शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची जबाबदारी आता शाळा प्रशासनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार अनुदानित शाळांमधील शिपाई हे पद आता कालबाह्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार अनुदानित शाळांमधील शिपाई हे पद आता कालबाह्य झाले आहे. यापुढे अनुदानित शाळांमध्ये केवळ कंत्राटी पद्धतीनेच ही पदे भरता येणार आहेत. यामुळे स्वच्छतेची जबाबदारी आता शाळा प्रशासनावर आलेली आहे.

अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिपाई, नाईक, पहारेकरी, सफाईगार, प्रयोगशाळा आदी स्वरूपातील चतुर्थश्रेणी पदांवर कार्यरत कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पदे कालबाह्य होणार आहेत. त्यानंतर सदर पदे कंत्राटी पद्धतीने भरून शाळांना त्यासाठी ठरावीक भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. त्याला ‘शिपाई भत्ता’ असे संबोधण्यात येणार आहे. मात्र, हा भत्ता अगदीच कमी राहणार असल्याने शाळांवर काम करण्यासाठी कर्मचारी मिळतील किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षण विभागाने प्रस्तावच मागविले नाही

शालेय शिक्षण विभागाने अनुदानित शाळांवरील शिपायांची पदे कालबाह्य ठरविली आहेत. यापुढे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरून त्यांना ‘शिपाई भत्ता’ या नावाखाली ठरावीक मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मागणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही कार्यवाही सुरू झालेली नाही.

अनुदानित शाळांमध्ये ५०० विद्यार्थ्यांमागे दोन शिपाई कंत्राटी तत्त्वावर भरण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र, ५०० विद्यार्थी बसविण्यासाठी किमान १५ वर्ग खोल्या लागतात. या वर्गखोल्या दोन शिपाई कसे स्वच्छ करतील. याशिवाय इतर कामेही कसे मार्गी लागतील, असे अनेक प्रश्न संस्थाचालकांना भेडसावत असल्याचे चित्र आहे.

अनुदानित शाळांतील शिपाई पद रद्द होणार का?

अनुदानित शाळांमध्ये पूर्वी ठरावीक वेतनश्रेणी लागू करुन शिपायांची पदे भरली जायची. शिक्षण विभागाच्या नव्या धोरणानुसार शिपाई पदे कालबाह्य ठरविण्यात आली आहेत.

यापुढे शाळांमध्ये शिपाई पद कंत्राटी पध्दतीने तथा ठरावीक अल्प मानधन देवूनच भरावे असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिपायांच्या रिक्त पदांची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली नाही.

बेराेजगारी वाढणार

शासनाने आधीच अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर पदे भरण्यास बंदी घातली आहे. त्यातच शिपायांची पदेही रद्द हाेणार असल्याने बेराेजगारांची एक संधी हिरावल्या जाणार आहे. त्यामुळे शासनाने शिपायांची पदे रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे.

शाळांमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यासह इतरही अनेक स्वरूपातील कामे करण्यासाठी शिपायांची नितांत गरज भासते. असे असताना शासनाने ही पदेच कालबाह्य ठरविली आहेत. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी मिळतील; पण त्यांना अल्प प्रमाणात मानधन असणार आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

प्रविण वानखेडे, लाेणीगवळी