शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:37 IST

शेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.

ठळक मुद्देस्वातंत्र्यदिनी ग्रामसभा१0 गावे तंटामुक्तीपासून दूर

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव: सन २0१७-१८ या वर्षासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम १५ ऑगस्ट २0१७ पासून जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. १५ ऑगस्ट ते ३0 ऑगस्ट या कालावधीत ग्रामपंचायतीनी ग्रामसभा घेऊन गाव समित्या पुनर्गठित कराव्यात, अशा सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक मीना यांनी यांनी दिल्या आहेत. त्यानुसार मंगळवारी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये आयोजित  ग्रामसभेमध्ये तंटामुक्त गाव समित्यांचे पुनर्गठन होणार आहे.गावपातळीवर छोट्या छोट्या कारणावरून निर्माण होणार्‍या तंट्यांचे पर्यवसान मोठय़ा तंट्यात होऊ नये, वादामध्ये मालमत्ता अडकून पडून त्यातून आर्थिक नुकसान होऊ नये, कुटुंबाची, समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, या दृष्टीने गावात तंटे निर्माण होणार नाहीत व अस्तित्वात असलेले तंटे लोकसहभागातून सामोपचाराने आणि आवश्यक तेथे प्रशासनाची मदत घेऊन सोडविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी या करिता महाराष्ट्र शासनाने १५ ऑगस्ट २00७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गावमोहीम सुरू केली आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, दाखल झालेले तंटे मिटविणे व नव्याने निर्माण होणारे तंटे मिटविणे अशा तीन भागांचा मोहिमेमध्ये समावेश करण्यात आला आहे. या तीनही भागातील कार्यवाही व तंटे मिटविण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबविली जावी, मोहिमेमध्ये दिवाणी, महसुली, फौजदारी व इतर तंट्यांचा समावेश करण्यात आला आहे. गावे तंटामुक्त झाली म्हणून मोहीम संपली असे नाही. यापुढेही मोहीम राबविण्याचे काम सातत्याने सुरूच राहणार आहे. तंटामुक्त गाव समिती कायमस्वरूपी कार्यरत राहील. तथापि, जे सदस्य समितीच्या बैठकांना उपस्थित राहत नसतील, कामकाजात अडथडा आणत असतील अशा सदस्यांना बदलून नवीन सदस्य घेण्याबाबत प्रत्येक वर्षाच्या १५ ऑगस्ट नंतरच्या पहिल्या ग्रामसभेमध्ये ग्रामसभेच्या मान्यतेने निर्णय घेता येईल.