शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:37 IST

शेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी ग्रामसभा१0 गावे तंटामुक्तीपासून दूर

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.गावपातळीवर छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणार्‍या तंट्यांचे पर्यवसान मोठय़ा तंट्यात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंबाची, समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी या करिता महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहीम सुरू केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे अशा तीन भागांचा मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबविली जावी, मोहिमेमध्ये दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंट्यांचा समावेश करण्यात आला आहे. गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सातत्याने सुरूच राहणार आहे. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरूपी कार्यरत राहील. तथापि, जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, कामकाजात अडथडा आणत असतील अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ ऑगस्ट नंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.