शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

संग्रामपूर, जळगावमध्ये विंधन विहिरींवर निर्बंध

By admin | Updated: April 7, 2015 01:57 IST

भूजल प्राधिकरणाचा निर्णय; जमिनीची होत आहे चाळणी.

बुलडाणा : जिल्ह्यात भूजलाचा वापर हाच महत्त्वाचा स्त्रोत पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी जमिनीच्या पोटाची अक्षरक्ष: चाळणी करून कूपनलिका व विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. या कूपनलिका किती खोल घेतल्या जाव्यात, यासाठी भूजल अधिनियम असला तरी तो कागदावरच राहतो त्यामुळे अनेक परिसरात अतिउपसा झाला असल्याने राज्याच्या भूजल प्राधिकरणाने खोल कूपनलिका घेण्यावर बंधने आणली आहेत. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे कू पनलिका घेण्यास प्रतिबंध घातला असून, त्यामध्ये बुलडाण्याच्या संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यतील १३२ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य भूजल प्राधिकरणाने राज्यातील अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विंधन विहीर व कूपनलिका खोदण्यास प्रतिबंध घातला आहे. या क्षेत्रात अशा विंधन विहिरी किंवा कूपनलिका खोदल्या, तर भूजल भरण व उपसा यांचे संतुलन राहत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अपवादात्मक स्थि तीत मात्र परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामध्ये संग्रामपूर व जळगाव जामोद या खारपाण पट्टय़ातील दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. खारपाणपट्टय़ात जमीन चोपणची असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आधीच कमी आहे. येथे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांनी ४00 फुटांपेक्षाही जास्त विंधन विहिरी घेतल्या आहेत. त्यामुळे जमिनीतील उपसा मोठय़ा प्रमाणात वाढला असून, तो थांबला नाही. पुनर्भरण व उपसा यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण झाले आहे. या १३२ गावांपैकी ६0 टक्के गावे हे तर अतिशोषित स्वरूपात मोडत असल्याने भूजल अधिनियमनाची अंमलबजावणी गांभीर्याने घेणे गरजचे आहे.