शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:37 IST

शेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी ग्रामसभा१0 गावे तंटामुक्तीपासून दूर

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.गावपातळीवर छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणार्‍या तंट्यांचे पर्यवसान मोठय़ा तंट्यात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंबाची, समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी या करिता महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहीम सुरू केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे अशा तीन भागांचा मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबविली जावी, मोहिमेमध्ये दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंट्यांचा समावेश करण्यात आला आहे. गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सातत्याने सुरूच राहणार आहे. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरूपी कार्यरत राहील. तथापि, जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, कामकाजात अडथडा आणत असतील अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ ऑगस्ट नंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.