शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेची जबाबदारी आता शाळा प्रशासनावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार अनुदानित शाळांमधील शिपाई हे पद आता कालबाह्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार अनुदानित शाळांमधील शिपाई हे पद आता कालबाह्य झाले आहे. यापुढे अनुदानित शाळांमध्ये केवळ कंत्राटी पद्धतीनेच ही पदे भरता येणार आहेत. यामुळे स्वच्छतेची जबाबदारी आता शाळा प्रशासनावर आलेली आहे.

अनुदानित शाळांमध्ये कार्यरत शिपाई, नाईक, पहारेकरी, सफाईगार, प्रयोगशाळा आदी स्वरूपातील चतुर्थश्रेणी पदांवर कार्यरत कर्मचारी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्यानंतर ही पदे कालबाह्य होणार आहेत. त्यानंतर सदर पदे कंत्राटी पद्धतीने भरून शाळांना त्यासाठी ठरावीक भत्ता अनुज्ञेय राहणार आहे. त्याला ‘शिपाई भत्ता’ असे संबोधण्यात येणार आहे. मात्र, हा भत्ता अगदीच कमी राहणार असल्याने शाळांवर काम करण्यासाठी कर्मचारी मिळतील किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिक्षण विभागाने प्रस्तावच मागविले नाही

शालेय शिक्षण विभागाने अनुदानित शाळांवरील शिपायांची पदे कालबाह्य ठरविली आहेत. यापुढे कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरून त्यांना ‘शिपाई भत्ता’ या नावाखाली ठरावीक मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाकडून प्रस्ताव मागणे अपेक्षित होते. मात्र, अद्यापही कार्यवाही सुरू झालेली नाही.

अनुदानित शाळांमध्ये ५०० विद्यार्थ्यांमागे दोन शिपाई कंत्राटी तत्त्वावर भरण्यास परवानगी दिली जाणार आहे. मात्र, ५०० विद्यार्थी बसविण्यासाठी किमान १५ वर्ग खोल्या लागतात. या वर्गखोल्या दोन शिपाई कसे स्वच्छ करतील. याशिवाय इतर कामेही कसे मार्गी लागतील, असे अनेक प्रश्न संस्थाचालकांना भेडसावत असल्याचे चित्र आहे.

अनुदानित शाळांतील शिपाई पद रद्द होणार का?

अनुदानित शाळांमध्ये पूर्वी ठरावीक वेतनश्रेणी लागू करुन शिपायांची पदे भरली जायची. शिक्षण विभागाच्या नव्या धोरणानुसार शिपाई पदे कालबाह्य ठरविण्यात आली आहेत.

यापुढे शाळांमध्ये शिपाई पद कंत्राटी पध्दतीने तथा ठरावीक अल्प मानधन देवूनच भरावे असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.

जिल्ह्यातील अनुदानित शाळांमधील शिपायांच्या रिक्त पदांची माहिती शिक्षण विभागाकडून मिळाली नाही.

बेराेजगारी वाढणार

शासनाने आधीच अनुदानित शाळांमधील शिक्षकेतर पदे भरण्यास बंदी घातली आहे. त्यातच शिपायांची पदेही रद्द हाेणार असल्याने बेराेजगारांची एक संधी हिरावल्या जाणार आहे. त्यामुळे शासनाने शिपायांची पदे रद्द करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची गरज आहे.

शाळांमध्ये दैनंदिन स्वच्छता राखण्यासह इतरही अनेक स्वरूपातील कामे करण्यासाठी शिपायांची नितांत गरज भासते. असे असताना शासनाने ही पदेच कालबाह्य ठरविली आहेत. कंत्राटी पद्धतीने कर्मचारी मिळतील; पण त्यांना अल्प प्रमाणात मानधन असणार आहे. त्यामुळे शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची गरज आहे.

प्रविण वानखेडे, लाेणीगवळी