शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

श्री बालाजी महाराज गाभाऱ्यातील परिवार मूर्तींची पुनर्प्राणप्रतिष्ठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:41 IST

देऊळगावराजा : देऊळगावराजा या पावन नगरीमध्ये श्रीलक्ष्मी व्यंकटेश भगवंताचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे. या भगवंताच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या परिवार देवतांपैकी गणपती, ...

देऊळगावराजा : देऊळगावराजा या पावन नगरीमध्ये श्रीलक्ष्मी व्यंकटेश भगवंताचे प्रत्यक्ष वास्तव्य आहे. या भगवंताच्या कृपाशीर्वादाने त्यांच्या परिवार देवतांपैकी गणपती, देवी, गोपालकृष्ण, मल्हारी म्हाळसाकांत (खंडोबा), हनुमंत व तीन गरुड अशा एकूण आठ पंचधातूंच्या मूर्तींची अनादी कालापासून त्यावर होणाऱ्या धार्मिक उपचारांमुळे झीज झाली होती. त्यामुळे सुमारे ३२८ वर्षांनंतर शास्त्रानुसार त्यांचे नूतनीकरण करून प्रतिष्ठा करण्यात आली. सर्व मूर्तींमधील तेजोत्तारण विधीनुसार तेज काढून ते आठ कलशांमध्ये संग्रहित करण्यात आले. त्या सर्व मूर्ती अगोदर ज्या धातूंच्या होत्या त्याच धातूंच्या, त्याच आकाराच्या व त्याच वजनाच्या कोल्हापूर येथून नवीन बनविण्यात आल्या. ठरल्यानुसार शास्त्रीय मुहूर्तान्वये ९ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या कालावधीमध्ये त्यांची पुनर्प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यामध्ये ४० विद्वत् ब्रह्मवृंदांच्या साहाय्याने धार्मिक अनुष्ठाने करण्यात आली. त्यामध्ये प्रथम व द्वितीय दिवशी श्रीगणपती अथर्वशीर्षाचे १३०० पाठ, पुरुषसूक्ताचे १५०० पाठ, श्रीसूक्ताचे १६०० पाठ, श्री लक्ष्मी व्यंकटेशाला महारुद्र तथा श्रीखंडोबा, श्रीगोपालकृष्ण, श्री हनुमंत व श्रीगरुड यांचे त्यांचे गायत्रीचा जप अशी नानाविध अनुष्ठाने करण्यात आली. तृतीय दिवशी श्री दुर्गा सप्तशती पाठाची शतचंडी व प्राणप्रतिष्ठेला सुरुवात झाली. त्यामध्ये सर्वप्रथम प्रधान संकल्प करून श्रीगणपती पूजन, स्वस्ति पुण्याहवाचन, मातृकापूजन, वसोर्धारा पूजन, आयुष्यमंत्र जप, नांदीश्राद्ध, आचार्यादी ऋत्विजवरण, दिग्रक्षण, पंचगव्यकरण, वास्तुमंडल स्थापन, भूमिपूजन, अरणीमंथ्याच्या साहाय्याने अहिताग्नी श्री महादेव शास्त्री अग्निहोत्री यांच्या अधिपत्याखाली अग्निप्रज्वलन व स्थापन करण्यात आले. त्यानंतर योगिनी मंडल, द्वादशलिंगतो भद्रमंडल, मुख्यदेवता, क्षेत्रपाल, भैरव, ग्रहमंडल, मृत्युंजय अशा देवतांची स्थापना व त्यांचे पूजन झाले.

धार्मिक कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाचे देवाचे प्रतिनिधित्व म्हणून यजमानपद उदय पुजारी, गिरीश पुजारी, मयूर पुजारी तथा समस्त पुजारीवृंद यांनी उत्तमरीतीने सांभाळले. कार्यक्रमाचे आचार्य पांडुरंग देवउपाध्ये, ब्रह्मदेव गोविंदराव टोणपे, मिलिंद लाडसावंगीकर, शशिकांत अग्निहोत्री, संदेश लाडसावंगीकर, विनायक टोणपे, गजानन टोणपे, रमाकांत देव, प्रमोद जपे, गोविंद देव, विजय देवउपाध्ये, श्रीपाद गोंदकर तथा समस्त ब्रह्मवृंद यांनी उत्तमरीतीने पौरोहित्य सांभाळले. रामेश्वर पाठक यांनी कार्यक्रमाची सर्व सूत्रे सांभाळली. बालाजी संस्थानचे वंशपारंपरिक विश्वस्त राजे विजयसिंह जाधव यांच्या पुढाकाराने सर्व कार्यक्रम पार पडला.