शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

परतीचा प्रवासच ठरला त्यांच्या जीवनाचा अखेरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

सिंदखेड राजा/दुसरबीड : ‘समृद्धी’च्या कामासाठी मजुरांना घेऊन दैनंदिन पद्धतीने टिप्पर निघाला... पावसाची रिपरिप सुरूच होती... आज असे काही अघटित ...

सिंदखेड राजा/दुसरबीड : ‘समृद्धी’च्या कामासाठी मजुरांना घेऊन दैनंदिन पद्धतीने टिप्पर निघाला... पावसाची रिपरिप सुरूच होती... आज असे काही अघटित घडेल याची कोणालाच खबर नव्हती... मजुरांना घेऊन टिप्पर चालक साईटवर गेला, पण पाऊस असल्याने काम बंद असल्याचे सांगण्यात आल्याने मजुरांचा पुन्हा कॅम्पकडे परतीचा प्रवास सुरू झाला... आपल्यापुढे मरण वाढून ठेवले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती. सुटी मिळाल्याने सर्वचजण आनंदी होते. आजचा दिवस कॅम्पवर मुलाबाळांसोबत घालवायचा, असे अनेकांच्या मनात असेल. पण... पुढे काळ टपून बसला होता... आणि वेळ देखील आली होती... एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... १३ जणांचे संसार उघड्यावर आले. एकप्रकारे कॅम्पच्या दिशेने होणारा परतीचा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.

सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर समृद्धी महामार्गाच्या कामावरून परत येत असलेला मजुरांचा टिप्पर एका वाहनाला साईड देताना अरुंद रस्त्यावरून उलटल्याने अपघात होऊन १५ पैकी १३ मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडला. त्यामुळे सिंदखेड राजातील तढेगाव येथील समृद्धी कॅम्पवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मध्य प्रदेशातील या कामावरील मजूर नेहमीप्रमाणे शुक्रवारी आपल्या कामावर सकाळीच गेले. पण पावसामुळे समृद्धी महामार्गावरील काम बंद ठेवण्यात आल्याचे या मजुरांना सांगण्यात आले. त्यामुळे लोखंडी रॉड ठेवलेल्या टिप्परमध्ये बसून १५ मजुरांनी कॅम्पवर परतीचा मार्ग स्वीकारला. मात्र हा त्यांचा परतीचा प्रवास आयुष्याचा शेवटचा प्रवास असल्याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. दुसरबीडकडून तढेगाव कॅम्पकडच्या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वरून वळल्यानंतर अवघ्या २०० फुटाच्या अंतरावर या टिप्परला अपघात होऊन तो उलटला. त्यामुळे त्यात बसलेले मजूर खाली दबले. त्यांच्या अंगावर लोखंडी रॉड व त्यावर टिप्पर असा हा विचित्र अपघात होता.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अवजड टिप्पर, त्यातील लोखंडी रॉड आणि त्याखाली दबलेल्या मजुरांना कसे बाहेर काढणार, असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. क्रेनही बोलावण्यात आली. तोवर एक तास निघून गेला होता. मात्र स्थानिकांनी सुचेल त्या पद्धतीने लोखंडी रॉड बाजूला करत त्यात दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. पण बहुतांश जणांचा मृत्यू झालेला होता.

आक्रोष आणि असाहाय्यता...

हा अपघात कॅम्पपासून अवघ्या तीन ते चार कि.मी. अंतरावर झाला. अपघाताची माहिती मिळताच कॅम्पवरील मजूरही घटनास्थळाकडे धावले. परंतु अजस्त्र टिप्पर, तसेच लोखंडी रॉड पाहता, नेमके मदतकार्य कसे करायचे, असाच प्रश्न सर्वांना पडला होता. आपले आप्तस्वकीय याखाली दबले गेल्याची जाणीव होताच, तेथे आक्रोष सुरू झाला होता. मदत करण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे असाहाय्यता निर्माण झाली होती. जमेल त्या पद्धतीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न स्थानिकांनी सुरू केले. लोखंडी रॉडखाली निपचीत पडलेले मजूर पाहून उपस्थितांचे काळीज हादरून गेले.