शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
2
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
3
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
4
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
5
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
6
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
7
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
8
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
9
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
10
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
11
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
12
दोन पतींना सोडले, तिसऱ्यासोबत लिव्ह इन; रात्री एकत्र मद्यपान केले, त्यानंतर घडलं भयंकर...  
13
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
14
जगातील सर्वात श्रीमंत कुटुंबांमध्ये अंबानी कोणत्या स्थानावर? जाणून घ्या कोणाकडे किती पैसे?
15
Crime: नेमबाजी स्पर्धेसाठी गेलेल्या महिला खेळाडूवर बलात्कार; पीडितेच्या मैत्रिणीसह तिघांना अटक
16
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
17
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
18
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
19
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
20
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
Daily Top 2Weekly Top 5

बोगस बियाण्यांचा अहवाल गुलदस्त्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:52 IST

जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याचे प्रकार गेल्या १५ दिवसांपासून समोर येत आहे. तसेच कृषी विभागाकडे शेतकर्‍यांनी तक्रारीसुद्धा केल्या आहेत; परंतु आतापर्यंंत अशा  सोयाबीनची तालुकास्तरावरून केवळ पाहणीच झाली असून, कृषी विभागाने वांझोट्या सोयाबीनचा अहवाल गुलदस्त्यातच ठेवला आहे. 

ठळक मुद्देतालुकास्तरावरून केवळ पाहणी सोयाबीनला शेंगा न आल्याचे प्रकार वाढले!

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: जिल्ह्यात अनेक ठिकाणी सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याचे प्रकार गेल्या १५ दिवसांपासून समोर येत आहे. तसेच कृषी विभागाकडे शेतकर्‍यांनी तक्रारीसुद्धा केल्या आहेत; परंतु आतापर्यंंत अशा  सोयाबीनची तालुकास्तरावरून केवळ पाहणीच झाली असून, कृषी विभागाने वांझोट्या सोयाबीनचा अहवाल गुलदस्त्यातच ठेवला आहे.  जिल्ह्यात शेतकर्‍यांनी जवळपास ३ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे. सध्या सोयाबीनच्या शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. झाडाला शेंगा जास्त व दाणेदार आल्या तर उत्पादनात वाढ होते; मात्र जिल्ह्यातील काही भागात सोयाबीनला शेंगाच आल्या नसल्याचा प्रकार समोर आला आहे. सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याच्या तक्रारी गेल्या १५ दिवसांपासून शेतकरी कृषी विभागाकडे करत आहेत. शेतकर्‍यांनी वेगवेगळ्या कंपन्यांची सोयाबीन बियाणे शेतात टाकली आहेत, तर काहींनी घरगुती सोयाबीन बियाणेसुद्धा वापरले आहे; मात्र बुलडाणा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या भागात सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याचा प्रकार सर्वाधिक आहे. सोयाबीनला शेंगा न लागलेल्या शेतात कृषी विभागाने तालुकानिहाय पाहणी केली आहे; मात्र त्याचा कुठलाच अहवाल आतापर्यंत पूर्ण करण्यात आला नाही. तसेच सोयाबीनला शेंगा आल्या नसल्याचा अहवाल तालुकास्तरावरून जिल्हा परिषदच्या कृषी विभागाकडेसुद्धा पाठवण्यात आला नसल्याची माहिती आहे. कृषी विभागाच्या दुर्लक्षित कारभारामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. सोयाबीनला शेंगा न लागल्यामुळे शेतकर्‍यांच्या वर्षभराच्या  मेहनतीवर पाणी फिरल्या जात आहे. काही दिवसातच सोयाबीन कापणीला सुरुवात होणार असून, आता यापुढे सोयाबीनला शेंगा येण्याची शक्यता नाही. 

कृषी विभागाचे कृषी विद्यापीठाच्या पाहणीकडे बोटजिल्ह्यात सोयाबीनला शेंगा न आल्याचा प्रकार वाढला असून, अशा सोयाबीनची कृषी विभागाकडून तालुकास्तरावरून पाहणी करण्यात आली आहे; मात्र त्यावर कुठल्याच प्रकारचा निर्णय अद्याप कृषी विभागाने दिला नाही. त्यामुळे पुढील कार्यवाहीसाठी कृषी विभागाकडून कृषी विद्यापीठाकडे बोट दाखवल्या जात आहे. त्यामुळे आता सोयाबीनला शेंगा न आलेल्या शेताची पाहणी पुन्हा कृषी विद्यापीठाकडून होणार आहे.

शेंगा न लागलेल्या झाडांचीही काळजी सोयाबीनला शेंगा न लागलेल्या झाडांचा सर्व्हे होईल, या आशेने शेतकरी शेंगा नसलेल्या झाडांचीही काळजी घेत आहेत. हरण, रोही यासारख्या वन्य प्राण्यांपासून शेंगा न लागलेले सोयाबीनचे झाडे नष्ट होऊ नये, म्हणून शेतकरी खबरदारी घेत असल्याचे दिसून येत आहे. शेंगा न लागलेल्या सोयाबीनच्या या झाडांचा शासन केव्हा सर्व्हे करणार, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना लागलेली आहे. 

सोयाबीनला शेंगा न लागलेल्या शेताची तालुकास्तरावरून पाहणी करण्यात आलेली आहे. यापुढे आता कृषी विद्यापीठाकडून पाहणी करण्यात येईल.- पी.के. लहाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा.