शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

४५० गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST

बुलडाणा : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा ...

बुलडाणा : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत ४५० गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे़

हे अभियान १५ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविले जाणार आहे.

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बुलडाणा जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी तालुकास्तरावर प्रत्येक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. या अभियानात महिनानिहाय हगणदारीमुक्त अधिक गावे करण्याबाबत नियोजन असून जानेवारी २२ अखेर जिल्ह्यातील ४५० हगणदारीमुक्त गावे करण्यात येणार आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदनसिंह राजपूत यांच्या नियंत्रणात सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्तरावरील पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, बचत गट, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहभागातून स्वच्छता हा सेवा उपक्रम राबविताना सामूहिक श्रमदान करण्यात येणार आहे. एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याबाबत असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीत घेण्यात येणार आहे.

सुजलाम् अभियान राबवणार

स्थायित्व व सुजलाम् अभियान याअंतर्गत जिल्ह्यात १०० दिवसांचे अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये गावागावांत वैयक्तिक व सामुदायिक स्तरावर शोषखड्ड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच लोकसहभागातून नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करण्यात येऊन वाढीव नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करण्यात येणार आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी गावागावांतून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येऊन स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच शालेय स्पर्धा, मैला गाळ व्यवस्थापन, पदाधिकारी यांचा सरपंचांशी ऑनलाइन संवाद आदी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

स्वतंत्र भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोविड-१९ अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती व मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करण्याबाबतचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार व उपाध्यक्ष कमलताई बुधवंत यांनी केले आहे.