शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
5
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
6
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
7
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
8
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
9
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
10
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
11
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
12
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
13
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
14
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
15
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
16
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
17
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
18
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
19
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
20
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...

बोगस बियाण्यांचा अहवाल गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:52 IST

जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याचे प्रकार गेल्या १५ दिवसांपासून समोर येत आहे. तसेच कृषी विभागाकडे शेतकर्‍यांनी तक्रारीसुद्धा केल्या आहेत; परंतु आतापर्यंंत अशा  सोयाबीनची तालुकास्तरावरून केवळ पाहणीच झाली असून, कृषी विभागाने वांझोट्या सोयाबीनचा अहवाल गुलदस्त्यातच ठेवला आहे. 

ठळक मुद्देतालुकास्तरावरून केवळ पाहणी सोयाबीनला शेंगा न आल्याचे प्रकार वाढले!

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याचे प्रकार गेल्या १५ दिवसांपासून समोर येत आहे. तसेच कृषी विभागाकडे शेतकर्‍यांनी तक्रारीसुद्धा केल्या आहेत; परंतु आतापर्यंंत अशा  सोयाबीनची तालुकास्तरावरून केवळ पाहणीच झाली असून, कृषी विभागाने वांझोट्या सोयाबीनचा अहवाल गुलदस्त्यातच ठेवला आहे.  जिल्ह्यात शेतकर्‍यांनी जवळपास ३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. सध्या सोयाबीनच्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. झाडाला शेंगा जास्त व दाणेदार आल्या तर उत्पादनात वाढ होते; मात्र जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याच्या तक्रारी गेल्या १५ दिवसांपासून शेतकरी कृषी विभागाकडे करत आहेत. शेतकर्‍यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची सोयाबीन बियाणे शेतात टाकली आहेत, तर काहींनी घरगुती सोयाबीन बियाणेसुद्धा वापरले आहे; मात्र बुलडाणा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या भागात सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याचा प्रकार सर्वाधिक आहे. सोयाबीनला शेंगा न लागलेल्या शेतात कृषी विभागाने तालुकानिहाय पाहणी केली आहे; मात्र त्याचा कुठलाच अहवाल आतापर्यंत पूर्ण करण्यात आला नाही. तसेच सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याचा अहवाल तालुकास्तरावरून जिल्हा परिषदच्या कृषी विभागाकडेसुद्धा पाठवण्यात आला नसल्याची माहिती आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. सोयाबीनला शेंगा न लागल्यामुळे शेतकर्‍यांच्या वर्षभराच्या  मेहनतीवर पाणी फिरल्या जात आहे. काही दिवसातच सोयाबीन कापणीला सुरुवात होणार असून, आता यापुढे सोयाबीनला शेंगा येण्याची शक्यता नाही. 

कृषी विभागाचे कृषी विद्यापीठाच्या पाहणीकडे बोटजिल्ह्यात सोयाबीनला शेंगा न आल्याचा प्रकार वाढला असून, अशा सोयाबीनची कृषी विभागाकडून तालुकास्तरावरून पाहणी करण्यात आली आहे; मात्र त्यावर कुठल्याच प्रकारचा निर्णय अद्याप कृषी विभागाने दिला नाही. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाकडून कृषी विद्यापीठाकडे बोट दाखवल्या जात आहे. त्यामुळे आता सोयाबीनला शेंगा न आलेल्या शेताची पाहणी पुन्हा कृषी विद्यापीठाकडून होणार आहे.

शेंगा न लागलेल्या झाडांचीही काळजी सोयाबीनला शेंगा न लागलेल्या झाडांचा सर्व्हे होईल, या आशेने शेतकरी शेंगा नसलेल्या झाडांचीही काळजी घेत आहेत. हरण, रोही यासारख्या वन्य प्राण्यांपासून शेंगा न लागलेले सोयाबीनचे झाडे नष्ट होऊ नये, म्हणून शेतकरी खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. शेंगा न लागलेल्या सोयाबीनच्या या झाडांचा शासन केव्हा सर्व्हे करणार, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागलेली आहे. 

सोयाबीनला शेंगा न लागलेल्या शेताची तालुकास्तरावरून पाहणी करण्यात आलेली आहे. यापुढे आता कृषी विद्यापीठाकडून पाहणी करण्यात येईल.- पी.के. लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.