच कपाशी व सोयाबीनवर रोगाचा विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने पश्‍चिम विदर्भातील सुमारे ४ लाख हेक्टरवरील सोयाबीन तसेच कपाशीचे पीक धोक्यात आले आहे. यावर्षी जून तसेच जुलै महिनाभर पावसाची अवकृपा झाली. विदर्भासोबतच राज्यात सर्वत्र पावसाने हुलकावणी दिली होती. त्यामुळे कोरडवाहूच्या पेरण्या रखडल्या होत्या. तर बागायती शेतीतील विहिरींची पाणीपातळी घटल्याने शेतकर्‍यांना मोठय़ा हिमतीवर, मेहनतीवर कपाशी पीक जगवावे लागले; मात्र त्यानंतर पाऊस येवून पिके बहरात असतानाच आता शेतमाल घरात येण्याच्या वेळेतच कपाशीवर मर रोगाचा तर सोयाबीन पिकावर खोड किड्यांचा व कापटोफ्थेरा बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच कोरडवाहू शेतातील सोयाबीन पीक फुले येण्याच्या अवस्थेतच पावसाअभावी सुकत आहे. या अस्मानी संकटामुळे शेतकर्‍यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आंतरमशागत न करता आल्यामुळे जमिनीत वाफसा स्थिती निर्माण झाली नाही; तसेच रस शोषणार्‍या तुडतुडे व फुलकिड्यांच्या तीव्र प्रादुर्भावामुळे कपाशी पिकाची पाने कडेने लाल झाली आहेत. त्वरित आंतरमशागत म्हणजे वखरणी करणे, एकरी २५ किलो युरियाची मात्रा त्वरित जमिनीतून देणे तसेच रस शोषणार्‍या किडींच्या नियंत्रणासाठी अँसिफेट+ अँडमायर हे मिश्र कीटकनाशक ६0 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेटची त्वरित फवारणी करण्याचा सल्ला कृषी विभागाकडून दिला जात आहे. तर सोयाबीनवर खोड किड्यांचा व कापटोफ्थेरा बुरशीचा प्रादुर्भाव झाला आहे. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याने शेतकरी पुरता खचला आहे.