शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास क्रांती घडू शकते : पुरुषोत्तम महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:25 IST

चिखली : सध्या कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगात थैमान घालत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या उपचारासोबतच मनाची शांतीदेखील आवश्यक ...

चिखली : सध्या कोरोना महामारीचे संकट संपूर्ण जगात थैमान घालत आहे. कोरोनाबाधित रुग्णांना आवश्यक त्या उपचारासोबतच मनाची शांतीदेखील आवश्यक आहे. अध्यात्मामध्ये मनाला शांती देण्याची शक्ती आहे. अशावेळी विज्ञानाला अध्यात्माची जोड दिल्यास क्रांती घडू शकते, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील बुलडाणेकर यांनी केले.

रविकांत तुपकर यांच्या पुढाकाराने किन्होळा येथे कोरोना कोविड सेंटरमध्ये रुग्णांना मनोबल वाढविण्यासाठी त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाची बिकट परिस्थिती पाहता गावोगावी विलगीकरण कक्ष उभारणे आवश्यक आहे, अशी संकल्पना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मांडली आणि त्यांच्या संकल्पनेतून किन्होळा येथे लोकसहभागातून जिल्ह्यातील पहिले कोविड आयसोलेशन सेंटर सुरू झाले. लोकसहभागातून आयसोलेशन सुरू करण्याच्या संकल्पनेसोबतच रविकांत तुपकर यांनी कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांना दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. यापूर्वी किन्होळा कोविड सेंटरमध्ये ऑर्केस्ट्रा आयोजित करण्यात आला होता. दरम्यान, शारीरिक उपचारासोबतच मानसिक उपचारांचीदेखील माणसाला मोठी गरज असते. कोरोनाच्या या संकटकाळात हरिनाम, भजन, कीर्तन आणि अध्यात्म मानसिक उपचारासारखेच ठरतात. मन तंदुरुस्त झाले तर शरीर आपोआप तंदुरुस्त होते. मनाला निरोगी ठेवण्यासाठी हरिनामाची आवड असणे आवश्यक आहे. भक्तीची शक्ती कोणतेही संकट सहज पार करून नेते, त्यामुळे ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि परमेश्वर आपल्यासोबत आहे, कोरोनाच्या संकटातून आपण सुरक्षित बाहेर पडू अशा आत्मविश्वासाने उपचाराला सहकार्य करा, असे आवाहनदेखील यावेळी हभप पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले. यावेळी कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांसोबतच रविकांत तुपकर, प्रभाकर बाहेकर, राजेश बाहेकर, मधुकर बाहेकर, दिनकर बाहेकर, सरपंच अर्चना जाधव, पोलीस पाटील नंदकिशोर बाहेकर यांच्यासह स्वयंसेवक या कीर्तनाला उपस्थित होते.