शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

परतीचा प्रवासच ठरला त्यांच्या जीवनाचा अखेरचा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:39 IST

सिंदखेड राजा/दुसरबीड : ‘समृद्धी’च्या कामासाठी मजुरांना घेऊन दैनंदिन पद्धतीने टिप्पर निघाला... पावसाची रिपरिप सुरूच होती... आज असे काही अघटित ...

सिंदखेड राजा/दुसरबीड : ‘समृद्धी’च्या कामासाठी मजुरांना घेऊन दैनंदिन पद्धतीने टिप्पर निघाला... पावसाची रिपरिप सुरूच होती... आज असे काही अघटित घडेल याची कोणालाच खबर नव्हती... मजुरांना घेऊन टिप्पर चालक साईटवर गेला, पण पाऊस असल्याने काम बंद असल्याचे सांगण्यात आल्याने मजुरांचा पुन्हा कॅम्पकडे परतीचा प्रवास सुरू झाला... आपल्यापुढे मरण वाढून ठेवले आहे, याची कल्पना कोणालाच नव्हती. सुटी मिळाल्याने सर्वचजण आनंदी होते. आजचा दिवस कॅम्पवर मुलाबाळांसोबत घालवायचा, असे अनेकांच्या मनात असेल. पण... पुढे काळ टपून बसला होता... आणि वेळ देखील आली होती... एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं... १३ जणांचे संसार उघड्यावर आले. एकप्रकारे कॅम्पच्या दिशेने होणारा परतीचा प्रवासच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरला.

सिंदखेड राजा तालुक्यातील तढेगाव फाट्यावर समृद्धी महामार्गाच्या कामावरून परत येत असलेला मजुरांचा टिप्पर एका वाहनाला साईड देताना अरुंद रस्त्यावरून उलटल्याने अपघात होऊन १५ पैकी १३ मजुरांचा मृत्यू झाला, तर दोन जणांची मृत्यूशी झुंज सुरू आहे. हा अपघात शुक्रवारी सकाळी ११:३० च्या सुमारास घडला. त्यामुळे सिंदखेड राजातील तढेगाव येथील समृद्धी कॅम्पवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

मध्य प्रदेशातील या कामावरील मजूर नेहमीप्रमाणे शुक्रवारी आपल्या कामावर सकाळीच गेले. पण पावसामुळे समृद्धी महामार्गावरील काम बंद ठेवण्यात आल्याचे या मजुरांना सांगण्यात आले. त्यामुळे लोखंडी रॉड ठेवलेल्या टिप्परमध्ये बसून १५ मजुरांनी कॅम्पवर परतीचा मार्ग स्वीकारला. मात्र हा त्यांचा परतीचा प्रवास आयुष्याचा शेवटचा प्रवास असल्याची साधी कल्पनाही त्यांना नव्हती. दुसरबीडकडून तढेगाव कॅम्पकडच्या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ सी वरून वळल्यानंतर अवघ्या २०० फुटाच्या अंतरावर या टिप्परला अपघात होऊन तो उलटला. त्यामुळे त्यात बसलेले मजूर खाली दबले. त्यांच्या अंगावर लोखंडी रॉड व त्यावर टिप्पर असा हा विचित्र अपघात होता.

या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र अवजड टिप्पर, त्यातील लोखंडी रॉड आणि त्याखाली दबलेल्या मजुरांना कसे बाहेर काढणार, असा प्रश्न त्यांना निर्माण झाला. क्रेनही बोलावण्यात आली. तोवर एक तास निघून गेला होता. मात्र स्थानिकांनी सुचेल त्या पद्धतीने लोखंडी रॉड बाजूला करत त्यात दबलेल्या मजुरांना बाहेर काढले. पण बहुतांश जणांचा मृत्यू झालेला होता.

आक्रोष आणि असाहाय्यता...

हा अपघात कॅम्पपासून अवघ्या तीन ते चार कि.मी. अंतरावर झाला. अपघाताची माहिती मिळताच कॅम्पवरील मजूरही घटनास्थळाकडे धावले. परंतु अजस्त्र टिप्पर, तसेच लोखंडी रॉड पाहता, नेमके मदतकार्य कसे करायचे, असाच प्रश्न सर्वांना पडला होता. आपले आप्तस्वकीय याखाली दबले गेल्याची जाणीव होताच, तेथे आक्रोष सुरू झाला होता. मदत करण्याची इच्छा असूनही परिस्थितीमुळे असाहाय्यता निर्माण झाली होती. जमेल त्या पद्धतीने त्यांना वाचविण्याचे प्रयत्न स्थानिकांनी सुरू केले. लोखंडी रॉडखाली निपचीत पडलेले मजूर पाहून उपस्थितांचे काळीज हादरून गेले.