शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
4
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
6
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
7
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
8
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
9
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
10
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
11
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
12
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
13
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
15
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
16
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
17
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
18
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
19
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
20
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

संग्रामपूर, जळगावमध्ये विंधन विहिरींवर निर्बंध

By admin | Updated: April 7, 2015 01:57 IST

भूजल प्राधिकरणाचा निर्णय; जमिनीची होत आहे चाळणी.

बुलडाणा : जिल्ह्यात भूजलाचा वापर हाच महत्त्वाचा स्त्रोत पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध आहे. त्यासाठी जमिनीच्या पोटाची अक्षरक्ष: चाळणी करून कूपनलिका व विंधन विहिरी घेतल्या जात आहेत. या कूपनलिका किती खोल घेतल्या जाव्यात, यासाठी भूजल अधिनियम असला तरी तो कागदावरच राहतो त्यामुळे अनेक परिसरात अतिउपसा झाला असल्याने राज्याच्या भूजल प्राधिकरणाने खोल कूपनलिका घेण्यावर बंधने आणली आहेत. राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारे कू पनलिका घेण्यास प्रतिबंध घातला असून, त्यामध्ये बुलडाण्याच्या संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन तालुक्यतील १३२ गावांचा समावेश आहे. महाराष्ट्र राज्य भूजल प्राधिकरणाने राज्यातील अतिशोषित व शोषित पाणलोट क्षेत्रात सिंचन तसेच औद्योगिक वापरासाठी ६0 मीटरपेक्षा अधिक खोल विंधन विहीर व कूपनलिका खोदण्यास प्रतिबंध घातला आहे. या क्षेत्रात अशा विंधन विहिरी किंवा कूपनलिका खोदल्या, तर भूजल भरण व उपसा यांचे संतुलन राहत नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी अपवादात्मक स्थि तीत मात्र परवानगी दिली जाणार आहे. या निर्णयामध्ये संग्रामपूर व जळगाव जामोद या खारपाण पट्टय़ातील दोन तालुक्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. खारपाणपट्टय़ात जमीन चोपणची असल्यामुळे पाणी धरून ठेवण्याची क्षमता आधीच कमी आहे. येथे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांनी ४00 फुटांपेक्षाही जास्त विंधन विहिरी घेतल्या आहेत. त्यामुळे जमिनीतील उपसा मोठय़ा प्रमाणात वाढला असून, तो थांबला नाही. पुनर्भरण व उपसा यांच्यामध्ये व्यस्त प्रमाण झाले आहे. या १३२ गावांपैकी ६0 टक्के गावे हे तर अतिशोषित स्वरूपात मोडत असल्याने भूजल अधिनियमनाची अंमलबजावणी गांभीर्याने घेणे गरजचे आहे.