शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

४५० गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:41 IST

बुलडाणा : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा ...

बुलडाणा : भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्यभर स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या मार्गदर्शनात बुलडाणा जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. या अभियानांतर्गत ४५० गावे हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे़

हे अभियान १५ ऑगस्ट २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान राबविले जाणार आहे.

अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त बुलडाणा जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशनअंतर्गत विविध उपक्रम राबविण्यासाठी तालुकास्तरावर प्रत्येक पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना नोडल ऑफिसर म्हणून नेमण्यात आले आहे. या अभियानात महिनानिहाय हगणदारीमुक्त अधिक गावे करण्याबाबत नियोजन असून जानेवारी २२ अखेर जिल्ह्यातील ४५० हगणदारीमुक्त गावे करण्यात येणार आहे. यासाठी पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंदनसिंह राजपूत यांच्या नियंत्रणात सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान स्थानिक स्तरावरील पदाधिकारी, स्वयंसेवी संस्था, बचत गट, सामाजिक कार्यकर्ते यांचे सहभागातून स्वच्छता हा सेवा उपक्रम राबविताना सामूहिक श्रमदान करण्यात येणार आहे. एकदाच वापरता येणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्याबाबत असा ठराव प्रत्येक ग्रामपंचायतीत घेण्यात येणार आहे.

सुजलाम् अभियान राबवणार

स्थायित्व व सुजलाम् अभियान याअंतर्गत जिल्ह्यात १०० दिवसांचे अभियान राबवले जाणार आहे. यामध्ये गावागावांत वैयक्तिक व सामुदायिक स्तरावर शोषखड्ड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. तसेच लोकसहभागातून नादुरुस्त शौचालयांची दुरुस्ती करण्यात येऊन वाढीव नवीन कुटुंबांकडे शौचालय असल्याबाबतची खात्री करण्यात येणार आहे. २६ जानेवारी २०२२ रोजी गावागावांतून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येऊन स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासोबतच शालेय स्पर्धा, मैला गाळ व्यवस्थापन, पदाधिकारी यांचा सरपंचांशी ऑनलाइन संवाद आदी विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

अभियान यशस्वी करण्याचे आवाहन

स्वतंत्र भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कोविड-१९ अंतर्गत मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये जिल्ह्यातील सर्वच ग्रामपंचायती व मोठ्या संख्येने ग्रामस्थ, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांनी सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करण्याबाबतचे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मनीषा पवार व उपाध्यक्ष कमलताई बुधवंत यांनी केले आहे.